शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

नागरिकांना नैसर्गिक विधीची धास्ती !

By admin | Updated: January 8, 2017 23:53 IST

जालना जालना शहरात पाय ठेवलेल्यांना धास्ती असते ती नैसर्गिक साद आल्यास त्याला कुठे प्रतिसाद द्यावा

हरी मोकाशे जालनानैसर्गिक साद आली की त्यास प्रतिसाद द्यावाच लागतो. परंतु, जालना शहरात पाय ठेवलेल्यांना धास्ती असते ती नैसर्गिक साद आल्यास त्याला कुठे प्रतिसाद द्यावा. शहरात केवळ दोनच सार्वजनिक स्वच्छतागृहे असल्याने अडोश्याची जागा पाहून ‘मोकळे’ व्हावे लागते. हागणदरीमुक्तीचा गवगवा करणाऱ्या नगर पालिकेचे नियोजन मात्र कागदावरच राहात असल्याचे पहावयास मिळत आहे.औद्योगिक क्षेत्रामुळे विविध साहित्य खरेदीसाठी शहरात दररोज हजारो व्यापाऱ्यांची वर्दळ असते. त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणामुळे विविध कामांसाठी ये- जा करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. परंतु, शहरात दाखल होणाऱ्यांना भिती असते ती लघुशंकेची. शहरात केवळ दोन ठिकाणीच सुलभ शौचालये असल्याने परगावाहून आलेल्यांची धावाधावच सुरु असल्याचे पहावयास मिळते.शहरातील फुलबाजार, भोकरदन नाका, मामा चौक, पाणीवेस, गरीबशहा बाजार, मम्मादेवी चौक, शनि मंदिर, सराफा बाजार, महात्मा फुले मार्केट, अलंकार चौक, टांगा थांबा यासह जुन्या जालना शहरातील शनि मंदिर, भाजी मंडई आणि गस्तगड हे नेहमी गजबजलेले प्रमुख चौक असतात. परंतु, या ठिकाणी ना स्वच्छतागृह ना लघुशंका. त्यामुळे येथे आलेल्या नागरिकांना लघुशंका आल्यास भीतीच बसते. ती उरकण्यासाठी चक्क उघड्या जागेचा वापर करावा लागतो. स्वच्छतागृह, लघुशंकागृह नसल्याचे महिलांची मोठी कुचंबना होत आहे.तीन ठिकाणी नियोजन...शहरात सध्या १० सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. त्यातील काहींची पडझड झाली असल्याने बंद आहेत. तसेच चार- पाच ठिकाणी लघुशंकागृहे असली तरी त्यातील दोन मोडकळीस आली आहेत. सध्या स्वच्छतेचा सर्व्हे सुरु असून फुले मार्केट, बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्याचे नियोजन असल्याचे नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे अभियंता रत्नाकर अडसरे यांनी सांगितले.