औरंगाबाद : वैद्यकीय क्षेत्र ही एक कला आहे. या क्षेत्रातील डॉक्टरांनी आपल्या क्षेत्रात कार्यरत असताना साहित्याशी जुळवून घेतल्यास मोठे काम होईल, असे प्रतिपादन ख्यातनाम कॅन्सरतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी यांनी केले.तापडिया नाट्यमंदिर येथे रविवारी आयोजित पहिल्या अखिल भारतीय वैद्यकीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. अडवाणी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. इकबाल मिन्ने, निमंत्रक माजी आ. एम.एम. शेख, स्वागताध्यक्ष डॉ. उन्मेष टाकळकर, अॅड. सतीश तळेकर, माजी खा. उत्तमसिंह पवार, साहित्यिक बाबा भांड, डॉ. विजय दहिफळे, डॉ. उज्ज्वला दहिफळे, नेहरू युवा कें द्राच्या समन्वयक अरुणा कोचुरे, विलास सोनवणे, डॉ. ए.बी. सोलपुरे, डॉ. अनुपमा पाथ्रीकर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र लाठी, आयोजक डॉ. अफसर शेख आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. अडवाणी म्हणाले की, आजपर्यंत मी वेगवेगळी साहित्य संमेलने पाहिली आहेत. वैद्यकीय साहित्य संमेलन प्रथमच होत आहे, त्याचा आनंद होत आहे. रुग्ण आजारावर उपचार घेण्यासोबतच अन्य समस्याही डॉक्टरांकडे मांडत असतो. डॉक्टर त्याला उपचारावेळी अन्य समस्यांबाबतीतही मार्गदर्शन करीत असतात. वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींना साहित्याच्या माध्यमातून समाजासाठी नवीन कार्य करण्याची संधी या निमित्ताने पुन्हा एकदा उपलब्ध झाली असल्याचे डॉ. अडवाणी यांनी यावेळी नमूद केले. क्रांतीचौकातून ग्रंथदिंडीसंमेलनाच्या उद्घाटनापूर्वी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. महानुभाव पंथातील ख्यातनाम महंत बाभूळगावकर शास्त्री यांच्या हस्ते क्रांतीचौक येथे ग्रंथदिंडीचे पूजन झाले.
वैद्यकीय क्षेत्राशी साहित्य जोडल्यास मोठे काम होईल
By admin | Updated: June 23, 2014 00:31 IST