शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
4
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
5
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
6
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
7
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
8
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
9
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
10
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
11
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
12
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
13
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
14
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
15
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
16
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
17
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
18
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
19
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”

औद्योगिक वसाहतीत ४४ कारखाने बंद

By admin | Updated: November 16, 2014 23:37 IST

केवल चौधरी, जालना येथील स्टील औद्योगिक वसाहतीत ५२ पैकी केवळ ८ कारखाने रात्रपाळीत सुरू आहेत. उर्वरित ४४ कारखाने बंद झाल्याने अनेक कामगार रोजगार नसल्याने आपल्या मूळ गावी परतत आहेत.

केवल चौधरी, जालनायेथील स्टील औद्योगिक वसाहतीत ५२ पैकी केवळ ८ कारखाने रात्रपाळीत सुरू आहेत. उर्वरित ४४ कारखाने बंद झाल्याने अनेक कामगार रोजगार नसल्याने आपल्या मूळ गावी परतत आहेत. जागतिक मंदीचा फटका उद्योग व व्यापार क्षेत्राला सहन करावा लागत असल्याचे सांगितले जाते.सळईचे दर मागील काही दिवसांमध्ये लक्षणीय रित्या घसरले. वीज देयके, कामगार मजुरी व बँकेचा हप्ता भरता यावा तसेच उत्पादनातून घट येऊ नये, ही काळजी घेऊन उद्योजक सध्या कारखाने चालवित आहेत. एंगट तयार करणाऱ्या मोठ्या कारखान्यांना सध्या आर्थिक झळ सोसावी लागत आहे. वीज कंपनीचे बंद काळातील देयकेही कंबरडे मोडणारे ठरू शकते, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे कारखानदार आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र औद्योगिक वसाहतीमध्ये दिसून येत आहे. ४राजुरीचे संचालक डी.बी. सोनी यांनी सांगितले, चीनहून आयात करण्यात आलेली सळई मानांकनास पात्र ठरली नसल्याने त्यावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. भारतीय मानांकनानुसार ही सळई वापरण्यास अयोग्य ठरली आहे. तिचा वापर धोकादायक ठरू शकतो. आमच्याकडे सध्या उत्पादन चांगले असून गुणवत्तेवर भर दिल्यामुळे आम्ही तग धरून आहोत. ४दिनेश भारूका म्हणाले, केंद्र शासनाने स्थानिक खर्च विचारात घेऊन आयात सळईवर कर लादावा. ज्यामुळे स्थानिक कामगार आणि कारखानदार यांचाही विचार होऊ शकेल. चीनहून सळई आणून विकल्यास भविष्यातही त्याचे विपरित परिणाम भोगावे लागतील. इमारती कमकुवत झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका सहन करावा लागणार आहे. ४किशोर अग्रवाल म्हणाले, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गत दोन महिन्यात विकासाचे अनेक निर्णय घेतले आहेत. देशातील महामार्ग आणि राज्यमार्ग सिमेंट काँक्रीटचे बांधले जातील. हा निर्णय सर्वच क्षेत्राला लाभदायक आहे. स्टील उद्योगाला मोठी चालना मिळेल. सध्या मात्र जागतिक मंदीमुळे अडचण होत आहे. ४सतीश अग्रवाल व विशाल अग्रवाल यांनी सांगितले, मंदीतून उद्योग व व्यापार क्षेत्राला बाहेर काढण्यासाठी केंद्राकडून ४० हजार कोटी रुपयांचे रस्ते विकास कामे सुरू होणे आवश्यक आहे. या कामांना मंजुरी मिळाली मात्र प्रत्यक्ष आदेश जारी करण्यात आले नाहीत. ही कामे सुरू झाली तर स्टील क्षेत्राला दिलासा मिळू शकेल. सध्या सीमेंटही २० रूपयांनी घसरले. एकूण मंदीची लाट सध्या सुरू आहे. ४घनशाम गोयल, अरूण अग्रवाल म्हणाले, मंदीमुळे कारखाने चालविणे अडचणीचे झाले आहे. बहुतांश कामगार परतीवर आहेत. ज्या कामगारांना पूर्णवेळ काम हवे आहे. त्यांना निम्मेही काम मिळेना. सळईला सध्या मागणी नाही. मोठ्या जिल्ह्यातच सळईची मागणी नोंदविण्यात येत आहे. ४नरेंद्र मित्तल यांनी सांगितले, छोटे कारखानदार प्रचंड अडचणीत आहेत. मोठे कारखाने तरी एंगट सहज विकू शकतात. त्यांचा खर्चही भागविता येतो. सळई तयार करणाऱ्या कारखान्यांना रोज माल विकला जाणे आवश्यक आहे. उत्पादनाच्या निम्मीच मागणी बाजारात आहे. बहुतांश कारखाने बंद आहेत. तर काही कारखान्यांचे काम एका शिफ्टवरच सुरू असल्याने तोही त्रास सहन करावा लागत आहे. औद्योगिक वसाहतीतील ५२ पैकी ४४ कारखाने पूर्णत: बंद असून ८ कारखाने केवळ एका शिफ्टवरच सुरू आहेत. एकीकडे रोजगार नसल्याने परप्रांतीय कामगार आपल्या मूळ गावाकडे परतत असताना कारखानदारांना आर्थिक झळ मोठ्या प्रमाणात सहन करावी लागत आहे.