शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तीन पालिकांचे अध्यक्ष बिनविरोध !

By admin | Updated: July 11, 2014 01:00 IST

जालना : जालना, अंबड, भोकरदन या तीन नगर पालिकांच्या नगराध्यक्षपदी नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने नगराध्यक्षांची निवड बिनविरोध होणे निश्चित झाले आहे.

जालना : जिल्ह्यात जालना, अंबड, भोकरदन या तीन नगर पालिकांच्या नगराध्यक्षपदी आज नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी प्रत्येकी एकमेव उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्याने नगराध्यक्षांची निवड बिनविरोध होणे निश्चित झाले आहे. केवळ औपचारिक घोषणा बाकी असून परतूर पालिकेत मात्र तीन उमेदवारांचे अर्ज आल्याने तेथे लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या नगराध्यक्ष पदांच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागलेले आहे. जालना नगरपालिकेत गुरूवारी सकाळी काँग्रेसच्या सदस्या पार्वताबाई रत्नपारखे यांनी आपले दोन नामनिर्देशन अर्ज उपविभागीय अधिकारी मनीषा मुथा यांच्याकडे दाखल केले. रत्नपारखे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची निवड बिनविरोध निश्चित झाली आहे. पालिकेत प्रतिस्पर्धी शिवसेना-भाजपा युतीकडे मागासवर्गीय महिला प्रवर्गातील उमेदवारच नव्हता.दरम्यान, रत्नपारखे यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्यानंतर राकाँचे माजी खा. अंकुशराव टोपे, आ. कैलास गोरंट्याल, मावळत्या नगराध्यक्षा पद्मा भरतिया, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल हाफिज आदींनी स्वागत केले. (प्रतिनिधी)परतूरला रस्सीखेचपरतूर : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नगरविकास आघाडीच्या दोन तर काँग्रेसच्या एक अशा एकूण तीन उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केल्याने लढत होणार असल्याचे चित्र आहे.नगरविकास आघाडीच्या वतीने सुनंदाबाई शहाणे व मंगेश डहाळे यांनी तर काँग्रेसच्या वतीने माजी नगराध्यक्षा करीमाबी शेख यांनी अर्ज दाखल केला. नगराध्यक्षपदाची निवडणूक १६ जुलै रोजी होणार आहे. १८ सदस्य असलेल्या या पालिकेत नगरविकास आघाडीचे ११, काँग्रेसचे ६ तर भारतीय जनता पक्षाचा एक असे पक्षीय बलाबल आहे. नगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. भोकरदन नगराध्यक्षपदी पगारे विराजमान होणारभोकरदन : नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या रेखा चंद्रकांत पगारे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची अध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. भोकरदन पालिकेचे अध्यक्षपद हे अनुसुचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असताना त्यांच्याकडे या प्रवर्गातील उमेदवार नव्हता. त्यामुळे अध्यक्षपद हे कॉग्रेकडे जाणार हे जवळपास निश्चित होते. काँग्रेसकडे नगराध्यक्ष पदासाठी रेखाताई पगारे व राजू खिरे हे दोन उमेदवार होते. मात्र काँग्रेसचे मुरब्बी नेते माजी नगराध्यक्ष अ‍ॅड हर्षकुमार जाधव यांनी सर्व नगरसेवकांना एकत्र आणून या दोन्ही नगरसेवकांमध्ये एकमत घडवून आणले. त्यामुळे अध्यक्षपदासाठी पगारे यांचा मार्ग सुकर झाला. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, पशुसंवर्धन मंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाध्यक्ष भीमराव डोगंरे यांनी अध्यक्षपदासाठी पगारे यांना उमेदवारी जाहीर केली होती़ १० जुलै रोजी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. एऩआऱशेळके यांच्याकडे रेखाताई पगारे यांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले. शेळके यांनी सर्व अर्ज वैध झाल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांना मुख्याधिकारी रफीक सय्यद, श्यामराव दांडगे, आडे यांनी सहकार्य केले़कार्यकर्त्यांचा जल्लोषनगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या रेखाताई पगारे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी न.प. कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला. यावेळी पगारे, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. हर्षकुमार जाधव, तालुकाध्यक्ष सुरेश तळेकर, निरीक्षक सुरेश गवळी, गटनेते सईद कादरी, माजी नगरअध्यक्षा कमल जेठे, राजू खिरे, इरफान सिद्यिकी, रफिकउद्दीन, एजाज पठाण, राजू गाढे, चंद्रकांत पगारे, अझहर शहा, सुरेश जेठे, अ‍ॅड. सुहास देशमुख, जफर सेठ, छोटूसेठ आदी उपस्थित होते.आता उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक १६ रोजी होणार असल्याने तालुकावासियांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण तालुकावासियांचे लक्ष नगरपालिकेच्या निवडणुकांकडे लागले होते. (वार्ताहर)अंबडला पुन्हा कटारेचअंबड : नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशनपत्र भरण्याच्या आज शेवटच्या तारखेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षा मंगलताई कटारे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांनी नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. आता केवळ औपचारिकता राहिली आहे. पालकमंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा अवलंब करीत विद्यमान नगराध्यक्षा मंगलताई काकासाहेब कटारे यांनाच पुन्हा नगराध्यक्षपदी संधी दिली आहे. यंदा पालिकेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँगे्रसच्या सहाही नगरसेविका नगराध्यक्ष पदासाठी इच्छूक होत्या. यामध्ये कटारे यांच्यासह वैशाली सुनील राऊत, वैशाली राजेश सावंत, शेख मल्लेका शाहेद, ललिता जितेंद्र बुर्ले व सुमनबाई संजय साळवे यांचा समावेश होता. मात्र आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंतच्या कालावधीत केवळ कटारे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. कटारे यांनी दोन अर्ज दाखल केले. त्यातील एक वैध तर दुसरा अवैध ठरविण्यात आला. पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीमंत हारकर हे काम पाहत आहेत. आगामी विधानसभेच्या राजकीय पार्श्वभूमीवर पालकमंत्री टोपे हे अंबड नगराध्यक्ष पदासाठी कोणाला संधी देतात, याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले होते. मात्र टोपे यांनी कटारे यांना संधी देत भल्याभल्यांचे अंदाज चुकविले. १६ जुलै रोजी या निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. याच दिवशी उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. (वार्ताहर)