शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्रियेनंतरच्या कचऱ्याला आग लावण्याच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:02 IST

औरंगाबाद : महापालिका प्रशासन शहरातील कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने होत असल्याचा दावा करीत असले तरी चिकलठाणा येथील कचरा प्रकल्प ...

औरंगाबाद : महापालिका प्रशासन शहरातील कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने होत असल्याचा दावा करीत असले तरी चिकलठाणा येथील कचरा प्रकल्प परिसरात प्रक्रिया करून उरलेला कचरा जाळण्याचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

या प्रकारामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. त्यातच भटक्या कुत्र्यांचा त्रास देखील वाढल्याने नारेगाव डेपोनंतर कचरा डेपोचा नवीन अध्याय चिकलठाण्यासह इतर प्रक्रिया प्रकल्प आवारात सुरू झाल्याचे दिसत आहे. यावर पालिका प्रशासन सध्या तरी गप्प आहे.

नारेगाव येथे कचरा टाकण्याला विरोध करणारे जनआंदोलन झाल्यानंतर शासनाने पालिकेला कचरा प्रक्रिया प्रकल्पांसाठी १०० कोटींहून अधिक रुपयांचा निधी दिला. त्यातून चिकलठाणा, पडेगाव व कांचनवाडी भागात कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आला. चिकलठाणा व कांचनवाडी प्रक्रिया प्रकल्पात कचऱ्यापासून खत निर्मिती होत असली तरी दरमहा हजारो टन वेस्टेज कचरा खतनिर्मितीविना बाहेर पडत आहे. प्लास्टिक, कुजलेल्या कपड्यांसह इतर साहित्याचा त्यात समावेश असतो. तो कचरा पेटवून देण्याचा सपाटा मनपा नियुक्त कंत्राटदाराने लावल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. प्रकल्पाच्या पाठीमागे कचऱ्याचे ढीग साचले असून, ते कमी करण्यासाठी आग लावली जात असल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. दरम्यान, याप्रकरणी मनपाचे घनकचरा प्रकल्पप्रमुख नंदकिशोर भोंबे यांना संपर्क केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

भाजीपाल्याचे नुकसान

कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या परिसरातील शेतात भाजीपाल्याची लागवड केली जाते. मात्र, कचऱ्यामुळे माशांचे प्रमाण वाढले. या माशांमुळे भाजीपाल्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. कचऱ्याच्या धुरामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याने शेतीत काम करणे अवघड झाले आहे. चिकलठाणा व पडेगाव येथील प्रकल्पांची क्षमता दररोज दीडशे टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची आहे. मात्र, येथे जास्त कचरा आणला जातो. चिकलठाण्यात दररोज सुमारे दोनशे टन कचरा टाकला जातो. त्यामुळे कचऱ्याचे ढीग वाढले आहेत.