शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वसाहतीत ४४ कारखाने बंद

By admin | Updated: November 16, 2014 23:37 IST

केवल चौधरी, जालना येथील स्टील औद्योगिक वसाहतीत ५२ पैकी केवळ ८ कारखाने रात्रपाळीत सुरू आहेत. उर्वरित ४४ कारखाने बंद झाल्याने अनेक कामगार रोजगार नसल्याने आपल्या मूळ गावी परतत आहेत.

केवल चौधरी, जालनायेथील स्टील औद्योगिक वसाहतीत ५२ पैकी केवळ ८ कारखाने रात्रपाळीत सुरू आहेत. उर्वरित ४४ कारखाने बंद झाल्याने अनेक कामगार रोजगार नसल्याने आपल्या मूळ गावी परतत आहेत. जागतिक मंदीचा फटका उद्योग व व्यापार क्षेत्राला सहन करावा लागत असल्याचे सांगितले जाते.सळईचे दर मागील काही दिवसांमध्ये लक्षणीय रित्या घसरले. वीज देयके, कामगार मजुरी व बँकेचा हप्ता भरता यावा तसेच उत्पादनातून घट येऊ नये, ही काळजी घेऊन उद्योजक सध्या कारखाने चालवित आहेत. एंगट तयार करणाऱ्या मोठ्या कारखान्यांना सध्या आर्थिक झळ सोसावी लागत आहे. वीज कंपनीचे बंद काळातील देयकेही कंबरडे मोडणारे ठरू शकते, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे कारखानदार आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र औद्योगिक वसाहतीमध्ये दिसून येत आहे. ४राजुरीचे संचालक डी.बी. सोनी यांनी सांगितले, चीनहून आयात करण्यात आलेली सळई मानांकनास पात्र ठरली नसल्याने त्यावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. भारतीय मानांकनानुसार ही सळई वापरण्यास अयोग्य ठरली आहे. तिचा वापर धोकादायक ठरू शकतो. आमच्याकडे सध्या उत्पादन चांगले असून गुणवत्तेवर भर दिल्यामुळे आम्ही तग धरून आहोत. ४दिनेश भारूका म्हणाले, केंद्र शासनाने स्थानिक खर्च विचारात घेऊन आयात सळईवर कर लादावा. ज्यामुळे स्थानिक कामगार आणि कारखानदार यांचाही विचार होऊ शकेल. चीनहून सळई आणून विकल्यास भविष्यातही त्याचे विपरित परिणाम भोगावे लागतील. इमारती कमकुवत झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका सहन करावा लागणार आहे. ४किशोर अग्रवाल म्हणाले, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गत दोन महिन्यात विकासाचे अनेक निर्णय घेतले आहेत. देशातील महामार्ग आणि राज्यमार्ग सिमेंट काँक्रीटचे बांधले जातील. हा निर्णय सर्वच क्षेत्राला लाभदायक आहे. स्टील उद्योगाला मोठी चालना मिळेल. सध्या मात्र जागतिक मंदीमुळे अडचण होत आहे. ४सतीश अग्रवाल व विशाल अग्रवाल यांनी सांगितले, मंदीतून उद्योग व व्यापार क्षेत्राला बाहेर काढण्यासाठी केंद्राकडून ४० हजार कोटी रुपयांचे रस्ते विकास कामे सुरू होणे आवश्यक आहे. या कामांना मंजुरी मिळाली मात्र प्रत्यक्ष आदेश जारी करण्यात आले नाहीत. ही कामे सुरू झाली तर स्टील क्षेत्राला दिलासा मिळू शकेल. सध्या सीमेंटही २० रूपयांनी घसरले. एकूण मंदीची लाट सध्या सुरू आहे. ४घनशाम गोयल, अरूण अग्रवाल म्हणाले, मंदीमुळे कारखाने चालविणे अडचणीचे झाले आहे. बहुतांश कामगार परतीवर आहेत. ज्या कामगारांना पूर्णवेळ काम हवे आहे. त्यांना निम्मेही काम मिळेना. सळईला सध्या मागणी नाही. मोठ्या जिल्ह्यातच सळईची मागणी नोंदविण्यात येत आहे. ४नरेंद्र मित्तल यांनी सांगितले, छोटे कारखानदार प्रचंड अडचणीत आहेत. मोठे कारखाने तरी एंगट सहज विकू शकतात. त्यांचा खर्चही भागविता येतो. सळई तयार करणाऱ्या कारखान्यांना रोज माल विकला जाणे आवश्यक आहे. उत्पादनाच्या निम्मीच मागणी बाजारात आहे. बहुतांश कारखाने बंद आहेत. तर काही कारखान्यांचे काम एका शिफ्टवरच सुरू असल्याने तोही त्रास सहन करावा लागत आहे. औद्योगिक वसाहतीतील ५२ पैकी ४४ कारखाने पूर्णत: बंद असून ८ कारखाने केवळ एका शिफ्टवरच सुरू आहेत. एकीकडे रोजगार नसल्याने परप्रांतीय कामगार आपल्या मूळ गावाकडे परतत असताना कारखानदारांना आर्थिक झळ मोठ्या प्रमाणात सहन करावी लागत आहे.