शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

१२ ग्रा.पं.मध्ये १३ जागांसाठी पोटनिवडणूक

By admin | Updated: April 3, 2015 00:39 IST

जालना : जिल्ह्यात एप्रिलमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या निरंक आहे. मात्र १२ ग्रामपंचायतींच्या एकूण १३ रिक्त पदांसाठी २२ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे

जालना : जिल्ह्यात एप्रिलमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या निरंक आहे. मात्र १२ ग्रामपंचायतींच्या एकूण १३ रिक्त पदांसाठी २२ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीचा निकाल दुसऱ्याच दिवशी म्हणजे २३ एप्रिल रोजी जाहीर केला जाणार आहे.या ग्रामपंचायतींमध्ये भोकरदन तालुक्यात पळसखेडा दाभाडी येथे २, पिंपरी १, मनापूर १, परतूर तालुक्यात दैठणा खुर्द व चिंचोली प्रत्येकी १, जांभरून, रामतीर्थ, लावणी, बरबडा, पोखरी केंधळे, वांजोळा येथे प्रत्येकी १, घनसावंगी तालुक्यात दैठणा खुर्द येथे ही पोटनिवडणूक होत आहे. जिल्ह्यातील ४८२ ग्रामपंचायतींची मुदत माहे आॅक्टोबर ते डिसेंबर २०१५ या कालावधीत संपत असल्याने राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त प्रभाग रचना व आरक्षणाच्या कार्यक्रमानुसार एकूण ४८२ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना व आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतींच्या मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त होताच सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.या ग्रामपंचायतींमध्ये जालना तालुक्यात ८७, बदनापूर ६१, भोकरदन ९२, जाफराबाद १८, परतूर ३८, मंठा ५२, अंबड ७१ तर घनसावंगी तालुक्यात ६३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)