शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

औरंगाबाद बनेल देशाचे औद्योगिक केंद्र

By admin | Updated: June 13, 2016 00:45 IST

औरंगाबाद : औरंगाबाद परिसरात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्प, वाळूज महानगर, चिकलठाणा, शेंद्रा औद्योगिक वसाहती आहेत.

औरंगाबाद : औरंगाबाद परिसरात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्प, वाळूज महानगर, चिकलठाणा, शेंद्रा औद्योगिक वसाहती आहेत. या ठिकाणी चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत. त्यामुळे भविष्यात औरंगाबाद देशाचे औद्योगिक केंद्र बनेल, असे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट म्हणाले. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील देशांतर्गत एअर कार्गो टर्मिनलचे बुधवारी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘सीएमआयए’चे अध्यक्ष आशिष गर्दे, ‘सीआयआय’चे अध्यक्ष संदीप नागोरी, ऋ षीकुमार बागला, विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय, कार्गो सर्व्हिस सेंटरचे चीफ फायनान्शियल आॅफिसर हरीश शेट्टी, ‘सीआयएसएफ’चे असिस्टंट कमांडंट किशोरकुमार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्गो सेवेबरोबर या ठिकाणी कोल्ड स्टोअरेजची सुविधा मिळावी, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. यावेळी उपमहाप्रबंधक शरद येवले, जेट एअरवेजचे स्वामीनाथन्, एअर इंडियाचे रमेश नंदे, ट्रुजेटचे किरण माने आदींची उपस्थिती होती. इंडिगो एअरवेज कंपनीकडून चिकलठाणा विमानतळावर पार्किंगसाठी विचारणा होत आहे. शिवाय इंडिगो एअरवेज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी विमानतळाची पाहणी केली होती. या कंपनीकडून दिल्ली अथवा मुंबई तसेच अन्य शहरांसाठी सेवा डिसेंबरपर्यंत सुरूकरण्याचा प्रयत्न केला जात आहे. पार्किंग सुविधा आणि नव्या विमानाच्या माध्यमातून औरंगाबादहून या कंपनीची विमानसेवा लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. तसेच फाईव्ह स्टार हॉटेल मालकांनी विमानतळावर सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे.