शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

अंबडला पाणी मिळाले

By admin | Updated: January 23, 2015 00:54 IST

अंबड : जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेतून अंबड शहरासाठी जोडणीच्या कामास बुधवारी सायंकाळी सुरुवात झाली असुन दोन दिवसात पाणी मिळणार

अंबड : जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेतून अंबड शहरासाठी जोडणीच्या कामास बुधवारी सायंकाळी सुरुवात झाली असुन दोन दिवसात पाणी मिळणार असल्याची माहिती आ राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आ टोपे यांनी यापुढे नगरपालिका सक्तीची वसुली व अवैध नळ कनेक्शन कट करण्याची मोहिम राबविणार असल्याचेही सांगितले.यावेळी बोलताना आ टोपे म्हणाले की, जायकवाडी-जालना योजनेत शहराचा समावेश करण्यासाठी जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या दोन दिवसात प्रत्यक्षात नागरिकांच्या नळाला जायकवाडीचे पाणी मिळणार आहे. याकरिता अंबड नगरपालिकेने पाण्याची रक्कम अडवान्स भरली आहे. शहरास या योजनेतुन सध्या ४ एमएलडी पाणी मिळणार आहे. सध्याची शहराची पाण्याची आवश्यकता पाहता शहरासाठी ४ एमएलडी पाणी पुरसे ठरणार आहे. मात्र यासाठी नागरिकांनी जबाबदारीने पालिकेला नळपट्टी वसुलीसाठी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. अंबड नगरपालिका पाण्यासाठी पैसे एक महिना अगोदर भरणार असल्याने नळपट्टी वसुली समाधानकारक राहिल्यास नगरपालिकेला पाण्यासाठीचे पैसे भरण्यास अडचण येणार नाही. यासाठी पालिकेला नळपट्टी करामध्ये काही प्रमाणात वाढ करावी लागणार असुन नागरिकांनी याबाबत सहकार्य करावे. नळपट्टीमध्ये किती प्रमाणात वाढ करायची याविषयी येत्या आठ दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही आ टोपे यांनी यावेळी सांगितले. जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेत समावेश झाल्यानंतर शहराची अंतर्गत जलवितरण व्यवस्था हा महत्वाचा मुद्दा राहणार आहे. शहराची जलवितरण व्यवस्था ही निजामकालिन असुन यामध्ये बदल आवश्यक आहे. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या सहकार्याने शहरातील अंतर्गत जलवितरण व्यवस्थेसाठी निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. संपुर्ण अंतर्गत वितरण यंत्रणा बदलुन त्याजागी नविन वितरण व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. जायकवाडी-जालना योजनेत शहराचा समावेश झाल्याने अतिरिक्त जलशुध्दीकरण केंद्राचा प्रश्न निर्माण होणार आहे. याकरिता जलशुध्दीकरण केंद्राशेजारी अस्तित्वात असलेल्या मात्र कार्यरत नसलेल्या जलशुध्दीकरण केंद्राची दुरुस्ती करुन ही जलशुध्दीकरण केंद्राची इमारत कार्यान्वित करणार असल्याचेही यावेळी टोपे यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्षा मंगल कटारे, उपनगराध्यक्ष संदीप आंधळे, उद्योजक काकासाहेब कटारे, नगरसेवक शिवप्रसाद चांगले, राजेश सावंत, जितेंद्र बुर्ले, संजय साळवे, कैलास भोरे, समद बागवान आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. अंबड शहराचे पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे मागील काही काळापासुन शहरास भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. शहराचा समावेश जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेत करावा अशी आग्रही मागणी सर्वच राजकीय पक्षांनी वेळोवेळी केली होती. शहराचा योजनेत समावेशासाठी शहरातील सर्वपक्षीय नागरिकांनी पंधरा दिवसांचे जलआंदोलन केले होते.अंबड शहराचा जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेत समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांचे शतश: आभार मानत असल्याचे आ. टोपे यांनी सांगितले. (वार्ताहर)