शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

खरेदी केंद्राला लागले टाळे

By admin | Updated: May 12, 2014 00:10 IST

लातूर : नाफेडच्या वतीने लातूर जिल्ह्यातील चार ठिकाणी हमीभावाने हरभरा खरेदी केंद्र उघडण्यात आले होते़ परंतु, १० मे रोजी टाळे लागले़

लातूर : नाफेडच्या वतीने लातूर जिल्ह्यातील चार ठिकाणी हमीभावाने हरभरा खरेदी केंद्र उघडण्यात आले होते़ परंतु, १० मे रोजी हे केंद्र बंद करण्याच्या नाफेडच्या सूचना असल्याने शनिवारी सायंकाळनंतर त्यांना टाळे लागले़ त्यामुळे हरभरा शिल्लक असलेल्या शेतकर्‍यांमधून नाराजी व्यक्त होत आहे़ बाजारपेठेपेक्षा ५०० ते ६०० रूपये दर अधिक मिळत असल्याने शेतकरी या केंद्रावर रांगा लावत होते़ परंतु, हे केंद्र बंद झाल्याने आता शेतकर्‍यांवर कमी दराने शेतमाल विकण्याची वेळ आली आहे़ जिल्हा मार्केटींग फेडरेशनच्या माध्यमातून नाफेडने लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, उदगीर, औसा, लातूर या ठिकाणी हरभरा खरेदी केंद्र सुरू केले होते़ या केंद्रांना शेतकर्‍यांनी भरभरून प्रतिसाद दिला़ अगदी चार-चार दिवस रांगेत थांबून आपला शेतमाल विक्री केला़ या चारही केंद्रावर १० मे पर्यंत जवळपास ५८ हजार क्विंटल हरभरा खरेदी झाला आहे़ या माध्यमातून ३१ रूपये प्रतिक्विंटल दराने १८ कोटी रूपये शेतकर्‍यांच्या पदरी पडत आहेत़ लातूरच्या हरभरा खरेदी केंद्रावरून सर्वाधिक ३४ हजार क्विंटल हरभर्‍याची खरेदी करण्यात आली़ त्या पाठोपाठ औसा केंद्रात ११ हजार ५०० क्विंटल, उदगीर ८५०० तर अहमदपूरच्या केंद्रात ४५०० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे़ २५ मार्च पर्यंत खरेदी करण्यात आलेल्या हरभर्‍याचे ६ कोटी रूपये शेतकर्‍यांना अदा करण्यात आले आहेत़ उर्वरीत शेतमालाची रक्कम उपलब्ध होताच शेतकर्‍यांना वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर यांनी दिली़ दरम्यान, ३१०० रूपये हमीभावाने नाफेडकडून हरभर्‍याची खरेदी झाल्यामुळे शेतकर्‍यांचा चांगलाच फायदा झाला आहे़ बाजार समित्यांमधून हरभर्‍यास सरासरी २४०० ते २५०० रूपये दरम्यान प्रतिक्विंटल दर मिळत होता़ तुलनेने ६०० ते ७०० रूपये अधिक दर मिळत असल्यामुळे शेतकर्‍यांनी खरेदी केंद्रास पसंती दिली़ या माध्यमातून जवळपास साडेतीन कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम खरेदी केंद्राने दिलेल्या अधिक दरामुळे शेतकर्‍यांच्या पदरी पडत आहेत़ मात्र अजूनही बर्‍याच शेतकर्‍यांकडे हरभरा शिल्लक असल्यामुळे त्यांच्याकडून खरेदी केंद्रास मुदतवाढ मिळण्याची मागणी होत आहे़ गारपीट, अवकाळी पावसामुळे हरभर्‍याच्या राशीला उशीर झाला होता़ त्यामुळे वेळेत शेतमाल खरेदी केंद्रावर आणता आला नाही़ आता शिल्लक असलेला हरभरा कमी दराने विकावा लागणार असल्यामुळे शेतकर्‍यांनी मुदतवाढीची मागणी केली आहे़ (प्रतिनिधी) अनुदानही नाही अन् दरही़़़ मार्च - एप्रिल महिन्यात झालेली गारपीट त्यानंतर सातत्याने होत असलेला अवकाळी पाऊस यामुळे हरभर्‍याच्या राशी खोळंबल्या होत्या़ त्यातच पन्नास टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले नसल्याचे सांगून शासनाकडून एक छदामही मदत मिळाली नाही़ उरला-सुरला शेतमाल आता पाठिशी बांधून बाजारात गेल्यास दर्जेचे कारण समोर करून कमी दर दिला जात आहे़ यात हरभरा खरेदी केंद्राचा आधार होता़ परंतु, ते बंद करण्यात आल्याने आर्थिक फटका बसणार असल्याचे मत शेतकरी बालाजी वाघमोडे, मल्लिकार्जुन चनाळे यांनी व्यक्त केले़