शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

कार-दुचाकीची धडक; दोघे ठार

By admin | Updated: October 27, 2014 00:10 IST

येरमाळा : भरधाव वेगातील कार -दुचाकीची भीषण धडक होवून झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले़ तर गंभीर जखमीस बार्शी येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़

येरमाळा : भरधाव वेगातील कार -दुचाकीची भीषण धडक होवून झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले़ तर गंभीर जखमीस बार्शी येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ हा अपघात रविवारी सायंकाळी तेरखेडा (ता़वाशी) नजीक घडला असून, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता़पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेरखेडा येथील सुरज आगलावे (वय-२१), विष्णू माळी (वय-२०) व बबन कडवकर (वय-२८) हे रविवारी सायंकाळी तिघे दुचाकीवरून (क्ऱएम़एच़१३- एक्स़७३७६) जात होते़ त्यावेळी औरंगाबादहून सोलापूरकडे निघालेल्या कारने (क्ऱएम़एच़०४- वाय़६९०९) दुचाकीस जोराची धडक दिली़ या अपघातात दुचाकीवरील विष्णू माळी, सुरज आगलावे यांचा जागीच मृत्यू झाला़ तर बबन कडवकर हा गंभीर जखमी झाला असून, त्यास बार्शी येथील रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते़ अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य सुरू केले होते़ तर अपघातानंतर कारचालकासह इतर इसमांनी घटनास्थळावरून धूम ठोकली़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता़ (प्रतिनिधी)अपघाताची माहिती मिळताच येरमाळा पोलिस ठाण्याचे फौजदार डी़जी़अहंकारी, पोहेका जगताप यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली़ तर तेरखेडा येथील श्रीराम घुले, रणजित घुले, अप्पा वाघमारे, जिकर मुजावर, अनिल सरवदे, गणेश मिरेकर यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेवून अपघातग्रस्तांना मदत केली़ घटनेनंतर अपघातस्थळी वाहतुकीची काही काळ कोंडी झाली होती़ या घटनेत गावातीलच दोन युवक ठार झाल्याने व एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात होती़ जखमींना रूग्णालयात पाठविण्यासाठी पोलिसांसह ग्रामस्थांनी पुढाकार घेत प्रयत्न केले़ त्यानंतर मयताचे पार्थिव शवविच्छेदनासाठी रूग्णालयात नेण्यासाठीही उपस्थित नागरिकांनीच पुढाकार घेतला होता़