शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
4
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
5
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
6
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
7
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
8
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
9
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
10
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
11
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
12
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
13
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
14
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
15
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
16
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
17
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
18
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
19
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
20
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  

७१८ जण निवडणूक रिंगणात

By admin | Updated: February 8, 2017 00:20 IST

उस्मानाबाद : उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच मंगळवारअखेर तब्बल सव्वासहाशेवर उमेदवारांनी माघार घेतली आहे.

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेचे ५५ गट आणि पंचायत समितीच्या ११० गणासाठी होवू घातलेल्या निवडणुक आखाड्यातून उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच मंगळवारअखेर तब्बल सव्वासहाशेवर उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे सध्या निवडणूक रिंगणात ७१८ जण उरले आहेत. येवती, चोराखळी, कोंड गण तर पाथरूड गटातून छाननीदरम्यान अपील झाल्याने येथील उमेदवारांना १० फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. त्यामुळे निवडणूक आखाड्यातील उमेदवारांची संख्या कमीअधिक होवू शकते. चारही प्रमुख पक्षांनी स्वबळाचा नारा दिल्याने यावेळी बहुतांश ठिकाणी चौरंगी तर काही ठिकाणी तिरंगी व बहुरंगी लढती होत आहेत.सर्वाधिक गटसंख्या असलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील बारा गटाअंतर्गत १२५ उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये होते. परंतु, मंगळवारअखेर जवळपास पन्नास टक्के म्हणजेच ६३ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता निवडणुकीच्या आखाड्यात अवघे ६२ उमेदवार उरले आहेत. वडगाव गटातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंकर बोरकर यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे सेनेचे अधिकृत उमेदवार गुलाबराव जाधव यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. परंतु, अखेरच्या दिवशी बोरकर यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने सेना उमेदवाराला दिलासा मिळाला असला तरी या मतदार संघातील माळी समाज सेनेच्या पाठीशी राहतो की, अन्य पक्षाकडे झुकतो? यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी बहुरंगी लढत होत आहे. जवळपास सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, तेर गटाकडेही अनेकांचे लक्ष लागून होते. येथून अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैैकी ७ जणांनी माघार घेतल्याने येथे चौरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केलेले शिवाजी नाईकवाडी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. एवढेच नाही तर शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरलेले महादेव खटावकरही यांनीही आखाड्यातून माघार घेतली. त्यामुळे अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेले सतीश सोमाणी हे आता शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटलेल्या सांजा गटातही शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली होती. अधिकृत उमेदवार कैैलास पाटील यांच्याविरूद्ध श्रीराम सूर्यवंशी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. अखेरच्या क्षणी सूर्यवंशी यांची मनधरणी करण्यात सेना नेत्यांना यश आल्याने सूर्यवंशी यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे या ठिकाणी कैैलास पाटील यांचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या १४ पैैकी सात जणांनी माघार घेतली असली तरी ७ उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत. त्यामुळे येथेही काँटे की टक्कर पहावयास मिळणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी आरक्षित बेंबळी गटाच्या निवडणूक रिंगणामध्ये ‘एमआयएम’ने उडी घेतली होती. त्यामुळे काँग्रेसह राष्ट्रवादीला फटका बसू शकतो, असे बोलले जात होते. असे असतानाच मंगळवारी ‘एमआयएम’च्या अधिकृत उमेदवार पठाण जैैबूनिसा नवाबखाँ यांनी माघार घेतली. त्यामुळे काँग्रेससह राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी मुस्लीम मतदार कुठल्या पक्षाकडे वळतात? हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकूणच उपरोक्त तीन-चार गट वगळता अन्य ठिकाणी प्रमुख पक्षामध्ये फारशी बंडखोरी झालेली नाही. त्यामुळे बहुतांश ठिकाणी चौैरंगी व पंचरंगी लढती होत आहेत.(प्रतिनिधी)उस्मानाबाद : जिल्हा परिषदेचे ५५ गट आणि पंचायत समितीच्या ११० गणासाठी होवू घातलेल्या निवडणुक आखाड्यातून उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच मंगळवारअखेर तब्बल सव्वासहाशेवर उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे सध्या निवडणूक रिंगणात ७१८ जण उरले आहेत. येवती, चोराखळी, कोंड गण तर पाथरूड गटातून छाननीदरम्यान अपील झाल्याने येथील उमेदवारांना १० फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. त्यामुळे निवडणूक आखाड्यातील उमेदवारांची संख्या कमीअधिक होवू शकते. चारही प्रमुख पक्षांनी स्वबळाचा नारा दिल्याने यावेळी बहुतांश ठिकाणी चौरंगी तर काही ठिकाणी तिरंगी व बहुरंगी लढती होत आहेत.सर्वाधिक गटसंख्या असलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील बारा गटाअंतर्गत १२५ उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये होते. परंतु, मंगळवारअखेर जवळपास पन्नास टक्के म्हणजेच ६३ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता निवडणुकीच्या आखाड्यात अवघे ६२ उमेदवार उरले आहेत. वडगाव गटातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंकर बोरकर यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे सेनेचे अधिकृत उमेदवार गुलाबराव जाधव यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. परंतु, अखेरच्या दिवशी बोरकर यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने सेना उमेदवाराला दिलासा मिळाला असला तरी या मतदार संघातील माळी समाज सेनेच्या पाठीशी राहतो की, अन्य पक्षाकडे झुकतो? यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी बहुरंगी लढत होत आहे. जवळपास सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, तेर गटाकडेही अनेकांचे लक्ष लागून होते. येथून अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैैकी ७ जणांनी माघार घेतल्याने येथे चौरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केलेले शिवाजी नाईकवाडी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. एवढेच नाही तर शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरलेले महादेव खटावकरही यांनीही आखाड्यातून माघार घेतली. त्यामुळे अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेले सतीश सोमाणी हे आता शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटलेल्या सांजा गटातही शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली होती. अधिकृत उमेदवार कैैलास पाटील यांच्याविरूद्ध श्रीराम सूर्यवंशी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. अखेरच्या क्षणी सूर्यवंशी यांची मनधरणी करण्यात सेना नेत्यांना यश आल्याने सूर्यवंशी यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे या ठिकाणी कैैलास पाटील यांचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या १४ पैैकी सात जणांनी माघार घेतली असली तरी ७ उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत. त्यामुळे येथेही काँटे की टक्कर पहावयास मिळणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी आरक्षित बेंबळी गटाच्या निवडणूक रिंगणामध्ये ‘एमआयएम’ने उडी घेतली होती. त्यामुळे काँग्रेसह राष्ट्रवादीला फटका बसू शकतो, असे बोलले जात होते. असे असतानाच मंगळवारी ‘एमआयएम’च्या अधिकृत उमेदवार पठाण जैैबूनिसा नवाबखाँ यांनी माघार घेतली. त्यामुळे काँग्रेससह राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी मुस्लीम मतदार कुठल्या पक्षाकडे वळतात? हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकूणच उपरोक्त तीन-चार गट वगळता अन्य ठिकाणी प्रमुख पक्षामध्ये फारशी बंडखोरी झालेली नाही. त्यामुळे बहुतांश ठिकाणी चौैरंगी व पंचरंगी लढती होत आहेत.(प्रतिनिधी)