शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

अतिक्रमणे रोखण्यासाठी आता पथकांची नियुक्ती

By admin | Updated: June 22, 2014 00:06 IST

उस्मानाबाद : अपघतांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन जिल्ह्यातील अतिक्रमण हटव्यिाची मोहीम हाती घेण्यात आली होती.

उस्मानाबाद : अपघतांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन जिल्ह्यातील अतिक्रमण हटव्यिाची मोहीम हाती घेण्यात आली होती. तरीही नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवर परत अतिक्रमण होत असल्याचे दिसून येत आहे. परत अतिक्रमण होऊ नये, यासाठी पथकाची नियुक्ती करण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील यांनी संबधित यंत्रणेला दिले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नगर परिषद हद्दीतील वाहतूक व इतर विषयांच्या नियोजनाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पाटील यांनी हे निर्देश दिले. पुन्हा-पुन्हा होणाऱ्या अतिक्रमणावर कायदेशीर कार्यवाही करावी, त्याचबरोबर व्यावसायिकांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार करताना जिल्ह्यातील नगरपालिकांनी त्यांच्या ताब्यातील मोकळ्या जागेबाबतचा सर्वे करावा, मोकळ्या जागेत हॉकर्स, झोन व पार्किंग एरिया तयार करावा, याबाबत नगरपालिकांनी सर्वसाधारण सभेत हा विषय ठेवून तो मंजूर करुन घ्यावा, या जागेची नोंद सर्वेला घेण्यात यावी, याचबरोबर टू-एन-वन वाहनाचे टेंडर काढणे, जॅमर ताबा पावती घेऊन त्या मोकळ्या जागेची प्रशासनाकडून रितसर नोंदणी करुन घ्यावी . टॅक्सी व रिक्षा स्टँड व्यवस्थेसाठी पार्किंग करणे, दराचे बोर्ड लावणे, दिशादर्शक फलक लावण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.जिल्ह्यातील वाहतूक नियत्रणांसाठी एनसीसी, एनएसएस, स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वेळापत्रक तयार करण्याबरोबरच नगरपालिका क्षेत्रामध्ये सर्वांच्या सहकार्याने १५ जुलै २०१४ हा दिवस वृक्षलागवड दिन म्हणून साजरा करुन जास्तीत-जास्त झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे आवाहन पाटील यांनी यावेळी केले. बैठकीला अतिरिक्त पोलिस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, उपजिल्हाधिकारी भालचंद्र चाकूरकर, उपविभागीय अधिकारी शोभा राऊत, रवींद्र गुरव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय म्हेत्रेवार, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक वृषाली तेलोरे यांच्यासह सर्व नगर पालिकेचे मुख्याधिकारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)