शहरं
Join us  
Trending Stories
1
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
2
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
3
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
4
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
5
नियमित शस्त्रक्रिया बंद; परिचारिका संपाचा फटका, प्रकृती स्थिर असणाऱ्यांना दिले डिस्चार्ज
6
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
7
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
8
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
9
"चपलेचा मार द्यायची गरज होती.."; इस्कॉनमध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तीवर बादशाहचा संताप, नेमकं काय घडलं?
10
रोहित पवारांवर आझादनगर पोलिसांत गुन्हा; पाेलिस ठाण्यात केलेल्या दमदाटीचा व्हिडीओ व्हायरल
11
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
12
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
13
मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना घातला अडीच कोटींचा गंडा; निवृत्त उपसचिवावर पोलिसांत गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
15
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
16
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
17
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
18
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
19
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
20
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम

रिक्षांनी घेतला रस्त्यांचा ताबा

By admin | Updated: July 11, 2014 01:04 IST

औरंगाबाद : क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, रिक्षात जोरजोरात वाजणारी गाणी, रस्त्यावर एखादा प्रवासी दिसताच मागच्या वाहनांचा विचार न करणारे रिक्षा, अ‍ॅपेरिक्षाचालकांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे.

औरंगाबाद : क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, रिक्षात जोरजोरात वाजणारी गाणी, रस्त्यावर एखादा प्रवासी दिसताच मागच्या वाहनांचा विचार न करणारे रिक्षा, अ‍ॅपेरिक्षाचालकांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात देश- विदेशातून पर्यटक येतात. पर्यटक शहर आणि परिसरातील पर्यटनस्थळांची प्रशंसा करतात. मात्र, शहरातील बेशिस्त आणि बिघडलेल्या वाहतूक व्यवस्थेविषयीची नाराजी त्यांना लपवता येत नाही. जागोजागी उभ्या राहणाऱ्या वाहनांनी रस्ते व्यापलेले दिसतात. सर्वाधिक वाहनांची वर्दळ असणाऱ्या जालना रोडवर ठिकठिकाणी रिक्षा, अ‍ॅपेरिक्षा, काळी-पिवळी उभ्या असल्याचे दिसते. गजानन मंदिर, सिडको बसस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्टेशन, शिवाजीनगर, चिकलठाणा परिसरातही हीच परिस्थिती आहे. यामुळे वाहतुकीला आणि अन्य वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. बसथांब्यांभोवती गर्दीशहर बसथांब्यांवर रिक्षा, अ‍ॅपेरिक्षांची गर्दी दिसते. शहर बस येण्याआधीच प्रवाशांना रिक्षात बसविले जाते. बस येण्याची वाट पाहण्यापेक्षा अनेक प्रवासीही रिक्षांनाच प्राधान्य देतात. अनेकदा बसथांब्यांवर उभ्या राहणाऱ्या रिक्षा, अ‍ॅपेरिक्षांमुळे बस थांबविण्यासाठी अडचण येते. यातून बसचालक आणि रिक्षाचालकांमध्ये वादावादी होते. रिक्षांना अभयकाही रिक्षा, अ‍ॅपेरिक्षा या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मालकीच्या आहेत. त्यांच्यावर कारवाई होताच चालकांकडून तात्काळ मालकाची ओळख सांगून सुटका केली जाते. अ‍ॅपेरिक्षाचालकांकडून नियमांची पायमल्ली होत असून त्यांनी अभय मिळते, असे सूत्रांनी सांगितले.अपघाताचा वाढता धोकाभर रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या रिक्षा, अ‍ॅपेरिक्षा, काळी-पिवळीमुळे अरुंद असलेले रस्ते आणखी अरुंद होतात. शहरासाठी किती रिक्षा असाव्यात याचा कुठलाच नियम पाळला जात नाही. थांबे, पार्किंगसाठी जागा नसल्यामुळे रिक्षा रस्त्यावरच उभ्या राहतात. अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होताना दिसत नाही. केवळ रिक्षांवरच कारवाई केली जाते, असे रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती समितीचे सरचिटणीस निसार अहेमद खान यांनी म्हटले.