शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
4
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
5
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
6
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
7
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
8
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
9
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
10
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
11
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
12
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
13
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
14
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
15
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
16
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
17
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO
18
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
19
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
20
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!

अन् कोरड्याठाक नद्या वाहू लागल्या !

By admin | Updated: April 22, 2015 00:38 IST

बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद केनिया, नायझेरिया, युगान्डा आदी आफ्रिकी देशांमध्ये ग्रीनबेल्ट चळवळीच्या माध्यमातून पाणी-अन्नसुरक्षा-वृक्ष लागवड या त्रिसूत्रीवर भर देण्यात आला.

बाबूराव चव्हाण , उस्मानाबादकेनिया, नायझेरिया, युगान्डा आदी आफ्रिकी देशांमध्ये ग्रीनबेल्ट चळवळीच्या माध्यमातून पाणी-अन्नसुरक्षा-वृक्ष लागवड या त्रिसूत्रीवर भर देण्यात आला. बघताबघता ४० कोटी वृक्ष लागवड झाली. परिणाम म्हणून आफ्रिकी देशांतील कोरड्या पडलेल्या प्रमुख नद्या आज वाहत आहेत. यासोबतच आता ऊर्जा विषय हाती घेतल्याचे ‘ग्रीनबेल्ट’च्या डायरेक्टर वंजिरा मथाई यांनी सांगितले. त्या खास ‘लोकमत’शी बोलत होत्या.आफ्रिकी देशांतील काही भागामध्ये वृक्षांचे अत्यल्प प्रमाण होते. त्यामुळे पर्जन्यमानही फारसे नसायचे. परिणामी या देशांतील गुऱ्हा, चायना, मलेरवा, युरेवा, नायरो आदी प्रमुख नद्या कोरड्या असायच्या. त्यामुळे या भागातील नागरिक प्रचंड दारिद्र्यामध्ये जगत असत. अन्न सुरक्षेचा प्रश्नही गंभीर होता. आणि पाणीप्रश्नाचा तर विचार न केलेलाच बरा, असे वंजिरा मथाई म्हणाल्या. हे सर्व प्रश्न लक्षात घेवूनच वंगारी मथाई (वंजिरा मथाई यांच्या आई) यांनी १९७७ साली ग्रीनबेल्ट मुव्हमेंटची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी वृक्ष लागवडीवर भर दिला. ज्या भागात वृक्षांची संख्या कमी आहे, अशा ठिकाणी पारंपरिक वृक्षांची लागवड करण्याचे काम हाती घेण्यात आले. बघता-बघता तब्बल ४० कोटी वृक्षांची लागवड झाली. आज केनिया, नायझेरिया, युगान्डा आदी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहेत. परिणामी गुऱ्हा, चायना, मलेरवा, युरेवा, नायरो या कोरड्या पडलेल्या नद्यांना वर्षभर पाणी असते. त्यामुळे त्या-त्या भागातील नागरिकांची आर्थिक उन्नती होण्यास मदत झाल्याचेही मथाई यांनी सांगितले. याच कामाच्या बळावर आई वंगारी मथाई यांना २००४ मध्ये ‘नोबेलपीस’ने गौरविण्यात आले. आईने ‘ग्रीनबेल्ट’च्या माध्यमातून केलेले काम पुढे नेत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पाणी, अन्नसुरक्षा आणि वृक्ष लागवड यासोबतच आता ‘ऊर्जा’या घटकावरही काम करण्यात येत असल्याचे सांगितले. भारतामध्ये स्वंय शिक्षण प्रयोग या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सौरऊर्जेसह अन्य घटकावर मोठ्या प्रमाणात काम करण्यात येत आहे. हेच काम पहाण्यासाठी आम्ही भारतामध्ये आलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.आफ्रिकी देशामध्ये मागील काही वर्षांमध्ये वृक्ष लागवडीवर भर दिला आहे. वृक्ष लागवडीसोबतच जोपासणा करण्यावरही तितकेच लक्ष दिले जाते. त्यामुळे या देशांतील वृक्षांची संख्या वाढली आहे. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावांना भेटी दिल्या असता वृक्षांची संख्या खुपच कमी असल्याचे दिसले. त्यामुळे जमिनीची धूपही होत आहे. याचा परिणाम पर्जन्यमानावर होत आहे. हे टाळण्यासाठी वृक्ष लागवडीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.आपल्याकडे बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. नवीन वृक्षांची लागवड केली तर ते जगेलच याची शास्वती नसते. मात्र, याच्या उलट चित्र आफ्रिकी देशांमध्ये आहे. तेथे केवळ वाळलेली झाडे तोडली जातात. त्या लाकडांचा वापर जळणासाठी केला जातो. मात्र, वाळलेले झाड तोडल्यानंतर त्या ठिकाणी लागलीच वृक्षारोपण केले जाते. वृक्ष लागवड केल्यानंतर त्याची जोपासणाही तितक्याच काटेकोरपणे केली जाते. म्हणून दहा रोपे लावली तर ती सर्वच्यासर्व जगतात, असे वंजिरा मथाई म्हणाल्या.