शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

निवडणुकीसाठी प्रशासन लागले कामाला

By admin | Updated: August 29, 2014 01:28 IST

जालना : विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होऊन आदर्श आचारसंहिंता लागू होऊ शकते.

जालना : विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होऊन आदर्श आचारसंहिंता लागू होऊ शकते. तेव्हा निवडणुकीशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी या निवडणुकीच्या कामाची तयारी अचूकपणे करावी, असे आदेश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी येथे दिले.जिल्ह्यातील पाच विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत झाली, तेव्हा नायक बोलत होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंंग, अप्पर जिल्हाधिकारी गिरी, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) डॉ. भारत कदम, उपजिल्हाधिकारी (सामान्य शाखा) डॉ. एन.आर शेळके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रमेश कायंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा कोषागार अधिकारी, कल्याण औताडे, उपविभागीय अधिकारी डॉ. हरकर, मंजुषा मुथा, गणेश देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते. ज्या तहसील कार्यालयामध्ये निवडणूक शाखेत नायब तहसीलदार हे पद भरले नसेल तेथे इतरांना अतिरिक्त कार्यभार देण्यात यावा. कोणत्याही प्रकारे निवडण्णुकीचे काम थांबवू नये, आदर्श आचारसंहिता कालावधीतील कामे अचूकपणे करण्यात यावी. यासाठी जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी अचूकपणे द्यावी. या माहितीत त्रुटी असता कामा नये, असे सांगून नायक म्हणाले की, आपापल्या कार्यक्षेत्रातील मतदान केंद्र बदलावयाचे असतील तर त्याचे प्रसताव विहित स्वरुपात देण्यात यावेत. मतदारांची संख्या अचूक असावी, या निवडणूक व्यवस्थापन आराखडयाचे काम दहा ते पंधरा दिवसात पूर्ण करण्यात यावे, असेही आदेश यावेळी त्यांनी दिले.मत मोजणी केंद्राची जागा निश्चिती करण्यात यावी, निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, पोलीस अधिका-यांना सोबत घेऊन हे काम पूर्ण करावे, संयुक्त पाहणी करावी. निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची तयारी करावी, त्याची माहितीही पाठविण्यात यावी. कायदेशीर प्रकारणांचा निपटारा तहसीलदारांनी वेळेवर पूर्ण करुन त्याबाबतचे अहवाल पाठवावेत. निवडणूक खर्चाच्या तपासणीचे काम तालुका कोषागार अधिकाऱ्यांना देतांना त्यांची आदल बदल करावी. आदर्श आचार संहिता कक्षातील क्षेत्रिय अधिका-यांची नेमणूक करावी, त्यांची तपासणी पथक तयार करावीत, जिल्हयाच्या सिमेवर नाकाबंदी करण्यात यावी, निवडणुकीचे काम व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात. (प्रतिनिधी)निवडणुकीचे माहिती ठेवण्यासाठी जागा निश्चित कराव्यात, स्ट्राँग रुमच्या जागा निश्चित कराव्यात,वाहतूक आराखडा ,नकाशे तयार करावेत,वाहनांची आवश्यकता नोंदवावी.आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर दोन दिवसाच्या आत सर्व शासकीय कार्यालय,खाजगी मालमत्ता धारकांनी राजकीय पक्षाचे बॅनर,पोष्टर,पेंट केलेली माहिती पुसून स्वच्छ करावी,ज्या अधिका-यांकडून त्यांच्या शासकीय कार्यालयाच्या इमारतीतील किंवा इमारती बाहेरच्या भितींवर मजकूर आढळून येईल त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असे स्पष्ट आदेशही नायक यांनी यावेळी दिले.