शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: March 5, 2015 00:01 IST

उस्मानाबाद : औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोन व इतर एका ठिकाणी झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला़ हे अपघात बुधवारी सकाळी व सायंकाळच्या दरम्यान घडले असून,

उस्मानाबाद : औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोन व इतर एका ठिकाणी झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला़ हे अपघात बुधवारी सकाळी व सायंकाळच्या दरम्यान घडले असून, यामध्ये एका बारावीच्या परीक्षार्थी नवविवाहितेसह एक महिला, एका युवकाचा समावेश आहे़याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील नवविवाहिता प्रिया परमेश्वर सगट (वय-१९) या बारावीची परीक्षा देत आहेत़ प्रिया सगट यांचा बारावीच्या परीक्षेचा बुधवारी शेवटचा पेपर होता़ तो पेपर देण्यासाठी प्रिया सगट या दुचाकीवरून (क्रएम़एच़ डब्ल्यू/ ३९२८) वरून उस्मानाबादकडे येत होत्या़ त्यांची दुचाकी सोलापूर- औरंगाबाद महामार्गावरील कावलदारा वरील वळणावर आली असता उस्मानाबादहून तुळजापूरकडे जाणाऱ्या बसने जोराची धडक दिली़ या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रिया सगट यांचा जागीच मृत्यू झाला़ घटनेनंतर त्यांना जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते़ मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर मयत घोषित केले़ प्रिया यांचा मागील तीन महिन्यांपूर्वी खुदावाडी येथील परमेश्वर सगट यांच्याशी विवाह झाला होता़ अंगाची हळद निघण्यापूर्वीच नवविवाहितेचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे़ महाराष्ट्र राज्य बलुतेदार फेडरेशनचे चेअरमन सुभाष पाटोळे यांची ती मुलगी होत़ टाकळी येथे प्रिया सगट यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले़उस्मानाबाद येथील रहिवाशी असलेला शैलेश तानाजी गोरे हा युवक बुधवारी सायंकाळी दुचाकीवरून (क्ऱएम़एच़२५-ए़ए़ २३६७) उस्मानाबादकडे जात होता़ त्याची दुचाकी सोलापूर- औरंगाबाद महामार्गावरील तेरखेडा गावाजवळील खंडोबा मंदिराजवळ आली असता समोरून आलेल्या जीपने (क्ऱएम़ एच़ २५- बी़ ८५६) जोरची धडक दिली़ या अपघातात दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू झाला असून, मयताचे पार्थिव येरमाळा येथील रूग्णालयात नेण्यात आले होते़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता़ (प्रतिनिधी)बेंबळी येथील शशीकला प्रकाश राजमाने (वय-४६) या महिलेस अपघातात गंभीर जखमी झाल्याने बुधवारी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मयत घोषित केले़ याबाबत शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती़