शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंब निर्यातीसाठी जिल्ह्यातील ३७१ शेतकरी इच्छुक

By admin | Updated: December 7, 2014 00:19 IST

औरंगाबाद : डाळिंब निर्यातीसाठी जिल्ह्यातील ३७१ बागायतदारांनी इच्छा दर्शविली आहे. निर्यातक्षम डाळिंब तयार करण्याची क्षमता असणाऱ्या उत्पादकांचे नाव वेबसाईटवर टाकण्यात येणार आहे.

औरंगाबाद : डाळिंब निर्यातीसाठी जिल्ह्यातील ३७१ बागायतदारांनी इच्छा दर्शविली आहे. निर्यातक्षम डाळिंब तयार करण्याची क्षमता असणाऱ्या उत्पादकांचे नाव वेबसाईटवर टाकण्यात येणार आहे. निर्यातीच्या दराचा फायदा थेट उत्पादकाला मिळावा यासाठी कृषी पणन मंडळ निर्यातदार व उत्पादकांची भेट घडवून आणणार आहे. डाळिंबाची साल जाड असल्याने त्याचे आयुष्यमान इतर फळांच्या मानाने जास्त असते. या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे दूरवरच्या बाजारपेठेत पाठवणे शक्य होते. शीतगृहात शून्य अंश तापमान आणि ९० टक्के आर्द्रता ठेवली असता फळे चार महिन्यांपर्यंत उत्तम तऱ्हेने साठवून ठेवता येतात. मराठवाड्यात १००७५ हेक्टर क्षेत्रावर डाळिंब बागा आहेत. त्यातील औरंगाबाद जिल्ह्यात ४४०० हेक्टर क्षेत्रावर बागा उभ्या आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निर्यातीसाठी नाशिक येथील दलालांशी संपर्क करावालागतो. दलाली द्यावी लागत असल्याने कमी भाव मिळतो. ही अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र कृषी पणन मंडळाने पुढाकार घेतला असून निर्यातक व डाळिंब उत्पादक यांची थेट भेट घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू केलाआहे. विभागीय कार्यालयाचे उपसरव्यवस्थापक संतोष आळसे यांनी सांगितले की, मराठवाड्यातील शेतकरी निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन करतात; पण निर्यातीसाठी नावनोंदणी करत नसल्याने निर्यात होत नाही. ज्यांनी नोंदणी केली, त्या शेतकऱ्यांच्या नावाने डाळिंब निर्यातीला पाठवावी लागतात. यासाठी सर्वप्रथम आम्ही उत्पादकांची नोंदणी सुरू केली. नावनोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना निर्यातक्षम डाळिंब कसे तयार करायचे याची इत्थंभूत माहिती देण्यासाठी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. यानंतर निर्यातदार व उत्पादकांची थेट भेट घडवून आणण्यात येणार आहे. जेणेकरून मधल्या दलालांची साखळी कमी होऊन उत्पादकांना चांगला भाव मिळेल.आंबा निर्यात सुविधा केंद्रात डाळिंबालाही परवानगी कृषी पणन मंडळाच्या वतीने जालन्यात केशर आंबा निर्यात सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. मागील वर्षी या केंद्रातून १६ टन केशर निर्यातीसाठी पाठविण्यात आला होता. हंगामातच या केंद्राचा वापर करण्यात येतो. डाळिंब हे वर्षभर उपलब्ध असते. मराठवाड्यातील डाळिंबांची निर्यात वाढविण्यासाठी आता जालन्यातील आंबा निर्यात सुविधा केंद्राचा वापर करण्यात येणार आहे. या केंद्रात यांत्रिक प्रतवारी, प्रशीतकरणगृह, शीतगृह, रायपनिंग चेंबर व पॅक हाऊसची व्यवस्था आहे. येथे प्रक्रिया करून थेट निर्यातीसाठी डाळिंब पाठविता येणार आहे. याचा फायदा उत्पादकांना होईल.आजपर्यंत ३७१ उत्पादकांनी अर्ज सादर केले आहेत. यात वैजापूर तालुक्यातील २८७, फुलंब्री ३१, सिल्लोेड ३१, खुलताबाद ५, कन्नड ५, पैठण १ अशा ३६३ शेतकऱ्यांचे अर्ज मंडळास प्राप्त झाले आहेत. याशिवाय जालना व बीड जिल्ह्यातील प्रत्येकी ४ अशा एकूण ३७१ उत्पादकांनी अर्ज भरले आहेत. या सर्वांची माहिती ‘डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट अनार नेट’ या वेबसाईटवर टाकण्यात येणार आहे.