शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

नागरिकांचा जागता पहारा

By admin | Updated: June 30, 2014 00:39 IST

राजूर : गेल्या दीड महिन्यात चोरट्यांनी राजूरसह परिसरातील नागरिकांची झोप उडवली आहे.

राजूर : गेल्या दीड महिन्यात चोरट्यांनी राजूरसह परिसरातील नागरिकांची झोप उडवली आहे. कायम चोऱ्यांच्या घटना घडत असल्याने पोलिसांबरोबरच आता नागरिकांनीही रात्रभर जागता पहारा ठेवण्यास सुरूवात केली आहे. मात्र चोरट्यांकडून गावकऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे अद्याप एकाही चोरीचा तपास लावण्यात हसनाबाद पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे.गेल्या दीड महिन्यात राजुरातून चारचाकी, दुचाकी वाहने चोरट्यांनी लंपास केली. त्यातच गेल्या शनिवारी चोरट्यांनी राजूर येथील दिनकर पुंगळे व चणेगाव शिवारातील बिटले यांच्या घरात घुसून मारहाण करून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज लंपास केला. त्यामुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. त्यानंतर किरकोळ चोऱ्यांचे सत्र सुरूच असल्याने राजूरसह परिसरातील गावातील नागरिक हवालदिल झाले आहेत. राजूर, तपोवन, चांधई एक्को, खामखेडा, चांधई ठोंबरी येथील बहुतांशी नागरिक वस्त्यावर राहतात. वस्तीवरील नागरिकांनी समुहाने रात्रीची गस्त सुरु केली आहे.राजुरात सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ हे कर्मचाऱ्यांसह युवकांना सोबत घेऊन रात्रीची गस्त घालीत आहेत. मात्र चोऱ्यांच्या अफवा सुटतच असल्याने जनता भयभीत झाली आहे. गावागावातील काही टवाळखोर दुसऱ्यांच्या घरावर दगडे मारून चोरटे आल्याची अफवा पसरवण्याचे काम करीत आहेत. पोलिसांनी चोरट्यांसह अफवा पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे. (वार्ताहर)अफवांचे पेव फुटले.. राजूर परिसरात काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. अशातच चोरटे आले, पळा.., घरावर दगडफेक करण्याचे प्रकार वाढले आहेत. चोरट्यांसोबतच काही टवाळखोरांची दहशत ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. राजूरसह परिसरात पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. राजूर परिसरातील तीस ते चाळीस गावांचे केंद्रबिंदू असल्याने मोठ व्यापारीपेठ आहे. या दृष्टीने हे बंदोबस्त वाढविण्याची मागणी होत आहे.