शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी
2
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २० नक्षली ठार
3
“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा
4
Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता
5
“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात!
7
पाकचे गिरे तो भी टांग उपर; लष्करप्रमुख मुनीरचे प्रमोशन, फिल्ड मार्शल पदावर बढती; 
8
तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट
9
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
10
Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?
11
हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....
12
लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट
13
ओलाच्या रोडस्टर मोटरसायकलची डिलिव्हरी केव्हापासून? मालकाने जाहीर केली तारीख...
14
नौदलाला आज असे जहाज मिळणार, जगात कोणत्याही नौदलाकडे नाही; पाचव्या शतकातील आरमाराची ताकद जगभ्रमंतीला निघणार...
15
IPL 2025: जोश हेझलवूडने RCB फॅनसोबत केलं 'असं' कृत्य; Video पाहून तुम्हालाही येईल राग
16
"झावळ्यांमधून पोरांनी आम्हाला कपडे बदलताना पाहिलं आणि.."; उषा नाडकर्णींनी सांगितला भयानक अनुभव
17
"मलाच धक्का बसलाय..." परेश रावल यांच्या 'हेरा फेरी ३' सोडण्यावर सुनील शेट्टीची प्रतिक्रिया
18
आणखी एक ज्योती? १२ वर्षांच्या मुलाला सोडून नागपूरची महिला कारगिलमधून गायब, पाकिस्तानी नंबरवर झालेली फोनाफोनी
19
Akhilesh Yadav : "भाजपाची चूक नेहमीच लोकांसाठी जीवघेणी"; कोरोनाबद्दल अखिलेश यादव यांचा गंभीर इशारा
20
६ तास कसून चौकशी, अनेक बँकांत खाती; काही प्रश्नांची उत्तरे ज्योतीला देताच आली नाहीत?

प्रक्रियेनंतरच्या कचऱ्याला आग लावण्याच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:02 IST

औरंगाबाद : महापालिका प्रशासन शहरातील कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने होत असल्याचा दावा करीत असले तरी चिकलठाणा येथील कचरा प्रकल्प ...

औरंगाबाद : महापालिका प्रशासन शहरातील कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने होत असल्याचा दावा करीत असले तरी चिकलठाणा येथील कचरा प्रकल्प परिसरात प्रक्रिया करून उरलेला कचरा जाळण्याचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

या प्रकारामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. त्यातच भटक्या कुत्र्यांचा त्रास देखील वाढल्याने नारेगाव डेपोनंतर कचरा डेपोचा नवीन अध्याय चिकलठाण्यासह इतर प्रक्रिया प्रकल्प आवारात सुरू झाल्याचे दिसत आहे. यावर पालिका प्रशासन सध्या तरी गप्प आहे.

नारेगाव येथे कचरा टाकण्याला विरोध करणारे जनआंदोलन झाल्यानंतर शासनाने पालिकेला कचरा प्रक्रिया प्रकल्पांसाठी १०० कोटींहून अधिक रुपयांचा निधी दिला. त्यातून चिकलठाणा, पडेगाव व कांचनवाडी भागात कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आला. चिकलठाणा व कांचनवाडी प्रक्रिया प्रकल्पात कचऱ्यापासून खत निर्मिती होत असली तरी दरमहा हजारो टन वेस्टेज कचरा खतनिर्मितीविना बाहेर पडत आहे. प्लास्टिक, कुजलेल्या कपड्यांसह इतर साहित्याचा त्यात समावेश असतो. तो कचरा पेटवून देण्याचा सपाटा मनपा नियुक्त कंत्राटदाराने लावल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. प्रकल्पाच्या पाठीमागे कचऱ्याचे ढीग साचले असून, ते कमी करण्यासाठी आग लावली जात असल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. दरम्यान, याप्रकरणी मनपाचे घनकचरा प्रकल्पप्रमुख नंदकिशोर भोंबे यांना संपर्क केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

भाजीपाल्याचे नुकसान

कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या परिसरातील शेतात भाजीपाल्याची लागवड केली जाते. मात्र, कचऱ्यामुळे माशांचे प्रमाण वाढले. या माशांमुळे भाजीपाल्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. कचऱ्याच्या धुरामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याने शेतीत काम करणे अवघड झाले आहे. चिकलठाणा व पडेगाव येथील प्रकल्पांची क्षमता दररोज दीडशे टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची आहे. मात्र, येथे जास्त कचरा आणला जातो. चिकलठाण्यात दररोज सुमारे दोनशे टन कचरा टाकला जातो. त्यामुळे कचऱ्याचे ढीग वाढले आहेत.