शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

५९७ सहकारी संस्था काढल्या अवसायनात

By admin | Updated: November 25, 2014 00:57 IST

दत्ता थोरे , लातूर कोणतीही माहिती अपडेट न करणाऱ्या व ‘खायला काळ आणि भुईला भार ‘असलेल्या बंद पडलेल्या जिल्ह्यातील ५९७ सहकारी संस्था अवसायनात काढण्याचा निर्णय घेऊन

दत्ता थोरे , लातूरकोणतीही माहिती अपडेट न करणाऱ्या व ‘खायला काळ आणि भुईला भार ‘असलेल्या बंद पडलेल्या जिल्ह्यातील ५९७ सहकारी संस्था अवसायनात काढण्याचा निर्णय घेऊन त्यांना तशा नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. यात जिल्ह्यातील ४४१ सहकारी दूध संस्था, ७९ सहकारी शेळीमेंढीपालन संस्था, ३२ सहकारी कुक्कूटपालन संस्था, २२ सहकारी वराहपालन संस्था तर १३ मत्स्यपालन सहकारी संस्थांचा समावेश आहे. जिल्हा दुग्ध शाळा विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने राज्य शासनाच्या आदेशानुसार सर्व सहकारी संस्थांना आपल्याकडील माहिती आॅनलाईनवर टाकण्याचे आदेश देण्यात आले होते. सभासद संख्या, सभासद मंडळ, प्रत्येक वर्षातील ताळेबंद आदी माहितीचा समावेश होता. परंतु त्यानंतर अनेक संस्था ही माहिती अपलोड करीत नव्हत्या. याबाबत तपशीलाने जाऊन पाहणी केली असता यातील ९० टक्के संस्था या बंद पडलेल्या आढळून आल्या. त्यामुळे सहाय्यक निबंधक यांनी अशा साऱ्या संस्था अवसायनात काढण्याचा निर्णय घेतला. याबाबत ५९७ सहकारी संस्थांना तशा नोटिसा देऊन आपल्या संस्था जिल्हा दुग्ध शाळा विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने अवसायनात काढण्यात आल्याचे कळविले आहे. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी आदेश देऊनही अद्याप एकही अपिल सहाय्यक निबंधकांकडे दाखल करण्यात आले नाही. यातील बऱ्याच संस्था या खायला काळ आणि भुईला भार अशा अवस्थेत होत्या. २०-२० वर्षांपासून बंद असलेल्या या संस्थांचे ना आॅडीट होते ना नुतनीकरण. कागदावरच निवडणुका होऊन कागदावरच संचालक मंडळाची रांगोळी काढणाऱ्या या साऱ्या सहकारी संस्थांना सहाय्यक निबंधकांनी चांगलाच झटका दिला आहे. राज्य शासनाने ३१/१२/२०१४ च्या आत साऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. परंतु या सहकारी संस्थांची कसलीच माहिती जिल्हा दुग्ध शाळा विकास कार्यालयाकडे उपलब्ध नव्हती. त्यामुळे मतदारयाद्या कशा प्रसिध्द करायच्या ? प्रक्रिया कशी घोषित करायची आणि राबवायची हा मोठा प्रश्न होता. ४निवडणूक आयोगाच्या निकषानुसार गुप्त मतदान पध्दतीने निवडल्या जाणाऱ्या ‘क’ वर्गातील एकूण ९९० सहकारी संस्थांपैकी ५९७ संस्था अवसायनात निघाल्याने आता ३९३ संस्था उरल्या आहेत. या सर्व संस्थांच्या निवडणुका मागच्या दोन-तीन वर्षांपूर्वीच झाल्याने त्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे. त्यामुळे या कोणत्याही सहकारी संस्थांची आता निवडणूक होणार नाही. जिल्ह्यातील ९९० पैकी ५९७ सहकारी संस्थांना नोटिसा दिल्या आहेत. जर यापैकी कोणतीही संस्था चालू असेल तर त्यांनी तातडीने सहाय्यक निबंधकांकडे अपिल करणे गरजेचे आहे. परंतु आम्ही अवसायनात काढलेल्या संस्था गेल्या २० ते २५ वर्षांपासून बंद असलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांना अवसायनात काढण्याशिवाय कोणताच पर्याय समोर नव्हता, अशी माहिती सहाय्यक निबंधक (दुग्ध) अशोक कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.