शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

७१८ जण निवडणूक रिंगणात

By admin | Updated: February 8, 2017 00:20 IST

उस्मानाबाद : उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच मंगळवारअखेर तब्बल सव्वासहाशेवर उमेदवारांनी माघार घेतली आहे.

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेचे ५५ गट आणि पंचायत समितीच्या ११० गणासाठी होवू घातलेल्या निवडणुक आखाड्यातून उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच मंगळवारअखेर तब्बल सव्वासहाशेवर उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे सध्या निवडणूक रिंगणात ७१८ जण उरले आहेत. येवती, चोराखळी, कोंड गण तर पाथरूड गटातून छाननीदरम्यान अपील झाल्याने येथील उमेदवारांना १० फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. त्यामुळे निवडणूक आखाड्यातील उमेदवारांची संख्या कमीअधिक होवू शकते. चारही प्रमुख पक्षांनी स्वबळाचा नारा दिल्याने यावेळी बहुतांश ठिकाणी चौरंगी तर काही ठिकाणी तिरंगी व बहुरंगी लढती होत आहेत.सर्वाधिक गटसंख्या असलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील बारा गटाअंतर्गत १२५ उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये होते. परंतु, मंगळवारअखेर जवळपास पन्नास टक्के म्हणजेच ६३ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता निवडणुकीच्या आखाड्यात अवघे ६२ उमेदवार उरले आहेत. वडगाव गटातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंकर बोरकर यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे सेनेचे अधिकृत उमेदवार गुलाबराव जाधव यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. परंतु, अखेरच्या दिवशी बोरकर यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने सेना उमेदवाराला दिलासा मिळाला असला तरी या मतदार संघातील माळी समाज सेनेच्या पाठीशी राहतो की, अन्य पक्षाकडे झुकतो? यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी बहुरंगी लढत होत आहे. जवळपास सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, तेर गटाकडेही अनेकांचे लक्ष लागून होते. येथून अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैैकी ७ जणांनी माघार घेतल्याने येथे चौरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केलेले शिवाजी नाईकवाडी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. एवढेच नाही तर शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरलेले महादेव खटावकरही यांनीही आखाड्यातून माघार घेतली. त्यामुळे अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेले सतीश सोमाणी हे आता शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटलेल्या सांजा गटातही शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली होती. अधिकृत उमेदवार कैैलास पाटील यांच्याविरूद्ध श्रीराम सूर्यवंशी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. अखेरच्या क्षणी सूर्यवंशी यांची मनधरणी करण्यात सेना नेत्यांना यश आल्याने सूर्यवंशी यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे या ठिकाणी कैैलास पाटील यांचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या १४ पैैकी सात जणांनी माघार घेतली असली तरी ७ उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत. त्यामुळे येथेही काँटे की टक्कर पहावयास मिळणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी आरक्षित बेंबळी गटाच्या निवडणूक रिंगणामध्ये ‘एमआयएम’ने उडी घेतली होती. त्यामुळे काँग्रेसह राष्ट्रवादीला फटका बसू शकतो, असे बोलले जात होते. असे असतानाच मंगळवारी ‘एमआयएम’च्या अधिकृत उमेदवार पठाण जैैबूनिसा नवाबखाँ यांनी माघार घेतली. त्यामुळे काँग्रेससह राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी मुस्लीम मतदार कुठल्या पक्षाकडे वळतात? हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकूणच उपरोक्त तीन-चार गट वगळता अन्य ठिकाणी प्रमुख पक्षामध्ये फारशी बंडखोरी झालेली नाही. त्यामुळे बहुतांश ठिकाणी चौैरंगी व पंचरंगी लढती होत आहेत.(प्रतिनिधी)उस्मानाबाद : जिल्हा परिषदेचे ५५ गट आणि पंचायत समितीच्या ११० गणासाठी होवू घातलेल्या निवडणुक आखाड्यातून उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच मंगळवारअखेर तब्बल सव्वासहाशेवर उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे सध्या निवडणूक रिंगणात ७१८ जण उरले आहेत. येवती, चोराखळी, कोंड गण तर पाथरूड गटातून छाननीदरम्यान अपील झाल्याने येथील उमेदवारांना १० फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. त्यामुळे निवडणूक आखाड्यातील उमेदवारांची संख्या कमीअधिक होवू शकते. चारही प्रमुख पक्षांनी स्वबळाचा नारा दिल्याने यावेळी बहुतांश ठिकाणी चौरंगी तर काही ठिकाणी तिरंगी व बहुरंगी लढती होत आहेत.सर्वाधिक गटसंख्या असलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील बारा गटाअंतर्गत १२५ उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये होते. परंतु, मंगळवारअखेर जवळपास पन्नास टक्के म्हणजेच ६३ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता निवडणुकीच्या आखाड्यात अवघे ६२ उमेदवार उरले आहेत. वडगाव गटातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंकर बोरकर यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे सेनेचे अधिकृत उमेदवार गुलाबराव जाधव यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. परंतु, अखेरच्या दिवशी बोरकर यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने सेना उमेदवाराला दिलासा मिळाला असला तरी या मतदार संघातील माळी समाज सेनेच्या पाठीशी राहतो की, अन्य पक्षाकडे झुकतो? यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी बहुरंगी लढत होत आहे. जवळपास सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, तेर गटाकडेही अनेकांचे लक्ष लागून होते. येथून अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैैकी ७ जणांनी माघार घेतल्याने येथे चौरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केलेले शिवाजी नाईकवाडी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. एवढेच नाही तर शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरलेले महादेव खटावकरही यांनीही आखाड्यातून माघार घेतली. त्यामुळे अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेले सतीश सोमाणी हे आता शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटलेल्या सांजा गटातही शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली होती. अधिकृत उमेदवार कैैलास पाटील यांच्याविरूद्ध श्रीराम सूर्यवंशी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. अखेरच्या क्षणी सूर्यवंशी यांची मनधरणी करण्यात सेना नेत्यांना यश आल्याने सूर्यवंशी यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे या ठिकाणी कैैलास पाटील यांचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या १४ पैैकी सात जणांनी माघार घेतली असली तरी ७ उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत. त्यामुळे येथेही काँटे की टक्कर पहावयास मिळणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी आरक्षित बेंबळी गटाच्या निवडणूक रिंगणामध्ये ‘एमआयएम’ने उडी घेतली होती. त्यामुळे काँग्रेसह राष्ट्रवादीला फटका बसू शकतो, असे बोलले जात होते. असे असतानाच मंगळवारी ‘एमआयएम’च्या अधिकृत उमेदवार पठाण जैैबूनिसा नवाबखाँ यांनी माघार घेतली. त्यामुळे काँग्रेससह राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी मुस्लीम मतदार कुठल्या पक्षाकडे वळतात? हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकूणच उपरोक्त तीन-चार गट वगळता अन्य ठिकाणी प्रमुख पक्षामध्ये फारशी बंडखोरी झालेली नाही. त्यामुळे बहुतांश ठिकाणी चौैरंगी व पंचरंगी लढती होत आहेत.(प्रतिनिधी)