शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

जिल्ह्यात ५२४ शाळांना प्रवेश सक्ती!

By admin | Updated: February 17, 2015 00:43 IST

औरंगाबाद : बालशिक्षण हक्क कायद्यानुसार यंदा औरंगाबाद जिल्ह्यातील ५२४ शाळांना सक्ती करण्यात आली आहे. २५ टक्के जागा विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवाव्यात, असा दंडक करण्यात आला आहे.

औरंगाबाद : बालशिक्षण हक्क कायद्यानुसार यंदा औरंगाबाद जिल्ह्यातील ५२४ शाळांना सक्ती करण्यात आली आहे. २५ टक्के जागा विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवाव्यात, असा दंडक करण्यात आला आहे. या कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही आज देण्यात आला.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे संत एकनाथ रंग मंदिरात जिल्ह्यातील मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालशिक्षण हक्क कायद्यासंदर्भात सविस्तर आणि आॅनलाईन प्रक्रियेची माहिती देण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात ५२४ शाळा आरटीई अ‍ॅक्टअंतर्गत येतात. यामध्ये विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आणि सेल्फ फायनान्स अंतर्गत सुरू केलेल्या शाळांचा समावेश आहे.१६ ते २३ फेब्रुवारीपर्यंत शाळांनी आपली नोंदणी आॅनलाईन करावी. अल्पसंख्याक संस्थांना या कायद्यात सूट देण्यात आली असली तरी त्यांना अल्पसंख्याक संस्था असल्याचे प्रमाणपत्र आॅनलाईन अपलोड करावे लागणार आहे. २५ फेब्रुवारी ते ७ मार्चपर्यंत पालकांनी प्रवेश मिळविण्यासाठी आॅनलाईन अर्ज करावयाचा आहे. पालकांना आपल्या पाल्याचे जन्म प्रमाणपत्र, स्वत:चे उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र आदी तपशील अपलोड करावा लागेल. एका शाळेत शंभर प्रवेश क्षमता असेल, तर तेथे २५ टक्के विद्यार्थ्यांना आरटीईमध्ये प्रवेश द्यावा लागणार आहे. २५ टक्क्यांपेक्षा जास्त अर्ज आले असल्यास प्रवेश सोडत पद्धतीने द्यावी, अशीही तरतूद कायद्यात करण्यात आली असल्याची माहिती आज कार्यशाळेत शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली.मागील वर्षीही ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. अनेक शाळांनी प्रवेश दिलाच नाही असा आरोप पालकांनी केला होता. त्यामुळे यंदा शासनाने प्रवेश प्रक्रियाच आॅनलाईन केली आहे. उपशिक्षणाधिकारी एम.के. देशमुख, शिक्षण विस्तार अधिकारी आर. व्ही. ठाकूर यांनीही कार्यशाळेत उपस्थित विविध प्रश्नांना उत्तरे दिली.