शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला हरविण्याकडे शहराची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात दोन महिने कोरोनाच्या हाहाकारानंतर आता शहरात दिलासादायक चित्र पहायला मिळत आहे. रोज निदान होणाऱ्या शहरातील रुग्णसंख्येत ...

औरंगाबाद : जिल्ह्यात दोन महिने कोरोनाच्या हाहाकारानंतर आता शहरात दिलासादायक चित्र पहायला मिळत आहे. रोज निदान होणाऱ्या शहरातील रुग्णसंख्येत घट होत असून, जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या एकूण रुग्णांपैकी केवळ ३० टक्के रूग्ण शहरातील आहेत. तर तब्बल ७० टक्के रूग्ण ग्रामीण भागातील आहे. कोरोनाला हरविण्याकडे शहराची वाटचाल सुरू आहे. परंतु ग्रामीण भागात रुग्णांची अद्यापही संख्या वाढतच आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात फेब्रुवारीनंतर कोरोनाने अक्षरश: कहर केला. अवघ्या काही दिवसांत ५० हजारांवर रुग्णांची भर पडली. रुग्णालयांतील खाटा रुग्णांनी भरून गेल्या. परंतु गेल्या काही दिवसांपासून शहरात नव्या रुग्णांपेक्षा काेरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आलेख घसरत गेला. जिल्ह्यात ५ मे रोजी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ९ हजार ४४४ होती. यात शहरातील रुग्णांची संख्या फक्त २ हजार ७८५ आहे. तर ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या ६ हजार ६५९ आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात राेज अधिक रुग्णांचे निदान होत आहे. तर शहरात रुग्ण कमी होत असल्याची स्थिती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध, अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडणे आदींमुळे शहरात कोरोना आटोक्यात येत असल्याची स्थिती आहे.

-------

३६ दिवसांत १० हजारांवरून २ हजारांवर

३१ मार्च रोजी शहरात १० हजार ९१५ रुग्ण उपचार घेत होते. ही संख्या बुधवारी २ हजार ७८५ झाली. त्या उलट ग्रामीण भागात ३१ मार्च रोजी ४ हजार ६५५ रुग्ण उपचार घेत होते. ही संख्या बुधवारी ६ हजार ६५९ झाली. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे म्हटले जात आहे.

-------

शहराचा रिकव्हरी रेट-९४.५२ टक्के

शहरात असा घसरला आलेख

तारीख नवे रुग्ण- उपचार घेणारे रुग्ण

२६ एप्रिल- ४९७ -४९४८

२७ एप्रिल- ५९४ - ४७८३

२८ एप्रिल- ५३० - ४७०५

२९ एप्रिल- ४५६ - ४४४९

३० एप्रिल- ४२९ -४३०९

१ मे- ४८२ - ४१७१

२ मे- ३७३ - ४०१८

३ मे- ३२० - ३६३२

४ मे- ३७४ - ३१४६

५ मे- ३८१ - २७८५

---

---

ब्रेक द चेन, लसीकरण, स्वयंशिस्तीचा फायदा

ब्रेक द चेनचे गाईडलाईन, लसीकरण आणि नागरिकांची स्वयंशिस्त यामुळे शहरात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. परंतु आपल्याला गाफील राहता येणार नाही. धोका अजूनही आहे. तिसऱ्या लाटेची तयारी करावी लागणार आहे. त्यासाठी आरोग्य सुविधेत सुधारणा, आणखी वैद्यकीय सुविधेच्या इमारती, नागरिकांत त्रिसूत्रीबद्दल आणखी जागरूकता आणि स्वयंशिस्त, तसेच लसीकरणाची गती वाढविण्याची गरज आहे. या सर्व गोष्टींमुळे पुढील लाटेत औरंगाबाद शहर, नागरिक सुरक्षित राहतील.

-आस्तिककुमार पांडेय, मनपा आयुक्त