शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

आपेगावला नवीन पूल होणार

By admin | Updated: November 27, 2014 01:09 IST

पैठण : बेसुमार वाळू उपशामुळे गोदावरी नदीवरील आपेगाव-कुरणपिंप्री या गावांना जोडणारा २९० मीटर लांबीचा पूल ८ नोव्हेंबर रोजी खचला होता.

पैठण : बेसुमार वाळू उपशामुळे गोदावरी नदीवरील आपेगाव-कुरणपिंप्री या गावांना जोडणारा २९० मीटर लांबीचा पूल ८ नोव्हेंबर रोजी खचला होता. या पुलाची तपासणी बुधवारी राज्य शासनाने गठित केलेल्या समितीने केली. दुरूस्तीला दहा कोटींचा खर्च येणार असल्याने या पुलाची दुरुस्ती करण्यापेक्षा येथे नवीन पूल उभारण्याचा सूर या समितीचा दिसून आला.दरम्यान, पुलाच्या शाबूत असलेल्या भागातून किती वाळू उपसा झाला आहे याची तपासणी करा, असे आदेश या समितीने स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. या समितीचे अध्यक्ष मुख्य अभियंता सी.पी. जोशी यांच्यासह विभागाचे मंत्रालयातील अवर सचिव राम गुढे, दक्षता व गुणनियंत्रक मंडळाचे अधीक्षक अभियंता व्ही.व्ही. कुळकर्णी, संकल्प चित्र विभागाचे अधीक्षक अभियंता ठुबे यांच्या समितीने पुलाची पाहणी केली. यावेळी कार्यकारी अभियंता वृषाली गाढेकर, उपविभागीय अभियंता एन.बी. चौरे, शाखा अभियंता जायभाये आदी उपस्थित होते.पुलाच्या नवीन बांधकामासाठी अंदाजे १० कोटी रुपये खर्च येणार आहे. या पुलाची दुरुस्ती करण्यापेक्षा तेथे नवीन पूल उभारणेच योग्य होईल, असा सूर या समितीचा होता. दरम्यान, नवीन पूल बांधताना बंधाऱ्याची उंची व जलसाठा पाणीपातळी विचारात घ्यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)८ नोव्हेंबर रोजी आपेगाव व कुरणपिंप्री यांना जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील २९० मीटर लांबीचा पूल खचला होता. पुलाच्या १२६ कमानींपैकी ४२ कमानी क्षतिग्रस्त झाल्याने पुलावरील वाहतूक बंद पडली होती. बेसुमार वाळू उपसा झाल्याने ८० वर्षे वयोमर्यादा असलेला पूल अवघ्या १२ वर्षांत खचला, असा निष्कर्ष या पुलाची पाहणी केल्यानंतर शासकीय अधिकारी व तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नियुक्त केलेली समिती काय निष्कर्ष काढते, याकडे लक्ष लागले आहे.