शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

डाळिंब निर्यातीसाठी जिल्ह्यातील ३७१ शेतकरी इच्छुक

By admin | Updated: December 7, 2014 00:19 IST

औरंगाबाद : डाळिंब निर्यातीसाठी जिल्ह्यातील ३७१ बागायतदारांनी इच्छा दर्शविली आहे. निर्यातक्षम डाळिंब तयार करण्याची क्षमता असणाऱ्या उत्पादकांचे नाव वेबसाईटवर टाकण्यात येणार आहे.

औरंगाबाद : डाळिंब निर्यातीसाठी जिल्ह्यातील ३७१ बागायतदारांनी इच्छा दर्शविली आहे. निर्यातक्षम डाळिंब तयार करण्याची क्षमता असणाऱ्या उत्पादकांचे नाव वेबसाईटवर टाकण्यात येणार आहे. निर्यातीच्या दराचा फायदा थेट उत्पादकाला मिळावा यासाठी कृषी पणन मंडळ निर्यातदार व उत्पादकांची भेट घडवून आणणार आहे. डाळिंबाची साल जाड असल्याने त्याचे आयुष्यमान इतर फळांच्या मानाने जास्त असते. या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे दूरवरच्या बाजारपेठेत पाठवणे शक्य होते. शीतगृहात शून्य अंश तापमान आणि ९० टक्के आर्द्रता ठेवली असता फळे चार महिन्यांपर्यंत उत्तम तऱ्हेने साठवून ठेवता येतात. मराठवाड्यात १००७५ हेक्टर क्षेत्रावर डाळिंब बागा आहेत. त्यातील औरंगाबाद जिल्ह्यात ४४०० हेक्टर क्षेत्रावर बागा उभ्या आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निर्यातीसाठी नाशिक येथील दलालांशी संपर्क करावालागतो. दलाली द्यावी लागत असल्याने कमी भाव मिळतो. ही अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र कृषी पणन मंडळाने पुढाकार घेतला असून निर्यातक व डाळिंब उत्पादक यांची थेट भेट घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू केलाआहे. विभागीय कार्यालयाचे उपसरव्यवस्थापक संतोष आळसे यांनी सांगितले की, मराठवाड्यातील शेतकरी निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन करतात; पण निर्यातीसाठी नावनोंदणी करत नसल्याने निर्यात होत नाही. ज्यांनी नोंदणी केली, त्या शेतकऱ्यांच्या नावाने डाळिंब निर्यातीला पाठवावी लागतात. यासाठी सर्वप्रथम आम्ही उत्पादकांची नोंदणी सुरू केली. नावनोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना निर्यातक्षम डाळिंब कसे तयार करायचे याची इत्थंभूत माहिती देण्यासाठी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. यानंतर निर्यातदार व उत्पादकांची थेट भेट घडवून आणण्यात येणार आहे. जेणेकरून मधल्या दलालांची साखळी कमी होऊन उत्पादकांना चांगला भाव मिळेल.आंबा निर्यात सुविधा केंद्रात डाळिंबालाही परवानगी कृषी पणन मंडळाच्या वतीने जालन्यात केशर आंबा निर्यात सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. मागील वर्षी या केंद्रातून १६ टन केशर निर्यातीसाठी पाठविण्यात आला होता. हंगामातच या केंद्राचा वापर करण्यात येतो. डाळिंब हे वर्षभर उपलब्ध असते. मराठवाड्यातील डाळिंबांची निर्यात वाढविण्यासाठी आता जालन्यातील आंबा निर्यात सुविधा केंद्राचा वापर करण्यात येणार आहे. या केंद्रात यांत्रिक प्रतवारी, प्रशीतकरणगृह, शीतगृह, रायपनिंग चेंबर व पॅक हाऊसची व्यवस्था आहे. येथे प्रक्रिया करून थेट निर्यातीसाठी डाळिंब पाठविता येणार आहे. याचा फायदा उत्पादकांना होईल.आजपर्यंत ३७१ उत्पादकांनी अर्ज सादर केले आहेत. यात वैजापूर तालुक्यातील २८७, फुलंब्री ३१, सिल्लोेड ३१, खुलताबाद ५, कन्नड ५, पैठण १ अशा ३६३ शेतकऱ्यांचे अर्ज मंडळास प्राप्त झाले आहेत. याशिवाय जालना व बीड जिल्ह्यातील प्रत्येकी ४ अशा एकूण ३७१ उत्पादकांनी अर्ज भरले आहेत. या सर्वांची माहिती ‘डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट अनार नेट’ या वेबसाईटवर टाकण्यात येणार आहे.