शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
2
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
3
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
4
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
5
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
6
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न
7
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
8
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
9
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
10
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
11
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
12
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
13
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
14
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
15
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
16
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
17
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
18
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
19
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
20
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!

पीक कर्जासोबत अपघात विमा

By admin | Updated: June 13, 2016 00:45 IST

औरंगाबाद : खरीप हंगामाच्या तोंडावर सध्या विविध बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केले जात आहे. हे पीक कर्ज देत

औरंगाबाद : खरीप हंगामाच्या तोंडावर सध्या विविध बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केले जात आहे. हे पीक कर्ज देत असतानाच बँकेकडून संबंधित शेतकऱ्यांचा पन्नास हजार रुपयांचा अपघात विमाही उतरविला जात आहे, अशी माहिती लीड बँकेचे व्यवस्थापक गंगाधर वाकडे यांनी दिली. मराठवाड्यात सर्व प्रकारच्या बँकांना मिळून यंदा ९,८६३ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिलेले आहे. आतापर्यंत त्यापैकी २५ टक्के म्हणजे अडीच हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. गतवर्षी विभागात १३ लाख ४१ हजार शेतकऱ्यांना एकूण ७,११० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आलेले होते. सध्या विभागातील आठही जिल्ह्यांत कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. पण हे पीक कर्ज देत असतानाच बँकांकडून शेतकऱ्यांचा अपघात विमाही उतरविला जात आहे. याविषयी माहिती लीड बँकेचे व्यवस्थापक गंगाधर वाकडे यांनी दिली. ते म्हणाले, पीक कर्ज देताना शेतकऱ्यांचा पन्नास हजार रुपयांचा अपघात विमा उतरविला जातो आहे. त्यासाठी शेतकऱ्याचे १५ रुपये आणि बँकेचे १५ रुपये असा ३० रुपये खर्च येतो. याशिवाय पीक कर्ज देताना पीक विमाही उतरविला जात आहे. शेतात किती क्षेत्रात कोणत्या पिकाची लागवड करणार याविषयी शेतकऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तेवढी रक्कम काढून घेतली जात आहे. नंतर ही पीक विम्यासाठी संबंधित बँक किंवा एजन्सीकडे जमा केली जाते. गतवर्षी खूप मोठ्या प्रमाणावर असा पीक विमा उतरविण्यात आला. त्याचा परिणाम म्हणून यंदा मराठवाड्यासाठी पीक विम्याच्या भरपाईपोटी सुमारे ३ हजार कोटी रुपयांची रक्कम मंजूर झाली आहे. सध्या या रकमेचेही वाटप सुरू आहे. बँकांमधून ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे. तसेच पीक विम्याच्या भरपाई रकमेतून जुन्या कर्जाचा हप्ता कापून घेऊ नका अशा सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. खरिपासाठी सध्या राज्यभरात पीक कर्जाचे वाटप सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट ठरवून दिलेले आहे. या कर्ज वाटपात औरंगाबाद जिल्हा राज्यात आघाडीवर आहे, जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ५९ टक्के इतके पीक कर्ज वाटप सुरू झाले आहे, असेही वाकडे म्हणाले.