शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याच प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
3
Kanwar Yatra Accident: गंगेचं पाणी घेऊन निघाले अन् मृत्यूने गाठले; भाविकांच्या जत्थ्यात घुसली कार; ४ जागीच ठार
4
बायकोच्या नावावर घर? फक्त प्रेम नाही, आता 'लाखोंचा फायदा' होणार! स्टँप ड्युटीपासून टॅक्सपर्यंत मोठी बचत फिक्स
5
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
6
"आपणही विश्वास तोडला..."; रॅपिडो राइड दरम्यान महिलेनं स्वतःच रेकॉर्ड केला अपळा अॅक्सीडेंट - बघघा VIDEO
7
हॉलिवूडवर पसरली शोककळा, लोकप्रिय गायकाचं निधन; रणवीर सिंहनेही व्यक्त केली हळहळ
8
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
9
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
10
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
11
घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र सोपविले...
12
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर किती GST आकारणार? सरकारने संसदेत दिले उत्तर
13
गुन्हेगारांचे चेहरे स्केचमधून जिवंत करणारे आर्टिस्ट बनले ‘महाराज’, धमक्या, कुटुंबाच्या काळजीमुळे सोडली मुंबई 
14
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
15
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी
16
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का
17
टॅरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
18
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
19
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
20
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल

६५ गावांच्या घशाला कोरड

By admin | Updated: January 30, 2015 00:49 IST

बालाजी आडसूळ , कळंब प्रतीवर्षी उन्हाळ्याच्या कालावधीत पाणीटंचाईचा प्रश्न तालुक्यातील ९१ पैकी ६५ गावांमध्ये अधिक प्रमाणात निर्माण होतो़ या गावातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी

बालाजी आडसूळ , कळंबप्रतीवर्षी उन्हाळ्याच्या कालावधीत पाणीटंचाईचा प्रश्न तालुक्यातील ९१ पैकी ६५ गावांमध्ये अधिक प्रमाणात निर्माण होतो़ या गावातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जलस्वराज्य, भारत निर्माणसह इतर विविध योजना राबविण्यात आल्या आहेत़ या योजनांवर कोट्यवधी रूपयांचा खर्च करूनही अनेक योजना कुचकामी ठरल्याने पाणीटंचाई कायम असल्याचे चित्र आहे़गत काही वर्षापासून तालुका व परिसरात अल्पप्रमाणात पाऊस होत आहे़ परिणामी नोव्हेंबर, डिसेंबर पासून काही गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे़ तालुक्यातील ६५ गावांमध्ये ही समस्या मोठी आहे़ प्रतीवर्षी विविध योजनांचे आराखडे तयार होतात, योजना राबविल्या जातात़ शिवाय अधिग्रहणे, टँकरवर होणारा खर्च हा वेगळाच आहे़ पाणीटंचाई सोडविण्यासाठी या गावांमध्ये जलस्वराज्य, जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणीपुरवठा, पंचायत समितीमार्फत विविध योजना राबविण्यात आल्या आहेत़ किमान गरजा कार्यक्रम, तात्पुरत्या नळ योजना, नळयोजना विशेष दुरूस्ती, अधिग्रहण, टँकर, पुरक पाणीपुरवठा योजनाही राबविण्यात आल्या आहेत़ यानंतर आता तालुक्यात राष्ट्रीय पेयजलचे वारे जोमात वाहत आहे़ यात २२ गावात जलस्वराज्य, ३३ गावात भारत निर्माण तर लोहटापूर्वसह सहा गावात कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत़ यावर लाखो, कोट्यवधी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे़ मात्र, पाईपलाईन, तांत्रिक दोष, जलस्त्रोत अटण्यासह इतर कारणांनी यातील अनेक योजना कुचकामी ठरल्या आहेत़ त्यामुळे कोट्यवधी रूपये खर्च केल्यानंतरही या गावांकडून अधिग्रहण, टँकरसाठी प्रस्ताव पाठविण्यात येत आहेत.लोहटा पूर्व येथे जीवन प्राधिकरण मार्फत सहा कोटीपेक्षा अधिकची रक्कम खर्च करून लोहटा पूर्व, लोहटा पश्चिम, जवळा खुर्द, करंजकल्ला, एकूरका या गावांसाठी पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यात आले़ योजना पूर्णत्वास येवून वर्षाचा कालावधी लोटला तरी अद्याप या गावांना तहान भागलेली नाही़ सध्या ही योजना मृतावस्थेत असून, पाईपलाईनलाही गंज चढला आहे़ त्यामुळे कोट्यवधी रूपयांचा खर्च कशासाठी ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे़बाभळगाव, पिंप्री (शि़), कोथळा, देवधनोरा, वाघोली, भोसा, कन्हेरवाडी, भाटशिरपुरा, गौर, नागझरवाडी, मस्सा, देवळाली, शिंगोली, बरमाचीवाडी, बांगरवाडी, उपळाई, वडगाव (शि़), लासरा, ताडगाव, रायगव्हाण, खोंदला, शेळका धानोरा, कोथळवाडी, रांजणी, घारगाव, जायफळ, बहूला, येरमाळा, बारातेवाडी, बोर्डा, माळकरंजा, सातेफळ, शिराढोण या गावात भारत निर्माण योजना राबविण्यात आली आहे़