शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
3
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
4
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
5
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार
6
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
7
अभिनेता स्टेजवर अचानक बेशुद्ध होऊन कोसळला! तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
8
निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...
9
सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."
10
पायऱ्या चढा किंवा उतरा आणि हार्ट ॲटॅकची भीती विसरा; गंभीर आजारही होतील छूमंतर
11
Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!
12
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
13
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
14
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
15
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
16
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
17
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
18
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
19
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
20
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    

डाळिंब निर्यातीसाठी जिल्ह्यातील ३७१ शेतकरी इच्छुक

By admin | Updated: December 7, 2014 00:19 IST

औरंगाबाद : डाळिंब निर्यातीसाठी जिल्ह्यातील ३७१ बागायतदारांनी इच्छा दर्शविली आहे. निर्यातक्षम डाळिंब तयार करण्याची क्षमता असणाऱ्या उत्पादकांचे नाव वेबसाईटवर टाकण्यात येणार आहे.

औरंगाबाद : डाळिंब निर्यातीसाठी जिल्ह्यातील ३७१ बागायतदारांनी इच्छा दर्शविली आहे. निर्यातक्षम डाळिंब तयार करण्याची क्षमता असणाऱ्या उत्पादकांचे नाव वेबसाईटवर टाकण्यात येणार आहे. निर्यातीच्या दराचा फायदा थेट उत्पादकाला मिळावा यासाठी कृषी पणन मंडळ निर्यातदार व उत्पादकांची भेट घडवून आणणार आहे. डाळिंबाची साल जाड असल्याने त्याचे आयुष्यमान इतर फळांच्या मानाने जास्त असते. या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे दूरवरच्या बाजारपेठेत पाठवणे शक्य होते. शीतगृहात शून्य अंश तापमान आणि ९० टक्के आर्द्रता ठेवली असता फळे चार महिन्यांपर्यंत उत्तम तऱ्हेने साठवून ठेवता येतात. मराठवाड्यात १००७५ हेक्टर क्षेत्रावर डाळिंब बागा आहेत. त्यातील औरंगाबाद जिल्ह्यात ४४०० हेक्टर क्षेत्रावर बागा उभ्या आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निर्यातीसाठी नाशिक येथील दलालांशी संपर्क करावालागतो. दलाली द्यावी लागत असल्याने कमी भाव मिळतो. ही अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र कृषी पणन मंडळाने पुढाकार घेतला असून निर्यातक व डाळिंब उत्पादक यांची थेट भेट घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू केलाआहे. विभागीय कार्यालयाचे उपसरव्यवस्थापक संतोष आळसे यांनी सांगितले की, मराठवाड्यातील शेतकरी निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन करतात; पण निर्यातीसाठी नावनोंदणी करत नसल्याने निर्यात होत नाही. ज्यांनी नोंदणी केली, त्या शेतकऱ्यांच्या नावाने डाळिंब निर्यातीला पाठवावी लागतात. यासाठी सर्वप्रथम आम्ही उत्पादकांची नोंदणी सुरू केली. नावनोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना निर्यातक्षम डाळिंब कसे तयार करायचे याची इत्थंभूत माहिती देण्यासाठी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. यानंतर निर्यातदार व उत्पादकांची थेट भेट घडवून आणण्यात येणार आहे. जेणेकरून मधल्या दलालांची साखळी कमी होऊन उत्पादकांना चांगला भाव मिळेल.आंबा निर्यात सुविधा केंद्रात डाळिंबालाही परवानगी कृषी पणन मंडळाच्या वतीने जालन्यात केशर आंबा निर्यात सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. मागील वर्षी या केंद्रातून १६ टन केशर निर्यातीसाठी पाठविण्यात आला होता. हंगामातच या केंद्राचा वापर करण्यात येतो. डाळिंब हे वर्षभर उपलब्ध असते. मराठवाड्यातील डाळिंबांची निर्यात वाढविण्यासाठी आता जालन्यातील आंबा निर्यात सुविधा केंद्राचा वापर करण्यात येणार आहे. या केंद्रात यांत्रिक प्रतवारी, प्रशीतकरणगृह, शीतगृह, रायपनिंग चेंबर व पॅक हाऊसची व्यवस्था आहे. येथे प्रक्रिया करून थेट निर्यातीसाठी डाळिंब पाठविता येणार आहे. याचा फायदा उत्पादकांना होईल.आजपर्यंत ३७१ उत्पादकांनी अर्ज सादर केले आहेत. यात वैजापूर तालुक्यातील २८७, फुलंब्री ३१, सिल्लोेड ३१, खुलताबाद ५, कन्नड ५, पैठण १ अशा ३६३ शेतकऱ्यांचे अर्ज मंडळास प्राप्त झाले आहेत. याशिवाय जालना व बीड जिल्ह्यातील प्रत्येकी ४ अशा एकूण ३७१ उत्पादकांनी अर्ज भरले आहेत. या सर्वांची माहिती ‘डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट अनार नेट’ या वेबसाईटवर टाकण्यात येणार आहे.