शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महामंडळाच्या बसच्या गतीला लागेना ‘ब्रेक’

By admin | Updated: November 20, 2014 00:48 IST

पुरुषोत्तम करवा , माजलगाव ‘वाट पाहीन पण बसनेच जाईल’ ही म्हण आजही ग्रामीण भागातील प्रवाशी उराशी बाळगून आहेत. मात्र आता ही म्हण महामंडळाच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांच्या अंगलट येऊ लागली आहे.

पुरुषोत्तम करवा , माजलगाव‘वाट पाहीन पण बसनेच जाईल’ ही म्हण आजही ग्रामीण भागातील प्रवाशी उराशी बाळगून आहेत. मात्र आता ही म्हण महामंडळाच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांच्या अंगलट येऊ लागली आहे. बस चालकांच्या मनमानी कारभारामुळे ते सध्या सुसाट बस चालवत आहेत. काही केल्या त्यांच्या वेगाला ‘ब्रेक’ लागत नसल्याचे दिसून येत आहे.माजलगाव तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वी महामंडळाच्या बसगाड्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात झालेले आहेत. बस चालक सुसाट गाड्या चालवित असल्याने छोट्या वाहनधारकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकवेळा हे बसचालक छोट्या वाहनांना साईडही देत नसल्याचे दिसून येते. अशातच मंगळवारी पाटोदा तालुक्यातील नायगाव घाटामध्ये दोन बसची समोरासमोर धडक झाली. यामध्ये शंभरावर प्रवाशी होते. मात्र दैव बलवत्तर असल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही. यामध्ये बसगाड्यांचे नुकसान झाले असले तरी बस चालकांना मात्र याचे कुठलेही देणेघेणे नसल्याचा आरोप होत आहे. वास्तविक पाहता या बसगाड्यांचा वेग किती असावा? यावर नियम घालून देण्यात आलेले आहे. मात्र या नियमांना हे बस चालक धाब्यावर बसवत आहेत. याकडे मात्र वरिष्ठ अधिकारी साफ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. कड्यामध्येही एका वृद्धेचा दोन दिवसापूर्वी बळी गेला होता.४या बस चालकांवर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास यापुढेही दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे४ठरवून दिलेल्या गतीप्रमाणेच बस चालवून प्रवाशांचा विश्वास महामंडळाने कायम ठेवावा, अशी मागणीही केली जात आहे४वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र हाताची घडी, तोंडावर बोट अशी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे