जालना : जिल्ह्यात एप्रिलमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या निरंक आहे. मात्र १२ ग्रामपंचायतींच्या एकूण १३ रिक्त पदांसाठी २२ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीचा निकाल दुसऱ्याच दिवशी म्हणजे २३ एप्रिल रोजी जाहीर केला जाणार आहे.या ग्रामपंचायतींमध्ये भोकरदन तालुक्यात पळसखेडा दाभाडी येथे २, पिंपरी १, मनापूर १, परतूर तालुक्यात दैठणा खुर्द व चिंचोली प्रत्येकी १, जांभरून, रामतीर्थ, लावणी, बरबडा, पोखरी केंधळे, वांजोळा येथे प्रत्येकी १, घनसावंगी तालुक्यात दैठणा खुर्द येथे ही पोटनिवडणूक होत आहे. जिल्ह्यातील ४८२ ग्रामपंचायतींची मुदत माहे आॅक्टोबर ते डिसेंबर २०१५ या कालावधीत संपत असल्याने राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त प्रभाग रचना व आरक्षणाच्या कार्यक्रमानुसार एकूण ४८२ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना व आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतींच्या मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त होताच सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.या ग्रामपंचायतींमध्ये जालना तालुक्यात ८७, बदनापूर ६१, भोकरदन ९२, जाफराबाद १८, परतूर ३८, मंठा ५२, अंबड ७१ तर घनसावंगी तालुक्यात ६३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
१२ ग्रा.पं.मध्ये १३ जागांसाठी पोटनिवडणूक
By admin | Updated: April 3, 2015 00:39 IST