शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

पीक कर्जासोबत अपघात विमा

By admin | Updated: June 13, 2016 00:45 IST

औरंगाबाद : खरीप हंगामाच्या तोंडावर सध्या विविध बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केले जात आहे. हे पीक कर्ज देत

औरंगाबाद : खरीप हंगामाच्या तोंडावर सध्या विविध बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केले जात आहे. हे पीक कर्ज देत असतानाच बँकेकडून संबंधित शेतकऱ्यांचा पन्नास हजार रुपयांचा अपघात विमाही उतरविला जात आहे, अशी माहिती लीड बँकेचे व्यवस्थापक गंगाधर वाकडे यांनी दिली. मराठवाड्यात सर्व प्रकारच्या बँकांना मिळून यंदा ९,८६३ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिलेले आहे. आतापर्यंत त्यापैकी २५ टक्के म्हणजे अडीच हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. गतवर्षी विभागात १३ लाख ४१ हजार शेतकऱ्यांना एकूण ७,११० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आलेले होते. सध्या विभागातील आठही जिल्ह्यांत कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. पण हे पीक कर्ज देत असतानाच बँकांकडून शेतकऱ्यांचा अपघात विमाही उतरविला जात आहे. याविषयी माहिती लीड बँकेचे व्यवस्थापक गंगाधर वाकडे यांनी दिली. ते म्हणाले, पीक कर्ज देताना शेतकऱ्यांचा पन्नास हजार रुपयांचा अपघात विमा उतरविला जातो आहे. त्यासाठी शेतकऱ्याचे १५ रुपये आणि बँकेचे १५ रुपये असा ३० रुपये खर्च येतो. याशिवाय पीक कर्ज देताना पीक विमाही उतरविला जात आहे. शेतात किती क्षेत्रात कोणत्या पिकाची लागवड करणार याविषयी शेतकऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तेवढी रक्कम काढून घेतली जात आहे. नंतर ही पीक विम्यासाठी संबंधित बँक किंवा एजन्सीकडे जमा केली जाते. गतवर्षी खूप मोठ्या प्रमाणावर असा पीक विमा उतरविण्यात आला. त्याचा परिणाम म्हणून यंदा मराठवाड्यासाठी पीक विम्याच्या भरपाईपोटी सुमारे ३ हजार कोटी रुपयांची रक्कम मंजूर झाली आहे. सध्या या रकमेचेही वाटप सुरू आहे. बँकांमधून ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे. तसेच पीक विम्याच्या भरपाई रकमेतून जुन्या कर्जाचा हप्ता कापून घेऊ नका अशा सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. खरिपासाठी सध्या राज्यभरात पीक कर्जाचे वाटप सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट ठरवून दिलेले आहे. या कर्ज वाटपात औरंगाबाद जिल्हा राज्यात आघाडीवर आहे, जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ५९ टक्के इतके पीक कर्ज वाटप सुरू झाले आहे, असेही वाकडे म्हणाले.