शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
3
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
4
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
5
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
6
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
7
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
10
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
11
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
12
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
13
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
14
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
15
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
16
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
17
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
18
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
19
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट

चाऱ्याअभावी महिन्यात

By admin | Updated: November 23, 2014 00:24 IST

एम.जी. मोमीन , जळकोट जळकोट तालुक्यातील शिवाजीनगर तांडा गाव व परिसरात महिनाभरात १६ जनावरांचा चाऱ्याअभावी मृत्यू झाला असून, आणखी अनेक जनावरे मृत्युमुखी पडण्याच्या मार्गावर आहेत

एम.जी. मोमीन , जळकोट जळकोट तालुक्यातील शिवाजीनगर तांडा गाव व परिसरात महिनाभरात १६ जनावरांचा चाऱ्याअभावी मृत्यू झाला असून, आणखी अनेक जनावरे मृत्युमुखी पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शासनाने दखल घेऊन नुकसान झालेल्या पशुधनाची भरपाई द्यावी. तात्काळ चारा छावण्या उभाराव्यात, अशी मागणी पशुपालक तुळशीराम जाधव, विश्वास आडे, बाबूराव सोनकांबळे यांच्यासह बंजारा समाजबांधवांनी केली आहे. या घटनेमुळे जळकोट तालुक्यातील आसपासच्या २० ते २५ वाडी-तांड्यांवर पशुधनाचे असेच हाल होत असल्याने खळबळ उडाली आहे. शिवाजीनगर तांडा येथे एक हजार जनावरे असून, येथील चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असल्याने पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कडबा, गवत या चाऱ्याऐवजी झाडपाला तोडून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. याबरोबरच इतर ठिकाणचेही पशुधन चाऱ्याअभावी अशक्त व भाकड झाली आहेत. त्यामुळे ही जनावरेही दगावण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे तुळशीराम जाधव व विश्वनाथ आडे यांनी सांगितले. बंजारा समाजाचा मूळ व पारंपारिक व्यवसाय पशुधन जगविण्याचा आहे. शेतकऱ्यांकडील जनावरे आर्धालीच्या बोलीने राखली जातात. प्रत्येक कुटुंबाकडे ६० ते ७० जनावरे असतात. यावर्षी तालुक्यात ३५० मि.मी. पाऊस झाल्याने जनावरांसाठी चारा उपलब्ध नाही. दुर्मिळ असणाऱ्या कडब्याच्या पेंढीचा भावही २० रुपयांवर गेला आहे. शेतकऱ्यांना व बंजारा समाजाच्या बांधवांना महागामोलाचा कडबा विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे अनेक जनावरे भाकड होऊन दगावत आहेत. तर शेकडो जनावरे मातीमोल दराने विक्री केल्याने त्या पशुधनावर कत्तलखान्याकडे पाठविण्याची वेळ आली आहे. जळकोट तालुक्यात शिवाजीनगर तांडा, माळहिप्परगा, चितलंगी तांडा, फकरु तांडा, पोमा तांडा, चतुरा तांडा, अतनूर तांडा, अग्रवाल तांडा, भवानीनगर तांडा, मरसांगवी तांडा, जळकोट तांडा, गुत्ती तांडा, फटकडी तांडा, बालाजीवाडी तांडा आदी ठिकाणच्या पशुधनाचे चाऱ्याअभावी बेहाल होत आहेत. माळरानात चाऱ्याचा शोध घेत आहेत. तर पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ या पशुधनावर आली आहे. यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाल्याने पशुपालकांना आपले पशुधन सांभाळावे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.