शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

दीड हजार कोटींच्या नुकसानीचा दावा

By admin | Updated: December 16, 2014 01:04 IST

जालना : जिल्ह्यात अल्पसा पाऊस व गारपिटीमुळे कापूस, सोयाबीन आणि मका या पिकांचे अपेक्षित सरासरीच्या तुलनेत १५६० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा

जालना : जिल्ह्यात अल्पसा पाऊस व गारपिटीमुळे कापूस, सोयाबीन आणि मका या पिकांचे अपेक्षित सरासरीच्या तुलनेत १५६० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने केंद्रीय पथकाकडे सादर करण्यात आली.सोमवारी बदनापूर व जालना तालुक्यातील एकूण सहा ठिकाणी भेट देऊन केंद्रीय पथकाने दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. केंद्रीय सचिव आर.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील या पथकात चार जणांचा सहभाग होता. या पथकाने सकाळी सोमठाणा येथील कोरड्या पडलेल्या अप्पर दुधना प्रकल्पासह बदनापूर, गेवराई (बाजार), गोकुळवाडी, गोंदेगाव, वाघ्रुळ जहांगीर या ठिकाणी काही शेतकऱ्यांच्या शेतपिकांची पाहणी केली. जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी केंद्रीय पथकाकडे दिलेल्या माहितीनुसार, एकूण ४ लाख ६१ हजार १५३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. कपाशीचे २ लाख ९४ हजार हेक्टर, सोयाबीन १ लाख ९ हजार २५६ हेक्टर तर मक्याचे पीक ५७ हजार ६५४ हेक्टर क्षेत्रात बाधित झाले आहे. जिल्ह्यात यंदा एकूण सरासरीच्या ५४ टक्केच पाऊस झाल्याने ७ पैकी १ मध्यम तर ५७ पैकी ८ लघुप्रकल्प कोरडे पडले आहेत. अनेक विहिरीही कोरड्या पडल्या असून काहींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पिकांनाही पुरेसे पाणी मिळाले नाही.कपाशीचे पीक वाळून गेले आहे. सोयाबीनची लागवड खुंटली. तर सध्या रब्बी पिकांनाही मोठ्या प्रमाणावर फटका असला आहे. ४बदनापूर : तालुक्यातील सोमठाणा, गोकुळवाडी व बाजार गेवराई शिवारातील शेतकऱ्यांनी सोमवारी दुष्काळाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकातील सदस्यांसमोर आपल्या व्यथा मांडल्या. पथकातील सदस्यांनी विविध बाबींची माहिती येथील शेतकऱ्यांकडून जाणून घेतली. सोमठाणा येथील अप्पर दुधना या या धरणावर पाहणी करण्याकरीता येणाऱ्या पथकासाठी अधिकाऱ्यांनी मिनरल वॉटरच्या बॉटल व बिस्कीट पुडे ठेवलेले होते. मात्र या पथकाने तिकडे जाणे टाळले. यावेळी दुधनवाडीचे सरपंच पद्माकर पडूळ, जि.प.सदस्य बाळासाहेब वाकुळणीकर, गणेश कोलते, रामपाल तापडीया, भडांगे आदींसह अनेकांनी या पथकासमोर व्यथा मांडल्या.गेल्या दोन वर्षापूर्वी या जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती उद्भवली होती. विशेषत: राज्यात अन्य जिल्ह्याच्या तुलनेत या जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती भयावह होती. आवर्षणामुळे खरीपापाठोपाठ रबी पिके पूर्णत: कोलमडली. त्यातून शेतकरी उद्धवस्त झाला होता. या गोष्टीची जिल्हाधिकारी नायक यांनी केंद्रीय पथकास नोंद घ्यायला लावली. त्या दुष्काळातून जिल्हा सावरत असताना गेल्या वर्षी गारपीटीच्या तडाख्याने पुन्हा शेतीसह शेतकऱ्यांना तडाखा बसल्याचे निदर्शनास आणून दिले. दोन वर्षातील या आपत्तीने शेतकरी खचला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचे विपरित परिणाम झाले असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी आवर्जुन निदर्शनास आणून दिले. या जिल्ह्यात कायमस्वरूपी उपाय अवलंबिण्यासंदर्भात दुरोगामी अशी धोरणे आखणे गरजेचे आहे, असे मतही व्यक्त केले. समितीच्या सदस्यांनी त्यांचे हे म्हणणे गांभिर्याने ऐकून घेतले.