शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

अपहार होऊनही कारवाईस टाळाटाळ

By admin | Updated: February 12, 2015 00:57 IST

बीड : केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील राष्ट्रीय पेयजल अंर्तगत झालेल्या अर्धवट कामासाठी जुने साहित्य वापरुन चक्क ४२ लाख रुपये खर्च केल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे

बीड : केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील राष्ट्रीय पेयजल अंर्तगत झालेल्या अर्धवट कामासाठी जुने साहित्य वापरुन चक्क ४२ लाख रुपये खर्च केल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने पैसे उचलून अपहार केल्याचे समोर आले असतानाही त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप दत्तात्रय ठोंबरे यांनी केला आहे. केज तालुक्यातील पेयजल कार्यक्रम योजनेला २०११ मध्ये मंजुरी मिळाली होती. सदरील योजनेत उदभव विहिर ते पाणीपुरवठा वितरीत करण्यासाठीची टाकी हे अंतर रेकॉर्ड केलेल्या पुस्तिकेमध्ये ७ हजार ४७० मीटर दाखविले आहे मात्र हे अंतर पंचनाम्यामध्ये मोजमाप केले त्यावेळी ४ हजार ६३० एवढेच भरले होते. दहिफळ ते उदभव विहिरचे प्रत्यक्ष अंतर हे ४ हजार ६३० मीटर आहे. कार्यकारी अभियंता यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या अहवालात प्रत्यक्ष पीव्हीसी पाईमध्ये १२२० मीटर दाखविले आहे हे बरोबर आहे. परंतु प्रत्यक्ष खोदकामाच्या अंतरामध्ये २८०० मीटरचा फरक आहे. मात्र सीओ यांच्या अहवालात १२२० मीटर दाखविण्यात आले असल्याचेही ठोंबरे यांनी सांगितले. दहिफळ ते उदभव विहिर यातील अंतर मुळात ४ हजार ६३० मीटर आहे. याच अंतरामध्ये लिंबाची वाडी गाव आहे. एकाच चार खोदुन लिंबाची वाडीपर्यंत दोन पीव्हीसी पाईप आणण्यात आले आहे. त्यामुळे १६२० मीटर खोदकाम वाढण्याचा प्रश्नच येत नाही असेही ठोंबरे म्हणाले. कामासाठी खोदकाम, ब्लास्टिंग, हार्ड, सॉफ्ट खोदकाम लाखो रुपये किमतीचे होत असून या एकाच प्रकारात सर्व दाखविण्यात आले आहे. त्यामुळे या कामासाठी एमबीमध्ये दाखविण्यात आलेला खर्च बोगस असल्याचा आरोप ठोंबरे यांनी केला आहे. केवळ पाच लाख भरलेसदरील प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालात दहिफळ येथील पाणी पुरवठा समितीने केलेल्या कामात १२२० मीटर पाईपलाईन व खोदकामासह जास्तीची नोंद केली आहे ती कमी करुन वसुली केल्याचे अहवालात सांगितले आहे मात्र प्रत्यक्षात केवळ पाच लाख रुपये भरले आहेत असे ठोंबरे यांनी सांगितले. मुळात हे अंतर २८०० मीटर असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)अपहारप्रकरणी जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे एस.व्ही. चव्हाण म्हणाले, पूर्वी पाणीपुरवठा समित्यामार्फत व्हायचा मात्र आता ही कामे टेंडर देऊन पुर्ण केली जात आहे. सदरील योजनेचे काम करताना दहिफळच्या पाणी पुरवठा समितीने धनादेश देऊन साहित्य व कामे करायला हवी होती मात्र तसे त्यांनी केले नाही. या कामाची चौकशी पुर्ण झाली आहे. तक्रारदारांना जि.प.ची चौकशी मान्य नाही. कामाची चौकशी गुणवत्ता परीक्षण पथकामार्फत होणार असल्याचे चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले