शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

वर्षभरात १४ हजार ४६४ दात्यांचे घाटीसाठी रक्तदान

By admin | Updated: October 1, 2014 00:44 IST

औरंगाबाद : एखाद्या घटनेत अतिरक्तस्राव झालेल्या रुग्णास तातडीने रक्त दिले तरच त्याचे प्राण वाचतात. घाटीसारख्या मोठ्या रुग्णालयात रोज दाखल होणाऱ्या रुग्णांना सरासरी ७० ते ८० रक्ताच्या बॅगची गरज भासते.

औरंगाबाद : एखाद्या घटनेत अतिरक्तस्राव झालेल्या रुग्णास तातडीने रक्त दिले तरच त्याचे प्राण वाचतात. घाटीसारख्या मोठ्या रुग्णालयात रोज दाखल होणाऱ्या रुग्णांना सरासरी ७० ते ८० रक्ताच्या बॅगची गरज भासते. रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये, यासाठी घाटीतील शासकीय रक्तपेढीकडून सतत प्रयत्न केले जातात. वर्षभरात २०० शिबिरांच्या माध्यमातून १४ हजार ४६४ जणांनी घाटीसाठी रक्तदान केले. या दात्यांनी केलेल्या रक्तदानामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले.घाटीत वेगवेगळ्या ३० हून अधिक वॉर्डांत बाराशेहून अधिक रुग्ण दाखल असतात. तेथील विविध आॅपरेशन थिएटरमध्ये रोज सरासरी ४० हून अधिक मोठ्या आणि ६० ते ७० लहान शस्त्रक्रिया होतात. १० ते १२ सिझेरियन प्रसूती होतात. यातील अनेक रुग्ण असे असतात की, त्यांना रक्त द्यावेच लागते. रुग्णास वेळेत रक्तपुरवठा केला नाही तर त्याची प्रकृती धोक्यात येते. अशा परिस्थितीत तातडीने रक्ताची बॅग घेऊन येण्याचा सल्ला डॉक्टर नातेवाईकांना देतात. रक्ताची मागणी करणारे विनंतीपत्र शासकीय रक्तपेढीत नेल्यानंतर कोणताही विचार न करता रुग्णास वॉर्डातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमार्फत रक्ताची बॅग पुरविण्यात येते. रक्ताचा स्टॉक कायम ठेवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तदान करण्याचा सल्लाही दिला जातो. काही वेळा तर रुग्णांचे नातेवाईकही सोबत नसतात. अशा वेळी त्यास लागतील तेवढ्या रक्तबॅगचा पुरवठा करून त्याचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टर आणि रक्तपेढीतील मंडळी शर्थीचे प्रयत्न करतात. बऱ्याचदा विशिष्ट रक्तगटाचा तुटवडाही निर्माण होतो. ही परिस्थिती एप्रिल ते जून या कालावधीत दरवर्षी जाणवते. त्यामुळे रक्तदान करण्याचे आवाहन रक्तपेढीच्या वतीने करण्यात येते. त्या आवाहनास शहरवासीयांकडून प्रतिसादही देण्यात येतो.