शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
5
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
6
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
7
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
8
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
9
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
10
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
11
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
12
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
13
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
14
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
15
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
16
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
17
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
18
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

‘मग्रारोहयो’वरून गोंधळ

By admin | Updated: March 19, 2015 00:16 IST

जालना : जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात १० मार्चपर्यंत मग्रारोहयो कामे सुरू करण्याचे नियोजन करूनही कामे सुरू न झाल्याच्या मुद्यावरून

जालना : जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात १० मार्चपर्यंत मग्रारोहयो कामे सुरू करण्याचे नियोजन करूनही कामे सुरू न झाल्याच्या मुद्यावरून बुधवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी गदारोळ केला. अंबड तालुक्यातील सुखापुरी येथील बालमृत्यूंचे प्रमाण वाढलेले असताना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर कसलीच कारवाई न झाल्याबद्दल सदस्यांनी तीव्र आक्षेप नोंदविले.दुपारी २.३० वाजता कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्ष तुकाराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सभेला प्रारंभ झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, सभापती ए.जे. बोराडे, शहाजी राक्षे, मीनाक्षी कदम, लिलाबाई लोखंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख व पी.टी. केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदस्यांमधून सतीश टोपे व संभाजी उबाळे यांनी मग्रारोहयोचा मुद्दा मांडला. एकीकडे दुष्काळी स्थितीतही ग्रामीण भागात मग्रारोहयोची कामे सुरू होत नसल्याबद्दल या सदस्यांनी खंत व्यक्त केली. विशेष म्हणजे तालुकानिहाय कामे वाटपाचे नियोजन करूनही १० तारखेनंतर कामेच सुरू नसल्याचे या सदस्यांनी सांगितले. टोपे म्हणाले, पदाधिकाऱ्यांचा प्रशासनावर वचक नसल्याने ग्रामीण भागात विकासाची तर सोडा दुष्काळी निवारणाची कामे देखील होत नाहीत. सत्ताधाऱ्यांची मानसिकता नसल्याने ही स्थिती असल्याचा आरोप करून टोपे यांनी पदाधिकाऱ्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामे दिले पाहिजे, अशी मागणी केली.सुखापुरी येथे बालमृत्यूचे प्रमाण वाढल्याचा मुद्दा उबाळे यांनी लावून धरला. त्यावर प्रशासनाने काहीच ठोस कारवाई केली नाही, असा आरोपही त्यांनी केला. त्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भटकर यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून २० मार्चपर्यंत खुलासा मागविण्यात आल्याचे सांगितले. ४दरम्यान, एका प्रश्नाच्या उत्तरात डॉ. भटकर यांनी सुखापुरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर तपासणीसाठी गेल्यानंतर आवश्यक कागदपत्रे सापडली नसल्याचे कबूल केले. या प्रकाराबद्दल संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार यांनी सांगितले.