शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

शहरात दोन मार्गांवर आजपासून शहर बस

By admin | Updated: August 1, 2014 01:08 IST

औरंगाबाद : एस. टी. महामंडळाने १ आॅगस्टपासून शहर बससेवेत वाढ केली आहे. प्रारंभी चिकलठाणा-महावीर चौक आणि शहागंज- रेल्वेस्थानक या मार्गांवरील बससेवा वाढविली जाणार आहे.

औरंगाबाद : एस. टी. महामंडळाने १ आॅगस्टपासून शहर बससेवेत वाढ केली आहे. प्रारंभी चिकलठाणा-महावीर चौक आणि शहागंज- रेल्वेस्थानक या मार्गांवरील बससेवा वाढविली जाणार आहे. या मार्गावर दर दहा मिनिटांनी बस धावतील, असे नियोजन करण्यात आले आहे.शहर बससेवेत वाढ करण्याची सूचना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी १४ जुलै रोजी स्थानिक अधिकाऱ्यांना केली. चिकलठाणा - महावीर चौक मार्गावर १० बसेस सोडण्यात येत असून, दिवसभरात जवळपास १६० फेऱ्या होतील तर शहागंज- रेल्वेस्थानक मार्गावर ७ बसेस सोडण्यात येणार (दिवसभरात १६८ फेऱ्या) आहेत. दर दहा मिनिटांनी बस उपलब्ध असेल, असे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील विविध मार्गांवर जवळपास ४० बस धावत असल्या तरी वाढत्या प्रवाशांच्या तुलनेत त्या अपुऱ्या आहेत. बस येण्याची वेळ निश्चित नसल्यामुळे प्रवाशांना रिक्षा, अ‍ॅपेरिक्षांतून प्रवास करावा लागतो.प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे महामंडळाच्या अध्यक्षांना स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलेहोते. मात्र, यापूर्वी काय केले हे महत्त्वाचे नसून ज्या ठिकाणी मागणी होते तेथे शहर बससेवा सुरू केली पाहिजे, असे सांगून शहर बससेवेत वाढ करण्यासाठी नव्याने नियोजन करण्याची सूचना अध्यक्षांनी केली होती.बससेवेत वाढशुक्रवारपासून चिकलठाणा - महावीर चौक मार्गावर १० आणि शहागंज- रेल्वेस्थानक मार्गावर ७ शहर बस धावतील, अशी माहिती विभाग नियंत्रक संजय सुपेकर यांनी दिली.बसला क्रमांक अध्यक्षांच्या सूचनेनंतर प्रत्येक बसथांब्यावर वेळापत्रकाचा फलक, तसेच बसला क्रमांक देण्याचे नियोजन करण्यात येणार होते. प्रत्यक्षात कितपत अंमलबजावणी करण्यात आली, हे शुक्रवारी स्पष्ट होईल.