शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

बिलोलीत अन्न सुरक्षा योजना गोत्यात

By admin | Updated: June 20, 2014 00:10 IST

बिलोली : तालुक्यात अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सवलतीचे धान्य वेळेवर येत नसल्याने बोंब उठली आहे़

बिलोली : तालुक्यात अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सवलतीचे धान्य वेळेवर येत नसल्याने बोंब उठली आहे़ शासकीय गोदामात पुरवठा होणाऱ्या ट्रान्सपोर्ट ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे लाभार्थ्यांना वंचित रहावे लागत आहे़ तालुक्यात शासकीय नोंदीनुसार ९३ हजार २०३ लाभार्थींना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ होतो़ प्रत्यक्षात पुरवठा विभागाच्या सर्व्हेक्षणानुसार ९८ हजार ९६६ लाभार्थी आहेत़जिल्हा व तालुका प्रशासनात ताळमेळ जमला नसल्याने मागच्या सहा महिन्यापासून ५ हजार ३६३ लाभार्थीचा कोटा कमी येत आहे़ अशा परिस्थितीत लाभार्थींना माल कमी देण्यात येत आहे़ निवडणूक पूर्व फेब्रुवारी महिन्यात अन्न सुरक्षा योजना अंमलात आली़ प्रत्येक व्यक्तीला ३ किलो गहू व २ किलो तांदूळ देण्यात येते, पण साडेपाच हजार लाभार्थींचा आकडेवारीत घोळ झाला आहे़आता मागच्या तीन महिन्यांपासून गोदामात २ हजार ७०५ क्विंटल तांदळापैकी केवळ बाराशे क्विंटल माल आला आणि १८९० क्विंटलपैकी केवळ ४१० क्विंटल गहू आला़ दरम्यान केशरी कार्डधारकांचा पुरवठा पूर्णत: बंद आहे़ पुरवठा वेळेवर होत नसल्याने लाभार्थी दुकान दाराकडे हेलपाटे मारत आहेत़ शासनाकडून दरमहा पुरवठा होताना बिलोलीत वेळेवर व कमी पुरवठा झाल्याने लाभार्थी वैतागले आहेत़(वार्ताहर)