शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

वैयक्तिक सिंचन विहिरींची कामे बंद

By admin | Updated: December 24, 2014 01:00 IST

जालना : गेल्या चार वर्षांपासून वैयक्तिक लाभाच्या अव्वा की सव्वा विहिरींच्या कामांना मंजुरी देऊन कुशल देयके कोट्यवधीपर्यंत थकीत आहेत.

जालना : गेल्या चार वर्षांपासून वैयक्तिक लाभाच्या अव्वा की सव्वा विहिरींच्या कामांना मंजुरी देऊन कुशल देयके कोट्यवधीपर्यंत थकीत आहेत. तर मंजुरीपैकी ५० टक्केही कामे अद्याप झालेली नाहीत. त्यामुळे मग्रारोहयोतून वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरींची कामे जवळपास बंद करण्याचा निर्णय सरकारी यंत्रणेने घेतला आहे.२०१०-११ या वर्षापासून मग्रारोहयोअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या ११ हजार २७ सिंचन विहिरींना मंजुरी देण्यात आलेली आहे. मात्र या विहिरींची कामे करताना ६०:४० चे प्रमाण राखण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. मनुष्यबळाचा मोबदला दिला जातो. मात्र साहित्यावरचा खर्च देणे शक्य होत नाही. त्यामुळे कुशलचे पेमेंट कोट्यवधी रुपयांपर्यंत थकीत झाले. परिणामी प्रशासकीय कामात अडचणी निर्माण होऊ लागल्या. ६०:४० चे प्रमाण राखणे मुश्किल झाले. त्यामुळे आता २०१४-१५ पासून वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरींना मान्यता देणे जवळपास बंद झाले आहे. त्याऐवजी रस्ते, नालाबांध, संरक्षण भिंती इत्यादी कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. विहिरींची जी कामे मंजुर आहेत, ती पूर्ण करण्यात येणार आहेत. परंतु नवीन मंजुरी देण्यात येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मग्रारोहयोअंतर्गत जिल्ह्यात मंजुर असलेल्या ११ हजार २७ विहिरींच्या कामांपैकी ८ हजार ६३७ कामे हाती घेण्यात आली. त्यापैकी ३ हजार ९२४ कामे पूर्ण झाली. तर ४ हजार ७१३ कामे अपूर्ण आहेत. अपूर्ण कामांमध्ये अंबड तालुक्यात २५८, बदनापूर ४६१, भोकरदन ५८६, घनसावंगी ११८७, जाफराबाद २४३, जालना ३६१, मंठा १०९०, परतूर तालुक्यात ५२७ कामांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)सरकारी यंत्रणेने घेतलेल्या या निर्णयामुळे काही पुढाऱ्यांच्या आततायीपणाला आळा बसणार आहे. प्रशासकीय यंत्रणेवर दबावतंत्राचा वापर करून काही मंडळींनी एवढ्या मोठ्या संख्येने विहिरींच्या कामांना मान्यता घ्यावयास लागली, असे सूत्रांनी सांगितले. एकूण मंजुर विहिरींच्या कामांमध्ये अंबड तालुक्यात ७४०, बदनापूर १७४६, भोकरदन २२९०, घनसावंगी १८४९, जाफराबाद ६३८, जालना ९८६, मंठा १६५७, परतूर तालुक्यात ११२१ कामांचा समावेश आहे.