शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

करार शेती आली कांदा उत्पादकांच्या मदतीला धावून

By admin | Updated: March 22, 2017 00:32 IST

उस्मानाबाद जिल्ह्यातील ४३ एकरवरील शेतकऱ्यांना बिजोत्पादन कार्यक्रम व करार शेतीमुळे हमी भावानुसार रक्कम मिळणार आहे.

विशाल सोनटक्के उस्मानाबादसद्यस्थितीत कांद्याचा भाव ५ ते ६ रुपये किलो असा आहे. पडलेल्या भावामुळे राज्यभरातल्या कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शासनाने पिकांना हमीभाव देण्याची मागणी सातत्याने केली जाते. मात्र सध्या कांद्याचे भाव पडलेले असतानाही जिल्ह्यातील ४३ एकरवरील शेतकऱ्यांना बिजोत्पादन कार्यक्रम व करार शेतीमुळे हमी भावानुसार रक्कम मिळणार आहे. साधारणपणे मार्च महिन्यात शेतकरी आपला उत्पादीत झालेला कांदा बाजार समितीत आणतो. या काळात एकाच वेळी मोठी आवक होत असल्याने व्यापारी संगनमत करुन कांद्याचे भाव पाडतात. आणि कवडीमोल भावाने कांद्याची खरेदी करतात. शेतकऱ्यांकडील कांदा संपला की, मग बाजारपेठेत कांद्याची कृत्रीम टंचाई निर्माण केली जाते आणि त्यानंतर जुलै, आॅगस्टमध्ये कांद्याचे भाव वधारायला लागतात. एकदा भाव कडाडले की, चाळीत साठवलेला कांदा व्यापारी बाहेर काढून भरभक्कम नफा कमवितात. या दुष्ट चक्रामुळेच कांदा उत्पादक शेतकरी कायम अडचणीत सापडल्याचे दिसून येते. यावर मात करण्यासाठी तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्राने गटशेती, करार शेतीच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्न मिळविण्याचा अभिनव मार्ग शेतकऱ्यांना दाखविला आहे. याचा जिल्ह्यातील ४३ शेतकऱ्यांना यंदा फायदा होणार आहे. या केंद्राने कृषी विभाग व आत्मा यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना या करार शेती उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला कळंब तालुक्यातील गौर येथील भैरवनाथ किसान प्रोड्युसर कंपनी, तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कृषी परिवर्तन कांदा उत्पादक कंपनी व उस्मानाबाद तालुक्यातील आंबेवाडी येथील कृषी उन्नती कंपनीमधील सदस्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ गणेश मंडलिक यांनी वरीष्ठ शास्त्रज्ञ सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शेतकरी गटांचे फळ निर्र्यातदार, सिडस् कंपनी, व्यापाऱ्यांसह सेंद्रीय प्रमाणीकरण करणाऱ्या संस्थांशी करार केले. राष्ट्रीय उद्यान विद्या संशोधन आणि विकास प्रतिष्ठान नाशिक तसेच कांदा व लसूण संशोधन निदर्शनालय राजगुरुनगर यांच्याशी ४३ कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे करार करण्यात आले. आणि या ४३ शेतकऱ्यांच्या ४३ एकरावरील क्षेत्रात कांदा बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला. सद्यस्थितीत बाजारपेठेत ५०० ते ६०० रुपये क्विंटलने कांदा घेतला जात असताना या शेतकऱ्यांना मात्र कराराप्रमाणे प्रति क्विंटल २५ ते ५० हजार या दराने बियाणांचा हमीभाव मिळणार आहे. त्यामुळेच कांद्याचे दर कमालीचे पडलेले असतानाही केवळ गट व करार शेतीमुळे हे शेतकरी निर्धास्त असल्याचे दिसून आले.