शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

जिल्ह्यात ६९.३३ टक्के मतदान

By admin | Updated: October 17, 2014 00:26 IST

जालना : जिल्ह्यात पाचही मतदारसंघात एकूण सरासरी ६९.३३ टक्के मतदान झाले. गुरूवारी प्रशासनाने मतदानाबाबतची अंतिम आकडेवारी जाहीर केली.

जालना : जिल्ह्यात पाचही मतदारसंघात एकूण सरासरी ६९.३३ टक्के मतदान झाले. गुरूवारी प्रशासनाने मतदानाबाबतची अंतिम आकडेवारी जाहीर केली. जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरापर्यंत मतदारसंघाच्या मुख्यालयी स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम यंत्रे दाखल करण्याचे काम सुरू होते. जिल्ह्यात पाचही मतदारसंघांमध्ये उत्साहीपूर्ण वातावरणात मतदान झाले. यात प्रामुख्याने नवमतदारांची संख्या वाढलेली असल्याने त्यांनी उत्स्फुर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा प्रशासनासह विविध सामाजिक, सेवाभावी संघटनांच्या वतीने जनजागरण मोहिम राबविल्याचा सकारात्मक परिणाम जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यावर झाल्याचे दिसून येते. जिल्ह्यात सर्वाधिक मतदानाची नोंद घनसावंगी मतदारसंघात झाली. तेथे ७५.३५ टक्के मतदान झाले. त्यापाठोपाठ भोकरदन ७४.०७, परतूर ७०.०३, बदनापूर ६७.६९ तर सर्वात कमी जालना मतदारसंघात ६०.१० टक्के मतदानाची नोंद झाली. प्रत्येक मतदारसंघाच्या मुख्यालयी ईव्हीएम मशीन बुधवारी रात्री उशिरापर्यंत दाखल करण्यात आल्या. जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी जालना येथील आयटीआय या मतमोजणी केंद्रास भेट देऊन तेथील पाहणी केली. सर्व ईव्हीएमचे सिलिंग करण्यात येऊन त्या स्ट्राँगरूम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली. १९ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपासून जिल्ह्यातील पाचही मतमोजणी केंद्रांवर मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. निकाल दुपारी २ वाजेपर्यंत हाती येतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)