शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

शेतकऱ्यांमध्ये नाराजी; पैसे कमी आले !

By admin | Updated: March 19, 2015 00:17 IST

लातूर : लातूर शहराबाहेरुन जाणाऱ्या वळण रस्त्यासाठी लातूर तालुक्यातील चांडेश्वर, कातपूर, कव्हा, सिरसी, बाभळगाव, आनंदवाडी, सोनवती आदी गावातील १२५ शेतकऱ्यांची जमीन

लातूर : लातूर शहराबाहेरुन जाणाऱ्या वळण रस्त्यासाठी लातूर तालुक्यातील चांडेश्वर, कातपूर, कव्हा, सिरसी, बाभळगाव, आनंदवाडी, सोनवती आदी गावातील १२५ शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे़ या जमिनीचा मावेजा देण्यासाठी संबंधीत शेतकऱ्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी नोटिसा पाठविल्या आहेत. बुधवारी २५ ते ३० शेतकऱ्यांनी मावेजासाठी बँकेचे जोडपत्र, सातबारा आणि मतदार ओळखपत्र आदी कागदपत्र उपविभागीय कार्यालयात सादर केली आहेत़ दरम्यान, बाजार भावाप्रमाणे जमिनीला मावेजा मिळाला नसल्यामुळे शेतकरी नाराज असून, न्यायालयात धाव घेण्याच्या ते मनस्थितीत आहेत़ लातूर शहराबाहेरून रत्नागिरी-नागपूर हायवे जात आहे़ या रस्त्याच्या वळणासाठी तालुक्यातील चांडेश्वर, कातपूर, कव्हा, सिरसी, बाभळगाव, आनंदवाडी, सोनवती आदी गावांतील शेतकऱ्यांची जमीन संपादीत करण्यात आली आहे़ संपादीत केलेल्या जमीनीला गुंठा ६ हजार ४५० रुपये शासनाने मंजूर केला आहे़ मंजूर मावेजा घेऊन जा म्हणून या शेतकऱ्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी नोटिसा पाठविल्या आहेत़ १८ मार्च पर्यंत उपविभागीय कार्यालयात हजर राहवे व मावेजा घ्यावा़ निषेध व्यक्त करुन ही रक्कम स्विकारण्याचा अधिकार शेतकऱ्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी बहाल केला आहे़ सदरची रक्कम स्वीकारुन दिवाणी न्यायालयात जाण्याचा हक्कही अबाधीत ठेवण्यात आला आहे़ मात्र हजर न राहिल्यास मंजूर रकमेवर व्याज न देण्याचा निर्णयही उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतला आहे़ दरम्यान, बाजारभावाप्रमाणे किंवा कमी-अधिक मावेजा मिळाला नाही़ म्हणून शेतकरी नाराज आहेत़ दिवाणी न्यायालयात जाण्यासाठी विधिज्ज्ञांसोबत ते चर्चा करीत आहेत़ शहराबाहेरुन जाणाऱ्या वळण रस्त्यासाठी जमिनी संपादित करण्याची गरज नव्हती़ तोंडे पाहून जमिनी संपादीत केल्या आहेत, असा आरोपही काही शेतकऱ्यांनी केला आहे़ १२५ पैकी २५ ते ३० शेतकऱ्यांनी बुधवारी दुपारी ४ पर्यंत मंजूर रक्कम घेण्यासाठी कागदपत्र सादर केली. (प्रतिनिधी)२००९ पासून शेतकऱ्यांना जमिनी संपादनासाठी नोटीस होत्या़ आता संपादीत जमिनीसाठी गुंठा ६ हजार ४५० रुपयाप्रमाणे ८१ आर जमिनीसाठी ५ लाख ३७ हजार ८४० रुपये मंजूर झाले आहेत हा आमच्यावर अन्याय असल्याचे कव्हा येथील शेतकरी भानुदास घार म्हणाले़ सचिन घार म्हणाले, माझीही ८१ आर जमीन संपादीत झाली आहे़ त्यासाठी ५ लाख ३७ हजार ८४० रुपये मंजूर झाले आहेत़ ही रक्कम अपूरी आहे़ दिवाणी न्यायालयात जाण्याचा हक्क आहे़ परंतु हा दावा या पैशावर किती दिवस चालवायचा हा आम्हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे़ कव्हा येथील हमजा उस्मान पठाण म्हणाले, वळण रस्त्यासाठी आमची जमीन घेतली. आमच्या जन्माची भाकर गेली. भरपाई मात्र कमी दिली आहे़ हा शासनाने केलेला अन्याय आहे़ शासनाने ६ हजार ४५० रुपयाच्या दरामध्ये वाढ करावी, अशी मागणीही हमजा पठाण यांनी केली़