शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

रिक्षांनी घेतला रस्त्यांचा ताबा

By admin | Updated: July 11, 2014 01:04 IST

औरंगाबाद : क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, रिक्षात जोरजोरात वाजणारी गाणी, रस्त्यावर एखादा प्रवासी दिसताच मागच्या वाहनांचा विचार न करणारे रिक्षा, अ‍ॅपेरिक्षाचालकांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे.

औरंगाबाद : क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, रिक्षात जोरजोरात वाजणारी गाणी, रस्त्यावर एखादा प्रवासी दिसताच मागच्या वाहनांचा विचार न करणारे रिक्षा, अ‍ॅपेरिक्षाचालकांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात देश- विदेशातून पर्यटक येतात. पर्यटक शहर आणि परिसरातील पर्यटनस्थळांची प्रशंसा करतात. मात्र, शहरातील बेशिस्त आणि बिघडलेल्या वाहतूक व्यवस्थेविषयीची नाराजी त्यांना लपवता येत नाही. जागोजागी उभ्या राहणाऱ्या वाहनांनी रस्ते व्यापलेले दिसतात. सर्वाधिक वाहनांची वर्दळ असणाऱ्या जालना रोडवर ठिकठिकाणी रिक्षा, अ‍ॅपेरिक्षा, काळी-पिवळी उभ्या असल्याचे दिसते. गजानन मंदिर, सिडको बसस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्टेशन, शिवाजीनगर, चिकलठाणा परिसरातही हीच परिस्थिती आहे. यामुळे वाहतुकीला आणि अन्य वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. बसथांब्यांभोवती गर्दीशहर बसथांब्यांवर रिक्षा, अ‍ॅपेरिक्षांची गर्दी दिसते. शहर बस येण्याआधीच प्रवाशांना रिक्षात बसविले जाते. बस येण्याची वाट पाहण्यापेक्षा अनेक प्रवासीही रिक्षांनाच प्राधान्य देतात. अनेकदा बसथांब्यांवर उभ्या राहणाऱ्या रिक्षा, अ‍ॅपेरिक्षांमुळे बस थांबविण्यासाठी अडचण येते. यातून बसचालक आणि रिक्षाचालकांमध्ये वादावादी होते. रिक्षांना अभयकाही रिक्षा, अ‍ॅपेरिक्षा या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मालकीच्या आहेत. त्यांच्यावर कारवाई होताच चालकांकडून तात्काळ मालकाची ओळख सांगून सुटका केली जाते. अ‍ॅपेरिक्षाचालकांकडून नियमांची पायमल्ली होत असून त्यांनी अभय मिळते, असे सूत्रांनी सांगितले.अपघाताचा वाढता धोकाभर रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या रिक्षा, अ‍ॅपेरिक्षा, काळी-पिवळीमुळे अरुंद असलेले रस्ते आणखी अरुंद होतात. शहरासाठी किती रिक्षा असाव्यात याचा कुठलाच नियम पाळला जात नाही. थांबे, पार्किंगसाठी जागा नसल्यामुळे रिक्षा रस्त्यावरच उभ्या राहतात. अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होताना दिसत नाही. केवळ रिक्षांवरच कारवाई केली जाते, असे रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती समितीचे सरचिटणीस निसार अहेमद खान यांनी म्हटले.