शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

करार शेती आली कांदा उत्पादकांच्या मदतीला धावून

By admin | Updated: March 22, 2017 00:32 IST

उस्मानाबाद जिल्ह्यातील ४३ एकरवरील शेतकऱ्यांना बिजोत्पादन कार्यक्रम व करार शेतीमुळे हमी भावानुसार रक्कम मिळणार आहे.

विशाल सोनटक्के उस्मानाबादसद्यस्थितीत कांद्याचा भाव ५ ते ६ रुपये किलो असा आहे. पडलेल्या भावामुळे राज्यभरातल्या कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शासनाने पिकांना हमीभाव देण्याची मागणी सातत्याने केली जाते. मात्र सध्या कांद्याचे भाव पडलेले असतानाही जिल्ह्यातील ४३ एकरवरील शेतकऱ्यांना बिजोत्पादन कार्यक्रम व करार शेतीमुळे हमी भावानुसार रक्कम मिळणार आहे. साधारणपणे मार्च महिन्यात शेतकरी आपला उत्पादीत झालेला कांदा बाजार समितीत आणतो. या काळात एकाच वेळी मोठी आवक होत असल्याने व्यापारी संगनमत करुन कांद्याचे भाव पाडतात. आणि कवडीमोल भावाने कांद्याची खरेदी करतात. शेतकऱ्यांकडील कांदा संपला की, मग बाजारपेठेत कांद्याची कृत्रीम टंचाई निर्माण केली जाते आणि त्यानंतर जुलै, आॅगस्टमध्ये कांद्याचे भाव वधारायला लागतात. एकदा भाव कडाडले की, चाळीत साठवलेला कांदा व्यापारी बाहेर काढून भरभक्कम नफा कमवितात. या दुष्ट चक्रामुळेच कांदा उत्पादक शेतकरी कायम अडचणीत सापडल्याचे दिसून येते. यावर मात करण्यासाठी तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्राने गटशेती, करार शेतीच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्न मिळविण्याचा अभिनव मार्ग शेतकऱ्यांना दाखविला आहे. याचा जिल्ह्यातील ४३ शेतकऱ्यांना यंदा फायदा होणार आहे. या केंद्राने कृषी विभाग व आत्मा यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना या करार शेती उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला कळंब तालुक्यातील गौर येथील भैरवनाथ किसान प्रोड्युसर कंपनी, तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कृषी परिवर्तन कांदा उत्पादक कंपनी व उस्मानाबाद तालुक्यातील आंबेवाडी येथील कृषी उन्नती कंपनीमधील सदस्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ गणेश मंडलिक यांनी वरीष्ठ शास्त्रज्ञ सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शेतकरी गटांचे फळ निर्र्यातदार, सिडस् कंपनी, व्यापाऱ्यांसह सेंद्रीय प्रमाणीकरण करणाऱ्या संस्थांशी करार केले. राष्ट्रीय उद्यान विद्या संशोधन आणि विकास प्रतिष्ठान नाशिक तसेच कांदा व लसूण संशोधन निदर्शनालय राजगुरुनगर यांच्याशी ४३ कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे करार करण्यात आले. आणि या ४३ शेतकऱ्यांच्या ४३ एकरावरील क्षेत्रात कांदा बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला. सद्यस्थितीत बाजारपेठेत ५०० ते ६०० रुपये क्विंटलने कांदा घेतला जात असताना या शेतकऱ्यांना मात्र कराराप्रमाणे प्रति क्विंटल २५ ते ५० हजार या दराने बियाणांचा हमीभाव मिळणार आहे. त्यामुळेच कांद्याचे दर कमालीचे पडलेले असतानाही केवळ गट व करार शेतीमुळे हे शेतकरी निर्धास्त असल्याचे दिसून आले.