शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

-तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल

By admin | Updated: November 24, 2014 12:40 IST

विदर्भ व मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही विभागांत शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा.

लातूर : विदर्भ व मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही विभागांत शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा. विशेष बाब म्हणून लातूर जिल्ह्याला वाढीव अनुदान मंजूर करण्यात यावे, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली असून, या मागणीचा विचार न केल्यास काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून जनांदोलन करेल, अशी माहिती आमदार अमित देशमुख यांनी येथे रविवारी पत्रपरिषदेत दिली. आ. अमित देशमुख म्हणाले, गेल्या तीन-चार वर्षांपासून लातूर जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिकांची परिस्थिती बिकट आहे. राज्याच्या महसूल मंत्र्यांनी नुकताच मराठवाड्याचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ दुष्काळ जाहीर करावा. त्यांच्या घोषणेची प्रतीक्षा आहे. दुष्काळ जाहीर केल्यास शेतकर्‍यांना दिलासा मिळेल. लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा. पिण्याच्या पाण्यासाठी भरीव मदत करावी. चारा छावण्या सुरू कराव्यात. शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात यावे. शेतकर्‍यांचे वीजबिल माफ करण्यात यावे, शेतसारा माफ करण्यात यावा, विहीर-बोअर अधिग्रहण व टँकरने पाणीपुरवठा करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात यावेत. चारा खरेदीसाठी अनुदान देण्यात यावे. फळबाग पिकासाठी ७५ हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात यावे. लातूर मनपाला टंचाई निवारणासाठी अतिरिक्त १0 कोटी व जिल्हा परिषदेला ३0 कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही आमदार अमित देशमुख यांनी पत्रपरिषदेत केली. या मागण्यांचा विचार न केल्यास काँग्रेस पक्ष येणार्‍या काळात रस्त्यावर उतरून जनांदोलन करेल, असेही ते म्हणाले. पत्रपरिषदेला आ. त्रिंबक भिसे, अँड. त्र्यंबकदास झंवर, अँड. व्यंकट बेद्रे, महापौर अख्तर मिस्त्री, उपमहापौर कैलास कांबळे, मोईज शेख, प्रा. बी.व्ही. मोतीपवळे, अँड. विक्रम हिप्परकर, दगडूसाहेब पडिले, राजकुमार जाधव आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)