शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

अर्धापूरकरांत नाराजी

By admin | Updated: July 11, 2014 01:02 IST

अर्धापूर : ग्रामीण विद्यार्थिनींना गाव ते शाळा दरम्यान मानव विकास कार्यक्रमांतर्गत मोफत वाहतूक योजनेत अर्धापूर तालुक्याचा समावेश नसल्याने पालकांत नाराजी पसरली.

अर्धापूर : ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना किमान बारावीपर्यंत शिक्षण घेता यावे यासाठी गाव ते शाळा दरम्यान मानव विकास कार्यक्रमांतर्गत मोफत वाहतूक योजनेत अर्धापूर तालुक्याचा समावेश नसल्याने पालकांत नाराजी पसरली आहे़तालुक्यातील तामसा मार्गावरील लहान, चाभरा, लोण येथून १५० मुली, हिंगोली मार्गावर निमगाव, पार्डी येथून ७० मुली, वसमत मार्गावरील कामठा, मेंढला, खडकी येथून १२५ मुली, नांदेड मार्गावरील जांभरून, दाभड येथील ५० मुली व इतर ठिाणच्या अशा एकूण ६०० मुली अर्धापूरला शिकवणीसाठी येतात़दीड लाखांच्या जवळपास रुपये विद्यार्थी पासेसमार्फत एस़टी़ महामंडळाला उत्पन्न असताना त्या मानाने येथील बसस्थानकावर सुविधा नाहीत़ अद्ययावत वेळापत्रक नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, महत्त्वाचे म्हणजे प्रसाधन गृहाची सोय नसल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे़ विशेषत: विद्यार्थिनींची कुचंबना होत आहे़भरपूर संख्येने असलेल्या विद्यार्थिनींची एसटी बसमधून प्रवास करताना व बसण्यासाठी जागा मिळवण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते़ सावित्रीच्या लेकींना शिक्षण घेण्यासाठी शाळेत जाता यावे, यासाठी शासनाने खास मुलींसाठी ८६९ बसेस घेवून दिल्या आहेत़ भोकर विधानसभा मतदारसंघातील मुदखेड व भोकर तालुके मानव विकास योजनेत अंतर्भुत आहेत़ पण विद्यार्थिनींची संख्या जादा असताना अर्धापूर तालुका या योजनेपासून वंचित आहे़ गेल्या दोन वर्षांपासून याबाबत विचार झाला नाही़ अर्धापूर तालुक्याचा मानव विकास मिशन मोफत वाहतूक व्यवस्थेत समावेश करावा, अथवा शाळा, कॉलेजच्या वेळेनुसार नियमित एसटी बसेसच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी होत आहे़ (वार्ताहर)तालुक्यात विविध पदावर महिला अधिकारी व पदाधिकाऱ्यांची संख्या भरपूर असताना तालुक्याच्या बसस्थानकावर महिलांसाठी प्रसाधनगृहाची सोय नसावी ही लाजीरवाणी बाब आहे - शिवाजी कपाळे, पालक, रा़चाभरा़विद्यार्थिनींसाठी शाळा, कॉलेजच्या वेळेनुसार ये-जा करण्यासाठी नियमित एस़टी़ बसेसची सोय करण्यात यावी - सुहासिनी सुभाष सावंत, बीसीए, द्वितीय वर्षबस स्थानकावर विद्यार्थिनी व महिलांसाठी मुलभूत सुविधा पुरविणे अत्यंत गरजेचे आहे - राजनंदीनी माणिकराव पिंपळे, विद्यार्थिनी बीसीए, तृतीय वर्ष़