शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

७ गुरुजींचे मोबाईल जप्त

By admin | Updated: March 15, 2015 00:39 IST

भालचंद्र येडवे ,लातूर मुंबई येथील एका केंद्रावर ‘बुक किपींग अ‍ॅण्ड अकाऊंटिंग’ची प्रश्नपत्रिका व्हॉटस् अ‍ॅपद्वारे फुटून संपूर्ण राज्यभर फिरली. ही घटना ताजी असतानाच

भालचंद्र येडवे ,लातूर मुंबई येथील एका केंद्रावर ‘बुक किपींग अ‍ॅण्ड अकाऊंटिंग’ची प्रश्नपत्रिका व्हॉटस् अ‍ॅपद्वारे फुटून संपूर्ण राज्यभर फिरली. ही घटना ताजी असतानाच लातूर बोर्डाच्या भरारी पथकाने उस्मानाबादेतील जनता विद्यालयाच्या केंद्रावरील ७ गुरुजींचे मोबाईल जप्त केले आहेत. या सर्वांवर महाराष्ट्र गैरमार्ग प्रतिबंध कायद्याअंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. लातूर विभागीय मंडळाअंतर्गत असलेल्या नांदेड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांत सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेत नवनवीन किस्से समोर येत आहेत. मंडळाच्या विभागीय सचिव श्रीमती शोभा येलूरकर यांच्या पथकाने शनिवारी उस्मानाबाद येथील जनता विद्यालयाच्या केंद्रावर भेट दिली. या केंद्रावर जवळपास साडेतीनशे विद्यार्थी दहावी विज्ञान विषयाची परीक्षा देत होते. सहसचिव येलूरकर यांनी एका परीक्षा हॉलला भेट दिली असता तेथील पर्यवेक्षक गडबडून गेले. येलूरकर यांना शंका आल्यामुळे त्यांनी केंद्रावरील सर्व पर्यवेक्षकांचे मोबाईल जमा करण्याचे फर्मान सोडले. या केंद्रावरील एकूण १३ पर्यवेक्षकांपैकी तब्बल ७ जणांकडे मोबाईल आढळले. पैकी तीन मोबाईलमध्ये अत्याधुनिक सुविधा (अ‍ॅन्ड्रॉईड) असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने या सर्व प्रकाराचा पंचनामा करून ते सर्व मोबाईल स्वीच आॅफ केले. तद्नंतर त्या-त्या मोबाईलवर संबंधितांची नावे टाकून ते मोबाईल सील करून जप्त केले. तद्नंतर मुख्याध्यापकांचा अहवाल घेऊन हे सर्व मोबाईल थेट मंडळ कार्यालयात जमा करण्यात आले. शासनाच्या आदेशानुसार शाळेत अथवा परीक्षा केंद्रावर मोबाईल वापरणे यावर बंदी आहे. या संदर्भातची सूचना संबंधित केंद्र प्रमुखांनी सर्वांना दिली होती. तरीही या केंद्रावर एवढ्या मोठ्या प्रमाणात मोबाईलचा का वापर झाला, अशी शंका पथकासमोर उपस्थित होत आहे. या संदर्भात विभागीय सचिव सचिन जगताप यांच्याशी संपर्क साधला असता हा प्रकार अतिशय गंभीर असून, संबंधित केंद्र प्रमुख व पर्यवेक्षकांना नोटीस देऊ. नव्हे, महाराष्ट्र गैरमार्ग प्रतिबंध कायदा १९८२ अंतर्गत कारवाई करण्याचा इशाराही सचिव जगताप यांनी दिला आहे. मोबाईल जप्तीच्या या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. परीक्षा केंद्रावर मोबाईल वापरल्याबाबत लातूर विभागीय मंडळाने गंभीर दखल घेतली असून, संबंधितांना नोटीस बजावून खुलासा तर घेण्यात येईलच. शिवाय, कायद्याच्या तरतुदीनुसार संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे मंडळाचे विभागीय सचिव सचिन जगताप म्हणाले. संबंधित पर्यवेक्षकांनी मोबाईल परत देण्याबाबत विनवणी केली असता सहाय्यक सचिव शोभा येलूरकर यांनी त्यांना खुलासे देणे अनिवार्य केले आहे. खुलाशानंतरच मोबाईल परत देण्याबाबतचा निर्णय होईल.