शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

संजय गांधी योजनेतून लाभार्थ्यांची नावे गायब

By admin | Updated: August 11, 2014 01:57 IST

औरंगाबाद : शहरातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची नावे अचानक कमी करण्यात आली आहेत. बेकायदेशीरपणे नावे वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांना व्याजासह अनुदान द्यावे,

औरंगाबाद : शहरातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची नावे अचानक कमी करण्यात आली आहेत. बेकायदेशीरपणे नावे वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांना व्याजासह अनुदान द्यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर करण्यात आली आहे. न्यायालयाने या याचिकेत प्रतिवादींना नोटिसा काढल्या आहेत.संजय गांधी निराधार योजनेंतर्गत गोरगरीब निराधार, अपंग, वृद्ध आणि विधवांना दरमहा अर्थसाहाय्य देण्यात येते. या योजनेचे औरंगाबाद जिल्ह्यात ५५ हजार लाभार्थी आहेत. यात औरंगाबाद शहरातील २१ हजार ७०० लाभार्थ्यांचा समावेश आहे. शहरातील लाभार्थ्यांची पात्रता तपासण्यासाठी शासनाने जिल्हास्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीची दर तीन महिन्यांत एक बैठक होणे अपेक्षित आहे, तसेच या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक तेवढे मनुष्यबळ उपलब्ध करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत या योजनेतील हजारो लाभार्थ्यांची नावे त्यांना न कळविता वगळण्यात आली. त्यामुळे या लाभार्थ्यांना अर्थसाहाय्य मिळणे बंद झाले आहे. याविषयी याचिकाकर्ते भगवान खिल्लारे यांनी जिल्हा प्रशासनाकडे विचारणा केली असता प्रशासनाकडून त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यानंतर त्यांनी या योजनेची अंमलबजावणीची अधिक माहिती गोळा केली असता त्यात गैरव्यवहार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी अ‍ॅड. देवदत्त पालोदकर यांच्यामार्फत खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेत त्यांनी नावे वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांना व्याजासह अनुदानाची थकबाकी द्यावी, अशी मागणी केली. तसेच योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसा कर्मचारीवर्ग उपलब्ध करावा, समितीच्या बैठका नियमित घ्याव्यात, लेखा परीक्षण करावे आदी मागण्या केल्या. ही याचिका न्यायमूर्ती आर.एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती व्ही.एल. आंचलिया यांच्यासमोर सुनावणीसाठी आली असता न्यायालयाने प्रतिवादींना नोटिसा काढल्या. याचिकेची पुढील सुनावणी २ सप्टेंबर रोजी ठेवली आहे.