शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

२९ गावांना ‘शिवकालीन’चा लाभ

By admin | Updated: November 15, 2014 23:54 IST

हिंगोली :भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेअंतर्गत सन २०१३- १४ मध्ये जिल्हभरातील २९ गावांना शिवकालीन योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

हिंगोली : महाराष्ट्र शासनाने आंतराष्ट्रीय विकास संस्थांशी केलेल्या कृषी प्रत प्रकल्प कराराची परिणिती म्हणून भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेअंतर्गत सन २०१३- १४ मध्ये जिल्हभरातील २९ गावांना शिवकालीन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. पाणीटंचाइ जिल्ह्याच्या पाचवीलाच पूजलेली आहे. कुठेही साठवण होत नसल्याने पावसाचे पाणी हे थेट सागराला जावून मिळत आहे. परिणामी, जिल्ह्याला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येत आहे. शिवकालीन योजनेत टंचाईग्रस्त गावांचे सर्वेक्षण भूजल विकास यंत्रणेद्वारे करण्यात येते. नंतर भूशास्त्रीय व भूजलविषयक नकाशा तयार केला जातो. तसेच भूजल साठ्याचा अंदाज घेऊन त्या गावचा सध्याचा भुजल वापर आणि पुढील वापरासाठी उपलब्धतेसंदर्भात माहिती जमा केली जाते. यातून निकष पूर्ण होत असल्याचे सदर गाव शिवकालीन योजनेत निवडले जाते. या योजनेचे नामकरण करुन आता राष्ट्रीय पेयजल योजना असे नाव देण्यात आले. २०१३- १४ मध्ये यात एकूण २९ गावांत ७२ उपाययोजना केल्या. यामध्ये कृती आराखड्यानुसार ४ गावांत विहीर पुनर्भरण, ६ गावांत सिमेंट नालाबांध केले. तसेच ८ ठिकाणी पाझर व विहीरतील गाळ काढला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात ज्या गावात हातपंपाना पाणीसाठा उपलब्ध आहे. अशा एकूण १०० गावांत सौरऊर्जेवर आधारित पंप बसविले आहेत. यावर्षीसुध्दा ज्या गावातील हातपंपाना पाणीसाठा उपलब्ध असेल त्या गावात सोलार पंप बसविण्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. पेयजल योजनेअंतर्गत सन २०१३-१४ मार्च अखेर ८० लाख ९६ हजार रुपये खर्ची पडले आहेत. (प्रतिनिधी)