शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

वैद्यकीय क्षेत्राशी साहित्य जोडल्यास मोठे काम होईल

By admin | Updated: June 23, 2014 00:31 IST

औरंगाबाद : डॉक्टरांनी आपल्या क्षेत्रात कार्यरत असताना साहित्याशी जुळवून घेतल्यास मोठे काम होईल, असे प्रतिपादन ख्यातनाम कॅन्सरतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी यांनी केले.

औरंगाबाद : वैद्यकीय क्षेत्र ही एक कला आहे. या क्षेत्रातील डॉक्टरांनी आपल्या क्षेत्रात कार्यरत असताना साहित्याशी जुळवून घेतल्यास मोठे काम होईल, असे प्रतिपादन ख्यातनाम कॅन्सरतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी यांनी केले.तापडिया नाट्यमंदिर येथे रविवारी आयोजित पहिल्या अखिल भारतीय वैद्यकीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. अडवाणी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. इकबाल मिन्ने, निमंत्रक माजी आ. एम.एम. शेख, स्वागताध्यक्ष डॉ. उन्मेष टाकळकर, अ‍ॅड. सतीश तळेकर, माजी खा. उत्तमसिंह पवार, साहित्यिक बाबा भांड, डॉ. विजय दहिफळे, डॉ. उज्ज्वला दहिफळे, नेहरू युवा कें द्राच्या समन्वयक अरुणा कोचुरे, विलास सोनवणे, डॉ. ए.बी. सोलपुरे, डॉ. अनुपमा पाथ्रीकर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र लाठी, आयोजक डॉ. अफसर शेख आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. अडवाणी म्हणाले की, आजपर्यंत मी वेगवेगळी साहित्य संमेलने पाहिली आहेत. वैद्यकीय साहित्य संमेलन प्रथमच होत आहे, त्याचा आनंद होत आहे. रुग्ण आजारावर उपचार घेण्यासोबतच अन्य समस्याही डॉक्टरांकडे मांडत असतो. डॉक्टर त्याला उपचारावेळी अन्य समस्यांबाबतीतही मार्गदर्शन करीत असतात. वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींना साहित्याच्या माध्यमातून समाजासाठी नवीन कार्य करण्याची संधी या निमित्ताने पुन्हा एकदा उपलब्ध झाली असल्याचे डॉ. अडवाणी यांनी यावेळी नमूद केले. क्रांतीचौकातून ग्रंथदिंडीसंमेलनाच्या उद्घाटनापूर्वी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. महानुभाव पंथातील ख्यातनाम महंत बाभूळगावकर शास्त्री यांच्या हस्ते क्रांतीचौक येथे ग्रंथदिंडीचे पूजन झाले.