शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

बिलोलीत अन्न सुरक्षा योजना गोत्यात

By admin | Updated: June 20, 2014 00:10 IST

बिलोली : तालुक्यात अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सवलतीचे धान्य वेळेवर येत नसल्याने बोंब उठली आहे़

बिलोली : तालुक्यात अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सवलतीचे धान्य वेळेवर येत नसल्याने बोंब उठली आहे़ शासकीय गोदामात पुरवठा होणाऱ्या ट्रान्सपोर्ट ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे लाभार्थ्यांना वंचित रहावे लागत आहे़ तालुक्यात शासकीय नोंदीनुसार ९३ हजार २०३ लाभार्थींना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ होतो़ प्रत्यक्षात पुरवठा विभागाच्या सर्व्हेक्षणानुसार ९८ हजार ९६६ लाभार्थी आहेत़जिल्हा व तालुका प्रशासनात ताळमेळ जमला नसल्याने मागच्या सहा महिन्यापासून ५ हजार ३६३ लाभार्थीचा कोटा कमी येत आहे़ अशा परिस्थितीत लाभार्थींना माल कमी देण्यात येत आहे़ निवडणूक पूर्व फेब्रुवारी महिन्यात अन्न सुरक्षा योजना अंमलात आली़ प्रत्येक व्यक्तीला ३ किलो गहू व २ किलो तांदूळ देण्यात येते, पण साडेपाच हजार लाभार्थींचा आकडेवारीत घोळ झाला आहे़आता मागच्या तीन महिन्यांपासून गोदामात २ हजार ७०५ क्विंटल तांदळापैकी केवळ बाराशे क्विंटल माल आला आणि १८९० क्विंटलपैकी केवळ ४१० क्विंटल गहू आला़ दरम्यान केशरी कार्डधारकांचा पुरवठा पूर्णत: बंद आहे़ पुरवठा वेळेवर होत नसल्याने लाभार्थी दुकान दाराकडे हेलपाटे मारत आहेत़ शासनाकडून दरमहा पुरवठा होताना बिलोलीत वेळेवर व कमी पुरवठा झाल्याने लाभार्थी वैतागले आहेत़(वार्ताहर)