शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

कोरोनाकाळात औरंगाबादची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:04 IST

जिल्ह्यासह राज्यभरातील रुग्णांवर उपचार : घाटी, जिल्हा रुग्णालय, मेल्ट्राॅन, खाजगी रुग्णालयांत डाॅक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची उत्कृष्ट रुग्णसेवा संतोष ...

जिल्ह्यासह राज्यभरातील रुग्णांवर उपचार : घाटी, जिल्हा रुग्णालय, मेल्ट्राॅन, खाजगी रुग्णालयांत डाॅक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची उत्कृष्ट रुग्णसेवा

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोनाकाळात औरंगाबादची वैद्यकीय सेवा खऱ्या अर्थाने सर्वोत्तम ठरली. कारण राज्यभरातील अनेक शहरांत जेव्हा ना रेमडेसिविर मिळत होते, ना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, तेव्हा औरंगाबादेत या गोष्टी अगदी सहजपणे मिळाल्या. त्यामुळे रेमडेसिविर, व्हेंटिलेटर मिळण्यासाठी पुणे अहमदनगरसह राज्यभरातील रुग्णांनी औरंगाबादेत धाव घेतली. घाटी, जिल्हा रुग्णालय, मेल्ट्राॅन, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, खाजगी रुग्णालयांत डाॅक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची अहोरात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करीत उत्कृष्ट रुग्णसेवा दिली.

मुंबई, पुणे, नागपूरपाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यात १५ मार्च २०२० रोजी कोरोनाने शिरकाव केला. या दिवशी जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचे निदान झाले. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. या सगळ्यात घाटी रुग्णालयात, जिल्हा रुग्णालयात युद्धपातळीवर उपचार व सुविधा वाढविण्यात आल्या. घाटीतील सुपर स्पेशालिटी ब्लाॅक कोरोनाच्या रुग्णसेवेसाठी सज्ज करण्यात आले. अवघ्या काही दिवसांत महापालिकेचे मेल्ट्राॅन रुग्णालय उभे राहिले. खाजगी रुग्णालयांनीही खाटा आणि उपचार सुविधा वाढविल्या. महापालिकेने मेल्ट्राॅन आणि कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून रुग्णसेवा दिली.

दुसऱ्या लाटेत कोरोनाने अक्षरश: कहर केला. राज्यातील अनेक शहरांत कोरोना रुग्णांना उपचारासाठी गैरसोयीला सामोरे जावे लागले. त्यातुलनेत औरंगाबादची परिस्थिती अनेक पटीने चांगली राहिली. त्यामुळे मराठवाड्यासह अहमदनगर, जळगाव, नाशिक, पुण्यासह इतर जिल्ह्यांतील कोरोना रुग्ण औरंगाबादेत दाखल झाले. आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यातील रुग्णांसह अन्य जिल्ह्यांतील रुग्णांनाही सक्षमपणे रुग्णसेवा दिली. जिल्ह्यात २४ तासांत तब्बल ६० टन ऑक्सिजन संपत होता. ऑक्सिजन येतो आणि संपतो, अशी स्थिती होती; पण कोणतीही आणीबाणीची स्थिती शहरात निर्माण झाली नाही. या सगळ्यात रुग्णसेवा देताना अनेक डाॅक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारीदेखील कोरोनाला सामोरे गेले; पण सगळ्या परिस्थितीला सामोरे जात रुग्णसेवा गेल्या दीड वर्षापासून सुरळीत ठेवली आहे.

------

घाटीतील प्रयोगशाळा राज्यात अव्वल

राज्यात अनेक जिल्ह्यांत कोरोना स्वॅब तपासणीचा अहवाल येण्यास ३-३ दिवस लागत होते; परंतु औरंगाबादेत अवघ्या एका दिवसाच्या आत कोरोनाचा अहवाल मिळतो. त्यातून निगेटिव्ह रुग्ण सुटकेचा नि:श्वास सोडतात. हे सगळे घाटीतील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेमुळे (व्हीआरडीएल) शक्य होत आहे. आरटीपीसीआर तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळांमध्ये ही प्रयोगशाळा राज्यात अव्वल आली. या यशाच्या मानकरी ठरल्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डाॅ. ज्योती बजाज-इरावणे.

----

कोरोनाला सक्षमपणे सामोरे

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला, त्यावेळी सुरुवातीला अडचणी आल्या. प्रारंभी केवळ मेडिसीन विभागाला ऑक्सिजनची पाइपलाइन होती; परंतु नंतर ऑक्सिजनसह सर्वच सुविधा वाढल्या आणि चांगली सेवा देता आली. सुविधा वाढल्याने कोरोनाला सक्षमपणे सामोरे जात येत आहे.

- डाॅ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)

---

कधीही न पाहिलेली स्थिती

कोरोनामुळे भूतकाळात कधीही न पाहिलेली स्थिती पाहायला मिळाली. उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जात ग्रामीण भागात चांगली रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. कोविड सेंटरसह ग्रामीण भागात खाजगी रुग्णालयांनी रुग्णसेवा दिली.

-डाॅ. सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी

---

मेल्ट्रॉन ठरले महत्त्वपूर्ण

कोरोनाच्या उपचारासाठी मेल्ट्राॅन सुरू झाले. या महिन्यात या रुग्णालयाला वर्ष झाले. येथे अनेक कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले. आता ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. उपचारासाठी नवीन उपकरणे मिळाली आहेत.

- डाॅ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा