शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

सहा महिन्यांत ६४ हजार मतदार वाढले

By admin | Updated: September 13, 2014 23:53 IST

नांदेड : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतर ६४ हजार मतदार वाढले असून १७ सप्टेंबरपर्यंत मतदरांना नावनोंदणी करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिली.

नांदेड : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतर ६४ हजार मतदार वाढले असून १७ सप्टेंबरपर्यंत मतदरांना नावनोंदणी करता येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतर शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रपरिषद घेण्यात आली. विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. निवडणुकीसंदर्भातील अधिसूचना २० सप्टेंबर रोजी निघणार असून त्याच दिवसांपासून उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहेत. २७ सप्टेंबरपर्यत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. जिल्ह्यात जवळपास २५ लाख मतदार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करतील. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापासून दहा दिवस अगोदरपर्यंत मतदारांना नावनोंदणी करण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यानुसार १७ सप्टेंबरपर्यंत मतदार नावनोंदणी करु शकतील. लोकसभा निवडणुकीतील मतदारांची संख्या लक्षात घेतली असता आतापर्यंत ६४ हजार मतदार वाढले आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकीसाठी असलेल्या मतदारयादीतील एकही नाव वगळण्यात आले नाही.विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात उत्तर प्रदेशातून आलेल्या मतदानयंत्र वापरले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सांगितले. नवरात्र महोत्सव मंडळांना सूचना निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत नवरात्र महोत्सव आणि बकरी ईद हे महत्वाचे सण येत आहेत. या महोत्सव कालावधीत मंडळाकडून राजकीय प्रचार होऊ नये यासाठी काळजी घ्यावी़चोख पोलिस बंदोबस्तसुरक्षा व्यवस्थेसंदर्भात अप्पर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांनी माहिती दिली. राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून बाहेर जिल्ह्यातून फौजफाटा मिळण्याची शक्यता कमी असल्याने बंदोबस्तासाठी होमगार्ड, स्पेशल पोलिस आॅफिसर, सेवानिवृत्त अधिकारी, एनसीसीचे विद्यार्थी, वनविभागातील अधिकारी यांची मदत घेण्यात येईल. त्यासह राज्य राखीव पोलिस दल आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या प्रत्येकी तीन तुकड्या बंदोबस्तासाठी मिळणार आहेत. आंतर जिल्हा, आंतरराज्य सीमेवर फिक्स पाँईट निश्चित करण्यात आले असून यासाठी पोलिस, महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह व्हिडीओग्राफर उपस्थित राहणार आहेत. नऊ विधानसभा मतदारसंघात प्रभारी अधिकारी म्हणून पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात आचारसंहिता भंगाचे ४१ गुन्हे दाखल झाले होते. विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल होऊ नये, यासाठी राजकीय पक्षांनी आवश्यक ती परवानगी घ्यावी. यासाठी प्रशासनाकडून एक खिडकी योजनेची अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही चिखले म्हणाले.मतदारांकडे निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असले तरी मतदानयादीत नाव नसल्यास मतदारांना मतदान करता येणार नाही. त्यासाठी मतदारांनी आपले नाव मतदारयादीत आहे की नाही, याची खात्री करुन घ्यावी. मतदारांसाठी ०२४६२-२४८२४८ या क्रमांकावर हेल्पलाईन सुविधा उपलब्ध राहील. लोकसभा निवडणुकीप्रमाणे प्रशासन मतदारांना व्होटरस्लिप देणार आहे. मतदानापूर्वी आठ दिवस अगोदर या स्लिप मतदारांपर्यत पोहोचतील. तक्रारीसंदर्भात ०२४६२-२४७२४७ या क्रमांकावर संपर्क साधावा.