शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

३३१ जणांच्या सदस्यत्वावर गंडांतर !

By admin | Updated: October 29, 2014 00:44 IST

उस्मानाबाद : शौचालयाचे बांधकाम करुन त्याचा नियमितपणे वापर करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येते

उस्मानाबाद : शौचालयाचे बांधकाम करुन त्याचा नियमितपणे वापर करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येते. असे असतानाही जिल्हाभरातील सुमारे ३३१ सदस्यांनी शौचालय बांधून वापर केला जात नसल्याचा प्रकार चौकशीतून समोर आला. त्यानंतर याबाबतीत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी झाली. सुनावनीअंती अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाभरातील सुमारे ३३१ सदस्यांना अपात्र घोषीत करण्यात आले आहे. त्यामुळे गावपुढाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जिल्हाभरातील शौचालय नसलेल्या गावपुढाऱ्यांना ते बांधून घेण्यासाठी वारंवार मुदत देण्यात आली. मात्र अनेक पुढाऱ्यांनी ‘आपले कोण काय करणार’ या अविर्भावात राहून शौचालय बांधण्याकडे कानाडोळा केला. या संदर्भात जिल्हा परिषदेकडून सर्व संबंधितांना वारंवार नोटीसाही देण्यात आल्या. कारवाईची भितीही दाखविण्यात आली. मात्र याचा संबंधितावर काहीच उपयोग झाला नाही. अखेर जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अशा एक हजारावर सदस्यांना अपात्र करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. २०१२ मध्ये दाखल केलेल्या या प्रस्तावावर प्रशासनाकडून वारंवार सुनावण्या घेण्यात आल्या. सुनावणी दरम्यान अनेकांनी शौचालय बांधून वापर करण्याबाबतचे लेखी दिले. त्यानुसार काही जणांनी शौचालय बांधूनही घेतली. मात्र प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या मुदतीतही अनेकांनी शौचालय बांधलेच नाहीत. यापैकी सध्या अनेकजण सदरील पदावरुन पायउतार झाले आहेत. काहीजण दगावले आहेत. त्यामुळे प्रशासनाने जे सदस्य पदावर कार्यरत आहेत त्यांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन केले नाही, अशा ग्रामपंचायत पुढाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. अपात्रतेची कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये सर्वाधिक १२४ सदस्य हे एकट्या परंडा तालुक्यातील आहेत. त्यानंतर भूम तालुक्यातील ५४, उस्मानाबाद तालुक्यातील २४, तुळजापूर तालुक्यातील २१, कळंब तालुक्यातील ३७, लोहारा तालुक्यातील २५ आणि वाशी तालुक्यातील ९ सदस्यांचा समावेश आहे. या सर्व तालुक्यांचा एकूण संख्येचा विचार केला असता, अपात्रतेची कारवाई करण्यात आलेल्या गावपुढाऱ्यांची संख्या ३३१ इतकी झाली आहे. प्रशासनाने उचललेल्या या कठोर पावलामुळे गावपुढाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. यातील अनेक सदस्यांचा ८ ते १२ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे हे सदस्य आता कुठली भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (प्रतिनिधी)