शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

आठही तालुक्यात ६५ दिवसांत ८५ कामे

By admin | Updated: April 3, 2015 00:39 IST

जालना : शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गेल्या ६५ दिवसांमध्ये जिल्ह्यात विविध प्रकारची ८५ कामे पूर्ण झाली असून यासह अन्य सुरू असलेल्या २०२ कामांवर

जालना : शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गेल्या ६५ दिवसांमध्ये जिल्ह्यात विविध प्रकारची ८५ कामे पूर्ण झाली असून यासह अन्य सुरू असलेल्या २०२ कामांवर आतापर्यंत २.१४ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत.दुष्काळी परिस्थितीमुळे विविध प्रकल्पातील गाळ लोकसहभागातून काढण्यासह ग्रामीण भागात कंपार्टमेंट बंडिंग, शेततळे, सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, विहिर, बोअर पुनर्भरण या प्रकारची कामे अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. या अभियानासाठी २१२ गावे निवडण्यात आलेली आहेत. २६ जानेवारी रोजी या अभियानाचा जिल्ह्यात शुभारंभ झाला. ३० मार्चपर्यंत या अभियानाच्या माध्यमातून राबवावयाच्या २८७ कामांपैकी ८५ कामे पूर्ण झालेली आहेत. यामध्ये शासकीय मशिनरींसह गाळ काढणे ४ कामे, लोकसहभागातून गाळ काढणे २, कंपार्टमेंट बंडिंग २६, लूज बोल्डर स्ट्रक्चर २, शेततळे २०, सिमेंट नाला बांध ३, माती नाला बांध ९, विहिर पुनर्भरण ४, के.टी. वेअरमध्ये चर खोदणे १३ कामे पूर्ण झाली आहेत. तर २०२ कामे सुरू असून काही कामे सुरू करण्यात येत असल्याचे शासकीय सुत्रांनी सांगितले. या कामांमध्ये सिमेंट नाला बांध कामावर सर्वाधिक म्हणजे १ कोटी ३४ लाखांचा खर्च झालेला आहे. कंपार्टमेंट बंडिंगवर ५१.३० लाख, लोकसहभागातून गाळ काढण्याच्या कामावर १२ लाख, खोल सलग समतल चराच्या एका कामावर ७ लाख, माती नाला बांधावर २.४० लाख, शासकीय मशिनरींद्वारे गाळ काढण्याच्या कामावर ६ लाख रुपये एवढा खर्च झालेला आहे. कामांची गती आणखी वाढविण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील उद्योगपतींनी एकेक गाव दत्तक घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले आहे. शासनाने सुरू केलेल्या या अभियानास ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था यांनीही त्यात उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री लोणीकर यांनी केले आहे.या अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कामांवर जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांचे नियंत्रण असून या कामांसाठी जेसीबी, पोकलॅनची मदत कुणी केल्यास त्यासाठी लागणारे डिझेल इंधन शासनाच्या वतीने देण्यात येईल, अशी माहिती रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी डॉ. एन.आर. शेळके यांनी दिली. मजुरांनाही मागणीप्रमाणे मग्रारोहयोतून कामे उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.