शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

विलीनीकरणाचा गोंधळात गोंधळ

By admin | Updated: February 17, 2015 00:43 IST

औरंगाबाद : राज्य सरकारने सातारा- देवळाई नगर परिषदेचे औरंगाबाद महानगरपालिकेत विलीनीकरण करण्याची अधिसूचना जारी केल्यानंतरही नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया थांबलेली नाही.

औरंगाबाद : राज्य सरकारने सातारा- देवळाई नगर परिषदेचे औरंगाबाद महानगरपालिकेत विलीनीकरण करण्याची अधिसूचना जारी केल्यानंतरही नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया थांबलेली नाही. नगर परिषदेच्या प्रभाग रचनेवर आलेल्या आक्षेपांवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली. दरम्यान, विलीनीकरणाचा इरादा जाहीर केला असला तरी निवडणूक प्रक्रिया थांबविण्याबाबत स्पष्ट सूचना मिळालेल्या नसल्यामुळे आक्षेपांवर सुनावणी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सातारा-देवळाई नगर परिषदेचा संपूर्ण भाग औरंगाबाद महानगरपालिकेत समाविष्ट करावा, असा ठराव ३ फेबु्रवारी रोजी मनपाच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. त्यानंतर लगेचच राज्य सरकारने आठवडाभरात याबाबत अधिसूचना जारी करून नागरिकांकडून हरकती मागविल्या. त्यामुळे सातारा-देवळाई नगर परिषदेची आधी सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया थांबेल असे वाटत होते. मात्र, ही प्रक्रिया अद्यापही थांबलेली नाही. उलट पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार नगर परिषदेच्या प्रभाग रचनेसंबंधीच्या आक्षेपांबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी पार पडली. नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आयोगाने ३ फेबु्रवारी रोजीच प्रभाग रचना जाहीर करून सोडत काढली होती. सातारा-देवळाई नगर परिषदेच्या प्रभाग रचनेबाबत एकूण २० आक्षेप आले होते. त्या सर्वांवर संबंधितांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली. यातील बहुतेक आक्षेप हे वॉर्डांच्या सीमांशी संबंधित होते. जिल्हाधिकारी विक्रमकुमार म्हणाले की, नगरविकास खात्याने सातारा-देवळाई नगर परिषद औरंगाबाद मनपात समाविष्ट करण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. परंतु त्यात शासनाने केवळ इरादा जाहीर केलेला आहे. शिवाय सातारा-देवळाई नगर परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया थांबवावी, अशा सूचनाही दिलेल्या नाहीत. अधिसूचनेनुसार समाविष्ट करण्याचा किंवा न करण्याचाही निर्णय होऊ शकतो. त्यामुळे नगर परिषदेच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया पूर्ण करून ठेवणे योग्य ठरेल या हेतूने ही सुनावणी घेण्यात आली.