शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
3
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
4
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
5
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
6
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
7
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
9
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
10
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
11
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
12
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
13
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
14
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
15
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
16
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
17
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
18
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
19
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
20
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

प्रक्रियेनंतरच्या कचऱ्याला आग लावण्याच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:02 IST

औरंगाबाद : महापालिका प्रशासन शहरातील कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने होत असल्याचा दावा करीत असले तरी चिकलठाणा येथील कचरा प्रकल्प ...

औरंगाबाद : महापालिका प्रशासन शहरातील कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने होत असल्याचा दावा करीत असले तरी चिकलठाणा येथील कचरा प्रकल्प परिसरात प्रक्रिया करून उरलेला कचरा जाळण्याचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

या प्रकारामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. त्यातच भटक्या कुत्र्यांचा त्रास देखील वाढल्याने नारेगाव डेपोनंतर कचरा डेपोचा नवीन अध्याय चिकलठाण्यासह इतर प्रक्रिया प्रकल्प आवारात सुरू झाल्याचे दिसत आहे. यावर पालिका प्रशासन सध्या तरी गप्प आहे.

नारेगाव येथे कचरा टाकण्याला विरोध करणारे जनआंदोलन झाल्यानंतर शासनाने पालिकेला कचरा प्रक्रिया प्रकल्पांसाठी १०० कोटींहून अधिक रुपयांचा निधी दिला. त्यातून चिकलठाणा, पडेगाव व कांचनवाडी भागात कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आला. चिकलठाणा व कांचनवाडी प्रक्रिया प्रकल्पात कचऱ्यापासून खत निर्मिती होत असली तरी दरमहा हजारो टन वेस्टेज कचरा खतनिर्मितीविना बाहेर पडत आहे. प्लास्टिक, कुजलेल्या कपड्यांसह इतर साहित्याचा त्यात समावेश असतो. तो कचरा पेटवून देण्याचा सपाटा मनपा नियुक्त कंत्राटदाराने लावल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. प्रकल्पाच्या पाठीमागे कचऱ्याचे ढीग साचले असून, ते कमी करण्यासाठी आग लावली जात असल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. दरम्यान, याप्रकरणी मनपाचे घनकचरा प्रकल्पप्रमुख नंदकिशोर भोंबे यांना संपर्क केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

भाजीपाल्याचे नुकसान

कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या परिसरातील शेतात भाजीपाल्याची लागवड केली जाते. मात्र, कचऱ्यामुळे माशांचे प्रमाण वाढले. या माशांमुळे भाजीपाल्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. कचऱ्याच्या धुरामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याने शेतीत काम करणे अवघड झाले आहे. चिकलठाणा व पडेगाव येथील प्रकल्पांची क्षमता दररोज दीडशे टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची आहे. मात्र, येथे जास्त कचरा आणला जातो. चिकलठाण्यात दररोज सुमारे दोनशे टन कचरा टाकला जातो. त्यामुळे कचऱ्याचे ढीग वाढले आहेत.