शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

महामंडळाच्या बसच्या गतीला लागेना ‘ब्रेक’

By admin | Updated: November 20, 2014 00:48 IST

पुरुषोत्तम करवा , माजलगाव ‘वाट पाहीन पण बसनेच जाईल’ ही म्हण आजही ग्रामीण भागातील प्रवाशी उराशी बाळगून आहेत. मात्र आता ही म्हण महामंडळाच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांच्या अंगलट येऊ लागली आहे.

पुरुषोत्तम करवा , माजलगाव‘वाट पाहीन पण बसनेच जाईल’ ही म्हण आजही ग्रामीण भागातील प्रवाशी उराशी बाळगून आहेत. मात्र आता ही म्हण महामंडळाच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांच्या अंगलट येऊ लागली आहे. बस चालकांच्या मनमानी कारभारामुळे ते सध्या सुसाट बस चालवत आहेत. काही केल्या त्यांच्या वेगाला ‘ब्रेक’ लागत नसल्याचे दिसून येत आहे.माजलगाव तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वी महामंडळाच्या बसगाड्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात झालेले आहेत. बस चालक सुसाट गाड्या चालवित असल्याने छोट्या वाहनधारकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकवेळा हे बसचालक छोट्या वाहनांना साईडही देत नसल्याचे दिसून येते. अशातच मंगळवारी पाटोदा तालुक्यातील नायगाव घाटामध्ये दोन बसची समोरासमोर धडक झाली. यामध्ये शंभरावर प्रवाशी होते. मात्र दैव बलवत्तर असल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही. यामध्ये बसगाड्यांचे नुकसान झाले असले तरी बस चालकांना मात्र याचे कुठलेही देणेघेणे नसल्याचा आरोप होत आहे. वास्तविक पाहता या बसगाड्यांचा वेग किती असावा? यावर नियम घालून देण्यात आलेले आहे. मात्र या नियमांना हे बस चालक धाब्यावर बसवत आहेत. याकडे मात्र वरिष्ठ अधिकारी साफ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. कड्यामध्येही एका वृद्धेचा दोन दिवसापूर्वी बळी गेला होता.४या बस चालकांवर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास यापुढेही दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे४ठरवून दिलेल्या गतीप्रमाणेच बस चालवून प्रवाशांचा विश्वास महामंडळाने कायम ठेवावा, अशी मागणीही केली जात आहे४वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र हाताची घडी, तोंडावर बोट अशी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे