शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
5
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
6
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
7
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
8
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
9
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
10
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
11
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
12
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
13
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
14
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
15
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
16
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
17
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
18
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
19
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
20
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

केज मतदारसंघात भाजपातील निष्ठावंतांची कायम गोची

By admin | Updated: September 8, 2014 00:55 IST

अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाई जनसंघांच्या स्थापनेपासून ते भारतीय जनता पक्षाच्या निर्मितीत योगदान असणाऱ्या भाजपच्या कर्मभूमीत अनेक निष्ठावंत आजही कायम आहेत.

अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाईजनसंघांच्या स्थापनेपासून ते भारतीय जनता पक्षाच्या निर्मितीत योगदान असणाऱ्या भाजपच्या कर्मभूमीत अनेक निष्ठावंत आजही कायम आहेत. मात्र, सातत्याने पक्षात नव्याने दाखल होणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे निष्ठावंतांची कायम गोची सुरूच आहे. महाराष्ट्रात आणिवाणीनंतर जनसंघाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची मोठी फौज अंबाजोगाईत व केजमध्ये निर्माण झाली. या जनसंघाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाची निर्मिती झाली. अंबाजोगाईच्या मातीतून कै. प्रमोद महाजन, कै. गोपीनाथ मुंडे, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, अशी कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली. ही सर्व नेतृत्व राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचली. या सर्वांना घडविण्याचे काम अंबाजोगाईत प्राचार्य राजाभाऊ धाट, मा.मा. क्षीरसागर, राजाभाऊ चौसाळकर, यांच्यासह मान्यवरांनी केली. आज भाजपचा वटवृक्ष झाल्यानंतर पक्षाच्या निर्मितीपासून खस्ता खाणारे हे लोक कुठे आहेत? याचा विसर भाजपला पडला आहे. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून प्रा. सतीश पत्की, प्रा. अशोक लोमटे, अनिल बायस असे नेतृत्व तयार झाले. हे निष्ठावंत आजही पक्षात अडगळीला पडले आहेत. तर भाजपामध्ये प्रारंभीपासून कार्यकर्त्यांची भूमिका निम्भावणारे डॉ. अमृतराव देशपांडे, भारत पसारकर, राम घाडगे (केज), अशी अनेकांची नावे सांगता येतील. या सर्वांनी पक्षाच्या विस्तारासाठी कठोर परिश्रम व मेहनत घेतली. मात्र, पक्ष सत्तेत आल्यानंतर सत्तेची फळे चाखण्यासाठी मोठ्या प्रमाणात आयाराम - गयाराम यांची गर्दी वाढली. अन् परिणामी निष्ठावंतांची आजही कायम गोची सुरूच आहे.अंबाजोगाई व केज तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षातून भाजपमधून येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. गेल्या पाच वर्षात दत्तात्रय पाटील, राजेश कराड, सुनिल लोमटे, अविनाश लोमटे, हारूण इनामदार, अशा कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करीत ज्यांना भाजपचा इतिहासही माहित नाही. असे अनेक कार्यकर्ते पक्षात येऊन सत्तेची फळे चाखत आहेत. मात्र, पक्षासाठी परिश्रम घेतलेले निष्ठावंत मात्र आजही कायम अडगळीलाच पडलेले आहेत. ज्या कर्मभूमीतून राष्ट्रीय पातळीवरचे नेतृत्व साध्य करण्याची किमया या मतदार संघात झाली. त्याच मतदार संघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची उपेक्षा कायम आहे.