शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

अन् कोरड्याठाक नद्या वाहू लागल्या !

By admin | Updated: April 22, 2015 00:38 IST

बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद केनिया, नायझेरिया, युगान्डा आदी आफ्रिकी देशांमध्ये ग्रीनबेल्ट चळवळीच्या माध्यमातून पाणी-अन्नसुरक्षा-वृक्ष लागवड या त्रिसूत्रीवर भर देण्यात आला.

बाबूराव चव्हाण , उस्मानाबादकेनिया, नायझेरिया, युगान्डा आदी आफ्रिकी देशांमध्ये ग्रीनबेल्ट चळवळीच्या माध्यमातून पाणी-अन्नसुरक्षा-वृक्ष लागवड या त्रिसूत्रीवर भर देण्यात आला. बघताबघता ४० कोटी वृक्ष लागवड झाली. परिणाम म्हणून आफ्रिकी देशांतील कोरड्या पडलेल्या प्रमुख नद्या आज वाहत आहेत. यासोबतच आता ऊर्जा विषय हाती घेतल्याचे ‘ग्रीनबेल्ट’च्या डायरेक्टर वंजिरा मथाई यांनी सांगितले. त्या खास ‘लोकमत’शी बोलत होत्या.आफ्रिकी देशांतील काही भागामध्ये वृक्षांचे अत्यल्प प्रमाण होते. त्यामुळे पर्जन्यमानही फारसे नसायचे. परिणामी या देशांतील गुऱ्हा, चायना, मलेरवा, युरेवा, नायरो आदी प्रमुख नद्या कोरड्या असायच्या. त्यामुळे या भागातील नागरिक प्रचंड दारिद्र्यामध्ये जगत असत. अन्न सुरक्षेचा प्रश्नही गंभीर होता. आणि पाणीप्रश्नाचा तर विचार न केलेलाच बरा, असे वंजिरा मथाई म्हणाल्या. हे सर्व प्रश्न लक्षात घेवूनच वंगारी मथाई (वंजिरा मथाई यांच्या आई) यांनी १९७७ साली ग्रीनबेल्ट मुव्हमेंटची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी वृक्ष लागवडीवर भर दिला. ज्या भागात वृक्षांची संख्या कमी आहे, अशा ठिकाणी पारंपरिक वृक्षांची लागवड करण्याचे काम हाती घेण्यात आले. बघता-बघता तब्बल ४० कोटी वृक्षांची लागवड झाली. आज केनिया, नायझेरिया, युगान्डा आदी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहेत. परिणामी गुऱ्हा, चायना, मलेरवा, युरेवा, नायरो या कोरड्या पडलेल्या नद्यांना वर्षभर पाणी असते. त्यामुळे त्या-त्या भागातील नागरिकांची आर्थिक उन्नती होण्यास मदत झाल्याचेही मथाई यांनी सांगितले. याच कामाच्या बळावर आई वंगारी मथाई यांना २००४ मध्ये ‘नोबेलपीस’ने गौरविण्यात आले. आईने ‘ग्रीनबेल्ट’च्या माध्यमातून केलेले काम पुढे नेत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पाणी, अन्नसुरक्षा आणि वृक्ष लागवड यासोबतच आता ‘ऊर्जा’या घटकावरही काम करण्यात येत असल्याचे सांगितले. भारतामध्ये स्वंय शिक्षण प्रयोग या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सौरऊर्जेसह अन्य घटकावर मोठ्या प्रमाणात काम करण्यात येत आहे. हेच काम पहाण्यासाठी आम्ही भारतामध्ये आलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.आफ्रिकी देशामध्ये मागील काही वर्षांमध्ये वृक्ष लागवडीवर भर दिला आहे. वृक्ष लागवडीसोबतच जोपासणा करण्यावरही तितकेच लक्ष दिले जाते. त्यामुळे या देशांतील वृक्षांची संख्या वाढली आहे. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावांना भेटी दिल्या असता वृक्षांची संख्या खुपच कमी असल्याचे दिसले. त्यामुळे जमिनीची धूपही होत आहे. याचा परिणाम पर्जन्यमानावर होत आहे. हे टाळण्यासाठी वृक्ष लागवडीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.आपल्याकडे बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. नवीन वृक्षांची लागवड केली तर ते जगेलच याची शास्वती नसते. मात्र, याच्या उलट चित्र आफ्रिकी देशांमध्ये आहे. तेथे केवळ वाळलेली झाडे तोडली जातात. त्या लाकडांचा वापर जळणासाठी केला जातो. मात्र, वाळलेले झाड तोडल्यानंतर त्या ठिकाणी लागलीच वृक्षारोपण केले जाते. वृक्ष लागवड केल्यानंतर त्याची जोपासणाही तितक्याच काटेकोरपणे केली जाते. म्हणून दहा रोपे लावली तर ती सर्वच्यासर्व जगतात, असे वंजिरा मथाई म्हणाल्या.