शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

शहरात दोन मार्गांवर आजपासून शहर बस

By admin | Updated: August 1, 2014 01:08 IST

औरंगाबाद : एस. टी. महामंडळाने १ आॅगस्टपासून शहर बससेवेत वाढ केली आहे. प्रारंभी चिकलठाणा-महावीर चौक आणि शहागंज- रेल्वेस्थानक या मार्गांवरील बससेवा वाढविली जाणार आहे.

औरंगाबाद : एस. टी. महामंडळाने १ आॅगस्टपासून शहर बससेवेत वाढ केली आहे. प्रारंभी चिकलठाणा-महावीर चौक आणि शहागंज- रेल्वेस्थानक या मार्गांवरील बससेवा वाढविली जाणार आहे. या मार्गावर दर दहा मिनिटांनी बस धावतील, असे नियोजन करण्यात आले आहे.शहर बससेवेत वाढ करण्याची सूचना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी १४ जुलै रोजी स्थानिक अधिकाऱ्यांना केली. चिकलठाणा - महावीर चौक मार्गावर १० बसेस सोडण्यात येत असून, दिवसभरात जवळपास १६० फेऱ्या होतील तर शहागंज- रेल्वेस्थानक मार्गावर ७ बसेस सोडण्यात येणार (दिवसभरात १६८ फेऱ्या) आहेत. दर दहा मिनिटांनी बस उपलब्ध असेल, असे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील विविध मार्गांवर जवळपास ४० बस धावत असल्या तरी वाढत्या प्रवाशांच्या तुलनेत त्या अपुऱ्या आहेत. बस येण्याची वेळ निश्चित नसल्यामुळे प्रवाशांना रिक्षा, अ‍ॅपेरिक्षांतून प्रवास करावा लागतो.प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे महामंडळाच्या अध्यक्षांना स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलेहोते. मात्र, यापूर्वी काय केले हे महत्त्वाचे नसून ज्या ठिकाणी मागणी होते तेथे शहर बससेवा सुरू केली पाहिजे, असे सांगून शहर बससेवेत वाढ करण्यासाठी नव्याने नियोजन करण्याची सूचना अध्यक्षांनी केली होती.बससेवेत वाढशुक्रवारपासून चिकलठाणा - महावीर चौक मार्गावर १० आणि शहागंज- रेल्वेस्थानक मार्गावर ७ शहर बस धावतील, अशी माहिती विभाग नियंत्रक संजय सुपेकर यांनी दिली.बसला क्रमांक अध्यक्षांच्या सूचनेनंतर प्रत्येक बसथांब्यावर वेळापत्रकाचा फलक, तसेच बसला क्रमांक देण्याचे नियोजन करण्यात येणार होते. प्रत्यक्षात कितपत अंमलबजावणी करण्यात आली, हे शुक्रवारी स्पष्ट होईल.