शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

नाकाबंदी व्यापाऱ्यांच्या मुळावर

By admin | Updated: September 23, 2014 23:50 IST

जालना : सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची अंमलबजावणी करतांना आयोगाच्या सूचनेवरुन पोलिसांनी सुरु केलेली नाकाबंदी व्यापारी, उद्योजकांच्या मुळावर उठल्याचा सूर निघत आहे.

जालना : सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची अंमलबजावणी करतांना आयोगाच्या सूचनेवरुन पोलिसांनी सुरु केलेली नाकाबंदी व्यापारी, उद्योजकांच्या मुळावर उठल्याचा सूर निघत आहे.निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांकडून काळ्या पैशांची देवाण-घेवाण तसेच मोठ्या रक्कमांचे व्यवहार रोखण्यासाठी पोलिसांकरवी नाकाबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने जालना जिल्ह्यात शहरासह विविध ठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची व त्यातील नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये सर्वसामान्य व्यापारी, जनतेला नाहक तपासणीला सामोरे जावे लागते. त्यांचा अमूल्य असा वेळही यातून खर्ची होतो आहे. दरम्यान, आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरु असली तरी त्याचे काही दुष्परिणामही जाणवू लागले आहेत. जसे की, व्यापाऱ्यांनी आपापल्या थकीत वसूल्या थांबविण्याचा निर्णय घेतला असून त्याचे विपरित परिणाम बाजारावर होणार आहेत. ठिबकवर लागवड केलेला कापूस काढणीस आलेला असून आर्थिक चणचण भासत असल्याने तो कापूस शेतकरी विक्रीस काढत आहेत. परंतू मोठ्या रक्कमा जवळ बाळगणे अथवा वाहनांतून घेवून जाण्यासाठी व्यापारी धजावत नाहीत. परिणामत: शेतकरीही आयोगाच्या आचारसंहितेच्या कचाट्यात अप्रत्यक्षरित्या सापडल्याचे चिन्हे दिसून येत आहेत. शहरासह मोठ्या बाजारपेठेच्या गावात पैसे घेवून जाण्यास व्यापारी धास्तावलेले आहेत. शालेय विद्यार्थीही नाकाबंदीमुळे अडचणीत आल्याचे चित्र आहे. विविध अभ्यासक्रमासाठी शुल्क रोख रक्कमेच्या स्वरुपात घेवून जातांना ते आयोगाचा बळी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तपासणीचे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर त्यांना सोडून देण्यात येत असेलही; परंतू तोपर्यंत त्यांचा वेळ खर्च होतो. पुढे वेळेवर शुल्क भरणा करता येणार नाही. त्यामुळे त्यांच्या होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी घ्यायची कोणी? असाही प्रश्न उपस्थित होतो. बाजारपेठेत नाकाबंदीची चर्चा होत असून रोख रक्कम जवळ बाळगण्यास अथवा बाहेरगावी घेवून जाण्यास व्यापारी तयार होत नसल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम जनसामान्यांवर होणार आहे. दरम्यान, निवडणुकीत काळ्या पैशांचा व्यवहार होवू नये म्हणून डोळ्यात तेल घालून काम करणाऱ्या प्रशासनाने व्यापारी, उद्योजकांच्या अडचणी समजून घेवून नाकेबंदी करताना नाहक त्रास होऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे.