शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

खाजगी टँकर्सना नोंदणी सक्तीची

By admin | Updated: July 9, 2014 00:48 IST

विकास राऊत , औरंगाबाद शहरातील बहुतांश भागांमध्ये सध्या खाजगी टँकर्सने पिण्याचे पाणी पुरविले जात आहे.

विकास राऊत , औरंगाबादशहरातील बहुतांश भागांमध्ये सध्या खाजगी टँकर्सने पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. ते पाणी नाल्यातून पुरविले जात असल्याचे वृत्त लोकमतने ८ जुलैच्या अंकात प्रकाशित केल्यानंतर पालिकेसह अन्न व औषधी प्रशासन जागे झाले आहे. पालिकेने खाजगी टँकर्सला सक्तीने नोंदणी करण्याचे ठरविले आहे. पाणी कुठून आणले जाते. पाणी पुरविणाऱ्या मालकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांकाची माहिती आणि ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, याची माहिती खाजगी टँकरचालकांना पालिकेला द्यावी लागणार आहे. दोन दिवसांत त्यासंबंधीचे प्रगटन पालिका प्रसिद्धीस देणार आहे. शहरात नाल्यालगत असलेल्या विहिरीतून टँकर भरून ते विकले जातात. ते पाणी पिण्यासाठी वापरले जाते की, बांधकामासाठी, याबाबत काहीही स्पष्टीकरण पुढे येत नाही. हॉटेलचालकांना खाजगी टँकरचालकांकडूनच पाणी घ्यावे लागते.मनपा आयुक्त म्हणाले...मनपाकडे खाजगी टँकरचालकांची नोंदणी सक्तीची केली जाईल. कारण नाल्यातील पाणी इतर वापरासाठी दिले जात असेल तर काहीही हरकत नाही. मात्र, ते पिण्यासाठी विकले जात असेल तर शहराचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. नाल्याकाठचे पाणी टँकरमध्ये भरण्यात येत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोकादेखील होऊ शकतो. पाण्याचे स्रोत मनपाला कळवा. यासाठी नोंदणी सक्तीची केली जाईल. नोंदणीसाठी शुल्क आकारण्याचा काहीही मुद्दा नाही. जर टँकरचालकांनी नोंदणी केली नाही, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांनी दिला. नागरिकांनी हे करावे...शहरात मनपाकडून पाणीपुरवठा न झाल्यास नागरिक खाजगी टँकर्सकडे धाव घेतात. त्यामुळे नागरिकांनी टँकरचे पाणी घेण्यापूर्वी चालकांकडे पाणी कुठून आले. विहिरीचा पत्ता कुठे आहे. नाल्यालगत विहीर आहे की नाही, याची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे. पिण्याचे पाणी म्हणून खाजगी टँकरचालक दूषित पाणीपुरवठा कमाईमुळे करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्यास घातक पाण्याचे अड्डे! जवाहर कॉलनी पोलीस ठाण्याच्या बाजूलाच नाल्यातील विहिरीतून पाणी उपसून खाजगी टँकर्सला विकले जाते. शहरात सुमारे ७०९ च्या आसपास टँकर आहेत. संजय गांधी मार्केट हडको परिसरात नाल्यापासून हाकेच्या अंतरावर विहिरी आहेत. त्यातील पाणीही खाजगी टँकरचालकांना विकले जाते. जटवाडा परिसर, खाम नदीतील पाणीदेखील उपसून टँकरचालकांना देण्यात येते. टँकरवर पिण्याचे पाणी म्हणून असे लिहिलेले असते, हे विशेष. सरकारी टँकर शुद्ध पाण्याचेमनपा, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दुष्काळसदृश स्थितीत पुरविण्यात येणारे टँकर्स हे शुद्ध पाण्याचे आहेत. मनपाचे ५८ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे ६१४ टँकर्स सध्या शहर व ग्रामीण भागात पाणी पुरवीत आहेत. मनपाची फारोळा येथे जलगुणवत्ता तपासणीची प्रयोगशाळा आहे. तेथे पाण्याचे टीडीएस कमी केले जाते. पिण्याचे पाणी म्हणून विकल्या जाणाऱ्या खाजगी टँकरला कुणाचे लायसेन्स असावे. असा मुद्दा पुढे आला आहे.मनपाने लोकमतच्या वृत्तानंतर नोंदणी सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आहे. तर अन्न व औषधी प्रशासन याबाबत टोलवाटोलवी करीत आहे. बाटलीबंद पाण्याच्या विक्रीसाठी औषधी प्रशासनाचा परवाना लागतो. मग टँकरची नोंदणी व लायसेन्स देण्यासाठी प्रशासन गाफील का राहिले, असा प्रश्न आहे. २०११ पासून शासनाच्या आदेशानुसार मनपाकडून कोणतीही अन्न व औषधीशी निगडित परवानगी मिळत नाही. तीन वर्षांपासून एफडीएकडून परवानगी मिळते. पाणी हा जीवनावश्यक घटक आहे. दूषित पाण्यामुळे अनेक आजार होतात. दूषित पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरचालकांवर मनपाने गुन्हे दाखल करावेत, असे सांगून एफडीएच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली आहे. लायसेन्सची जबाबदारी आमच्याकडे नाही औरंगाबाद : अन्न व औषध प्रशासनाकडून फक्त मिनरल वॉटर, पॅकबंद पाण्यासाठी परवानगी देण्यात येते. मात्र, पाण्याच्या टँकरला परवानगी देण्याची जबाबदारी आमच्यावर नाही. ही जबाबदारी महानगरपालिकेची आहे. मुळात विहिरीतील पाणी विकण्याची कायद्याने परवानगी नाहीच. गटारातील पाण्याचा पुरवठा नागरिकांना करणाऱ्या खाजगी टँकरचालकांवर गुन्हे दाखल करावेत, असे मत अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके यांनी व्यक्त केले. अन्नसुरक्षा मानक २००६ नुसार नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी कायद्यात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. कोणत्याही पाण्याचे शुद्धीकरण करूनच ते नागरिकांना द्यावे, तसेच विहिरीचे पाणी विकता येत नाही, असा कायदा आहे. मात्र, विहीरमालक पाण्याची कोणतीही तपासणी न करता अवैधरीत्या पाणी विकत असतील तर तो गुन्हा आहे. तसेच खाजगी टँकरद्वारे असा अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असेल तर तो ३२८ नुसार गुन्हा आहे. नागरिकांच्या जीवितास हानी पोहोचविणाऱ्या या टँकरचालकांवरही गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच मनपाने टँकरची दर महिन्याला तपासणी करावी. टँकरला आतून गंज चढलेला आहे का, याचीही दक्षता घ्यावी.