शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

भावही गडगडले अन् क्षेत्रही घटले़़़!

By admin | Updated: November 25, 2014 00:58 IST

राजेश खराडे , बीड कधी शेतकऱ्यांच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या कांद्याचे यंदा भावही गडगडले आणि अत्यल्प पावसामुळे क्षेत्रही कमालीचे कमी झाले आहे

राजेश खराडे , बीडकधी शेतकऱ्यांच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या कांद्याचे यंदा भावही गडगडले आणि अत्यल्प पावसामुळे क्षेत्रही कमालीचे कमी झाले आहे. गतवर्षी सर्वाधिक उत्पादनाची नोंद असलेल्या आष्टीत शून्य टक्के नोंद आहे. यंदा कांदा लागवडीचे क्षेत्र कमी झाल्याने आगामी काळात कांदा दर वधारून ग्राहकांच्या डोळ्याला पाणी येणार असल्याचे संकेत कृषि उपसंचालक बी़ एम़ गायकवाड यांनी दिले आहे.जिल्ह्यात कांद्याचे सर्वसाधारण क्षेत्र आठ हजार हेक्टरवर आहे. यामध्ये खरीप हंगामात २ हजार ४३४ हेक्टर, रबी हंगामात ४ हजार ८६९ हेक्टर तर उन्हाळ्यात कांद्याच्या लागवडीचे क्षेत्र ८११ हेक्टरवर आहे. गेल्या तीन वर्षापासून पर्जन्यमान कमी होत असल्याने व कांद्याला चांगली बाजारपेठ नसल्याने लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. गतवर्षी १०० टक्के पाऊस झाल्याने कांदा लागवडीचे क्षेत्रही वाढले होते. सरासरी आठ हजार क्षेत्रापैकी सहा हजार हेक्टरवर कांद्याची लागवड केली होती. त्यानुसार उत्पादनातही वाढ झाली होती. कांद्याला ४० ते ५० रु प्रती किलो दर मिळाल्याने कांद्याने शेतकऱ्यांना साथ दिली होती. जिल्ह्यात कांद्याची सर्वाधिक लागवड ही आष्टी तालुक्यात करण्यात आली होती. यंदा पावसाचे प्रमाण ५० टक्क्यांवर आल्याने शेतकऱ्यांनी इतर पिकांवरच अधिकचा भर दिला आहे. जिल्हाभरात अद्यापपर्यंत केवळ १ हजार १४४ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. कांद्याचे दरही १५ ते २० रुपयांवर आले आहेत. यामध्ये सर्वाधिक बीड तालुक्यातून ५१३ हेक्टरवर कांद्याची लागवड करण्यात आली आहे.दरम्यान, भाव नसल्याने लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचीही पुरती निराशा झाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़आतापर्यंत सर्वात कमी क्षेत्रगेल्या तीन वर्षापासून जिल्ह्यात पर्जन्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याच्या उत्पादनाकडे सपशेल पाठ फिरवली आहे. यंदा आतापर्यंत सर्वात कमी ११४४ हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे़तंत्राधिकाऱ्यांकडे माहितीच नाहीदुष्काळजन्य परिस्थिती आहे. बळीराजा अडचणीत आला असतानाही येथील तंत्राधिकारी एस.जी.बिरजदार यांना त्याचे काही घेणे-देणे नाही. तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत माहिती दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडे अहवाल नसल्यानेच माहिती देण्याचे टाळले.