शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

३३१ जणांच्या सदस्यत्वावर गंडांतर !

By admin | Updated: October 29, 2014 00:44 IST

उस्मानाबाद : शौचालयाचे बांधकाम करुन त्याचा नियमितपणे वापर करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येते

उस्मानाबाद : शौचालयाचे बांधकाम करुन त्याचा नियमितपणे वापर करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येते. असे असतानाही जिल्हाभरातील सुमारे ३३१ सदस्यांनी शौचालय बांधून वापर केला जात नसल्याचा प्रकार चौकशीतून समोर आला. त्यानंतर याबाबतीत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी झाली. सुनावनीअंती अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाभरातील सुमारे ३३१ सदस्यांना अपात्र घोषीत करण्यात आले आहे. त्यामुळे गावपुढाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जिल्हाभरातील शौचालय नसलेल्या गावपुढाऱ्यांना ते बांधून घेण्यासाठी वारंवार मुदत देण्यात आली. मात्र अनेक पुढाऱ्यांनी ‘आपले कोण काय करणार’ या अविर्भावात राहून शौचालय बांधण्याकडे कानाडोळा केला. या संदर्भात जिल्हा परिषदेकडून सर्व संबंधितांना वारंवार नोटीसाही देण्यात आल्या. कारवाईची भितीही दाखविण्यात आली. मात्र याचा संबंधितावर काहीच उपयोग झाला नाही. अखेर जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अशा एक हजारावर सदस्यांना अपात्र करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. २०१२ मध्ये दाखल केलेल्या या प्रस्तावावर प्रशासनाकडून वारंवार सुनावण्या घेण्यात आल्या. सुनावणी दरम्यान अनेकांनी शौचालय बांधून वापर करण्याबाबतचे लेखी दिले. त्यानुसार काही जणांनी शौचालय बांधूनही घेतली. मात्र प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या मुदतीतही अनेकांनी शौचालय बांधलेच नाहीत. यापैकी सध्या अनेकजण सदरील पदावरुन पायउतार झाले आहेत. काहीजण दगावले आहेत. त्यामुळे प्रशासनाने जे सदस्य पदावर कार्यरत आहेत त्यांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन केले नाही, अशा ग्रामपंचायत पुढाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. अपात्रतेची कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये सर्वाधिक १२४ सदस्य हे एकट्या परंडा तालुक्यातील आहेत. त्यानंतर भूम तालुक्यातील ५४, उस्मानाबाद तालुक्यातील २४, तुळजापूर तालुक्यातील २१, कळंब तालुक्यातील ३७, लोहारा तालुक्यातील २५ आणि वाशी तालुक्यातील ९ सदस्यांचा समावेश आहे. या सर्व तालुक्यांचा एकूण संख्येचा विचार केला असता, अपात्रतेची कारवाई करण्यात आलेल्या गावपुढाऱ्यांची संख्या ३३१ इतकी झाली आहे. प्रशासनाने उचललेल्या या कठोर पावलामुळे गावपुढाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. यातील अनेक सदस्यांचा ८ ते १२ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे हे सदस्य आता कुठली भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (प्रतिनिधी)